शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पगाराला जावळीत कामाला जिल्हाधिकारी कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:14 IST

जावळी तहसीलची तऱ्हा : अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जनतेची कामे रखडली

सायगाव : जावळी तहसील कार्यालयात तीन नायब तहसीलदार पदे मंजूर असून केवळ एकच नायब तहसिलदारांवर संपूर्ण तालुक्याचा कारभार सुरू आहे. या कार्यालयातील कनिष्ठ सहायकची बारा पैकी नऊ कार्यरत तर त्यामधील तीन प्रतिनियुक्तीवर तर अव्वल कारकूनची नऊ पदे मंजूर आहेत पैकी आठ कार्यरत तर एक प्रतिनियक्ती वर असे महसूल कर्मचारी फक्त पगाराला जावळीत मात्र कामाला जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी कार्यालयात आहेत. त्यामुळे तहसीलदारांवर अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर तहसीलचा कारभार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेची कामे रखडली जात आहेत. तरी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ मंजूर पदे भरून प्रतिनियक्तीवरील कर्मचारी जावळीत पाठवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.

एकीकडे शासकीय कामांच्या बाबतीत "झिरो पेंडनसी" चा फॉम्युर्ला आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडून राबविला जात आहे. त्याचा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रत्येक तहसिलदारांकडे पाठपुरावा होताना दिसतो. मात्र दुसरीकडे कमी कमी महसूल कर्मचाऱ्यांवर महसुली कामांचा निपटारा कसा करायचा, हा प्रश्न जावळी तहसीलदारांपुढे पडतो आहे.

जावळी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार सुरेश शिंगटे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर साळुंखे हे निवृत्त झाले आहेत. त्यामुळे महसूल नायब तहसीलदार शिरीष सपकाळ यांच्यावर सर्व विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. महसुलची कामे निकालात काढता यावीत, यासाठी महसूल कर्मचाऱ्यांची गरज भासते. तेही कर्मचारी अपुरे आहेत.

कनिष्ठ लिपिक बारा पैकी नऊ कार्यरत तर तीन प्रतिनियुक्तीवर आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालयात काम करतात, त्यामुळे प्रत्यक्षात सहाच लिपिक जावळीत आहेत तर त्यातील दोन लिपिकांची देखील बदली आदेश आले आहेत. त्यामुळे पुढे चारच लिपिकांवर कामे करून घेण्याची वेळ तहसीलदारांवर येणार आहे. तर अव्वल कारकूनची नऊ मंजूर पदांपैकी आठ कार्यरत आहेत तर एक रिक्त , एक प्रतिनियुक्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयात काम करीत आहे.महसूल विभागाच्या प्रतिनियुक्तीवरील अजब प्रकारामुळे तालुक्यातील जनतेची कामे वेळेत होण्यास विलंब होत आहे. नेमकं याला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.

अपुऱ्या कर्मच्यांऱ्यामुळे "झिरो पेंडन्सीला" खीळ

दोन नायब तहसीलदार पदे रिक्त तर कनिष्ठ लिपिकमधील तीन रिक्त, तीन प्रतिनियुक्तीवर जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालयात, तर अव्वल कारकून एक पद रिक्त तर एक प्रतिनियुक्तीवर, अशी परिस्थिती जावळीत असल्यामुळे दुर्गम, डोंगरी तालुक्यातील जनतेची कामे रखडली जात आहेत. त्यामुळे ह्यझिरो पेंडंसीह्णला खीळ बसत आहे. केवळ सातारा शहरापासून मेढा तहसील कार्यालय जवळ असल्यामुळे काम न करणारे कर्मचारी हे मुख्यालयात प्रतिनियुक्ती घेण्यासाठी वशिलेबाजी करतात. त्यामुळे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी तालुक्यातील जनतेची कामे जलद गतीने व्हावीत, यासाठी प्रतिनियुक्तीवर घेतलेले कर्मचारी तत्काळ जावळीत पाठवावेत, तसेच रिक्त पदेदेखील भरली जावीत, अशी मागणी संतप्त जावळीकरांमधून होत आहे.महसूल चा कर्मचारी प्रतिनियुक्ती प्रकार जावळीत खपवून घेतला जाणार नाही. दुर्गम, डोंगरी जावळीकरांची कामे तत्काळ व्हावीत, यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्वरित रिक्त पदे भरून प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी जावळीत पाठवावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल.- एकनाथ ओंबळे, नियोजन समिती सदस्य तथा

शिवसेना सातारा विधानसभा संपर्कप्रमुख