शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

पगाराला जावळीत कामाला जिल्हाधिकारी कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:14 IST

जावळी तहसीलची तऱ्हा : अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जनतेची कामे रखडली

सायगाव : जावळी तहसील कार्यालयात तीन नायब तहसीलदार पदे मंजूर असून केवळ एकच नायब तहसिलदारांवर संपूर्ण तालुक्याचा कारभार सुरू आहे. या कार्यालयातील कनिष्ठ सहायकची बारा पैकी नऊ कार्यरत तर त्यामधील तीन प्रतिनियुक्तीवर तर अव्वल कारकूनची नऊ पदे मंजूर आहेत पैकी आठ कार्यरत तर एक प्रतिनियक्ती वर असे महसूल कर्मचारी फक्त पगाराला जावळीत मात्र कामाला जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी कार्यालयात आहेत. त्यामुळे तहसीलदारांवर अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर तहसीलचा कारभार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेची कामे रखडली जात आहेत. तरी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ मंजूर पदे भरून प्रतिनियक्तीवरील कर्मचारी जावळीत पाठवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.

एकीकडे शासकीय कामांच्या बाबतीत "झिरो पेंडनसी" चा फॉम्युर्ला आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडून राबविला जात आहे. त्याचा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रत्येक तहसिलदारांकडे पाठपुरावा होताना दिसतो. मात्र दुसरीकडे कमी कमी महसूल कर्मचाऱ्यांवर महसुली कामांचा निपटारा कसा करायचा, हा प्रश्न जावळी तहसीलदारांपुढे पडतो आहे.

जावळी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार सुरेश शिंगटे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर साळुंखे हे निवृत्त झाले आहेत. त्यामुळे महसूल नायब तहसीलदार शिरीष सपकाळ यांच्यावर सर्व विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. महसुलची कामे निकालात काढता यावीत, यासाठी महसूल कर्मचाऱ्यांची गरज भासते. तेही कर्मचारी अपुरे आहेत.

कनिष्ठ लिपिक बारा पैकी नऊ कार्यरत तर तीन प्रतिनियुक्तीवर आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालयात काम करतात, त्यामुळे प्रत्यक्षात सहाच लिपिक जावळीत आहेत तर त्यातील दोन लिपिकांची देखील बदली आदेश आले आहेत. त्यामुळे पुढे चारच लिपिकांवर कामे करून घेण्याची वेळ तहसीलदारांवर येणार आहे. तर अव्वल कारकूनची नऊ मंजूर पदांपैकी आठ कार्यरत आहेत तर एक रिक्त , एक प्रतिनियुक्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयात काम करीत आहे.महसूल विभागाच्या प्रतिनियुक्तीवरील अजब प्रकारामुळे तालुक्यातील जनतेची कामे वेळेत होण्यास विलंब होत आहे. नेमकं याला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.

अपुऱ्या कर्मच्यांऱ्यामुळे "झिरो पेंडन्सीला" खीळ

दोन नायब तहसीलदार पदे रिक्त तर कनिष्ठ लिपिकमधील तीन रिक्त, तीन प्रतिनियुक्तीवर जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालयात, तर अव्वल कारकून एक पद रिक्त तर एक प्रतिनियुक्तीवर, अशी परिस्थिती जावळीत असल्यामुळे दुर्गम, डोंगरी तालुक्यातील जनतेची कामे रखडली जात आहेत. त्यामुळे ह्यझिरो पेंडंसीह्णला खीळ बसत आहे. केवळ सातारा शहरापासून मेढा तहसील कार्यालय जवळ असल्यामुळे काम न करणारे कर्मचारी हे मुख्यालयात प्रतिनियुक्ती घेण्यासाठी वशिलेबाजी करतात. त्यामुळे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी तालुक्यातील जनतेची कामे जलद गतीने व्हावीत, यासाठी प्रतिनियुक्तीवर घेतलेले कर्मचारी तत्काळ जावळीत पाठवावेत, तसेच रिक्त पदेदेखील भरली जावीत, अशी मागणी संतप्त जावळीकरांमधून होत आहे.महसूल चा कर्मचारी प्रतिनियुक्ती प्रकार जावळीत खपवून घेतला जाणार नाही. दुर्गम, डोंगरी जावळीकरांची कामे तत्काळ व्हावीत, यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्वरित रिक्त पदे भरून प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी जावळीत पाठवावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल.- एकनाथ ओंबळे, नियोजन समिती सदस्य तथा

शिवसेना सातारा विधानसभा संपर्कप्रमुख