शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

फोडण्यासाठी नारळ.. अधिकाऱ्यांची धावपळ!

By admin | Updated: September 2, 2014 23:46 IST

आचारसंहितेची धास्ती : तीन आठवड्यात दोनशेहून अधिक विकासकामांची उद्घाटने

सातारा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे नेतेमंडळी सतर्क झाली असून त्यांनी तर विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटाच लावला आहे. मात्र, यामुळे अनेक विभागातील प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. अनेकदा या अधिकाऱ्यांना नेत्यांची वाट बघत गावामध्येच मुक्काम ठोकावा लागत आहे. जिल्ह्यात तीन आठवड्यात दोनशेहून अधिक विकासकामांची उद्घाटने झाली आहेत. बहुतांशी भागातील कामे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे आणि कृषी विभागाकडील आहेत. त्यामुळे या विभागाचे प्रमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडत आहे. उद्घाटन आहे तेथे साहित्य पोहोच करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.आठही विधानसभा मतदारसंघात आता विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा सुरू आहे. अनेक कामांचे उद्घाटन दोनवेळा होण्याचे प्रकारही काही मतदारसंघात घडले आहेत. राष्ट्रवादीच्या कामांचे उद्घाटन काँग्रेस आणि काँग्रेसच्या कामांची उद्घाटने राष्ट्रवादी करत असल्याच्या आरोपांच्या फैरीही यानिमित्ताने झडत आहेत. ज्या गावात कामाचे उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी नेत्यांच्या अगोदरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोहोचावे लागत आहे. अनेकदा नेतेमंडळी मध्यरात्र उलटली तरी उद्घाटनाचा नारळ फोडण्यासाठी येतच नाहीत. जेथे उद्घाटन आहे तेथे गाडी जाते का, आवश्यक ती सोय केली आहे का, याचीही विचारणा केली जाते. उद्घाटनानंतर जेथे कार्यक्रम होणार आहे तेथे टेबल नीट मांडले आहेत का, माणसे किती उपस्थित आहेत. याचाही आढावा घेतला जातो. (प्रतिनिधी)