आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात ग्रामपंचायतीचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी, पॅनेलची नावे निश्चित झाल्यानंतर प्रचाराचे नारळ ग्रामदेवतांच्या मंदिरात फुटल्याने निवडणुकीत रंग भरत आहे. त्यामुळे प्रचाराचे नारळ फुटले अन् हॉटेल, ढाबे सजल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण पश्चिम तालुक्यात प्रत्येक पक्षाचे जिल्हा, तालुका, विभाग प्रमुख आदी पदाधिकारी कार्यशील आहेत. त्यांनी त्यांच्या गावात राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे खर्च करावा लागणार असल्याने काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचे रंग भरत असताना प्रचाराचे नारळ फुटल्याने उमेदवार, कार्यकर्ते मतदानासाठी घरोघरी फिरत असताना, त्यांना थकवा येऊ नये म्हणून गावातील उत्साही तरुण उमेदवार कार्यकर्त्यांकडे खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ढाबे, हॉटेलचे आमिष दाखविल्याचे चित्र ओळखून ग्रामपंचायत निवडणुकीत काही कार्यकर्ते चार्ज झाल्याने, गावातील, तालुक्यातील नेत्यांना त्या निवडणुकीत ढाब्यावर जेवण देण्याची मागणी होऊ लागल्याने धाब्यावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रचाराचे नारळ फुटले आणि ढाबे, हॉटेल सजले, अशी चर्चा सुरू झाली आहे