शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

कोपर्डे हवेलीत चोरट्यांचा पुन्हा धुडगूस; साडेतेरा तोळे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:15 IST

कºहाड/कोपर्डे हवेली : कºहाड दक्षिणेतील टाळगाव आणि कासारशिरंबे गावात जबरी चोरी केल्यानंतर चोरट्यांच्या टोळीने आपला मोर्चा कºहाड उत्तरेतील गावांकडे ...

कºहाड/कोपर्डे हवेली : कºहाड दक्षिणेतील टाळगाव आणि कासारशिरंबे गावात जबरी चोरी केल्यानंतर चोरट्यांच्या टोळीने आपला मोर्चा कºहाड उत्तरेतील गावांकडे वळविला आहे. शनिवारी रात्री कोपर्डे हवेली येथे धुडगूस घालून त्यांनी साडेतेरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच अन्य घरांमध्ये घुसून चोरीचा प्रयत्न केला. या घटनेने कोपर्डेसह आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ऐन दिवाळीत चोरट्यांनी तालुक्यातील टाळगाव आणि कासारशिरंबे गावामध्ये घुसून घरफोड्या केल्या होत्या. बुधवारी, दि. ७ रात्री ही घटना घडली होती. दोन घरांतून चोरट्यांनी सहा लाखांचे दागिने लंपास केले होते. ही घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री कोपर्डे हवेलीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरटे कोपर्ड हवेलीतील मुख्य रस्त्याच्याकडेलाच असलेल्या संगीता सुनील रसाळ यांच्या घरात घुसले. त्यांनी संगीता यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चैन हिसकावून घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गळ्यातील चैन ओढत असताना संगीता यांना जाग आली. मात्र, डोळ्यावर बॅटरीचा उजेड पाडल्याने त्यांना समोरचे काहीच दिसले नाही. तेव्हा संगीता यांनी चैन ओढून धरली होती. मात्र, चोरट्यांनी जोराचा हिसका दिल्याने त्यांच्या हातातून चैन सुटली. त्याचवेळी संगीता यांनी चोरट्यांच्या हातात असलेला लोखंडी गज पकडला. तसेच चैन परत मागितली. मात्र, चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यामुळे संगीता यांनी गज सोडला. त्यामुळे चोरटे तेथून पसार झाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रानजीक असलेल्या रामचंद्र शिवाजी साळवे यांच्या घराकडे वळवला. त्यांनी दाराची कडी काढून आत प्रवेश केला. घरातील सर्वजण झोपेत असताना आतल्या खोलीत असलेल्या कपाटाचे दार उघडून त्यांनी कपाटातील ७० हजार रुपये किमतीचा तीन तोळ्यांचा राणीहार, ५० हजार रुपयांची अडीच तोळ्यांची मोहनमाळ, ३० हजारांचा दीड तोळे वजनाचा लक्ष्मीहार, ४० हजारांच्या दोन तोळ्यांच्या चैन, २० हजारांच्या एक तोळ्याच्या अंगठ्या यासह अन्य असे सुमारे बारा तोळ्यांचे दागिने आणि पाच हजारांची रोकड चोरून पोबारा केला.दरम्यान, रात्री रामचंद्र यांचे वडील शिवाजी यांना जाग आली. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा केला.