शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"उद्योग पळवले म्हणता, मग पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते"; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By नितीन काळेल | Updated: March 9, 2024 18:12 IST

मुनावळेत कोयना जलपर्यटनाचा प्रारंभ; स्थानिकांना रोजगार उपलब्ध 

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: सह्याद्रीच्या कुशीत निसर्गस्थळे लपली आहेत. त्याचा विकास करण्यासाठी इच्छाशक्ती हवी. कोयना जलपर्यटन प्रकल्पातून तर स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे भूमिपूत्रांना बाहेर नोकरीसाठी जावे लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य आहे. उद्योग पळवले म्हणतात, मग राज्यात पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

मुनावळे, ता. जावळी येथे कोयना जलाशयाच्या तीरावर महाराष्ट्र शासन पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जलपर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, एमटीडीसीच्या व्यवस्थापक शर्मा, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, जयंत शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास प्रकल्पाचे सल्लागार सारंग कुलकर्णी, शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘देशातील धरणातील पहिलाच जलक्रीडा प्रकल्प मुनावळे येथे होत आहे. अशी कामे होण्यासाठी इच्छाशक्ती लागते. या मातीतील मी सुपूत्र असल्याने मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. कोयना धरणापासून मागे ४० किलोमीटरपर्यंत बॅकवाॅटर आहे. पण, मुख्यमंत्री झाल्यापासून धरणाबाबतचा हा कायदाच काढून टाकला. त्यामुळेच हे पर्यटन केंद्र होत आहे. आता मासेमारीही होत आहे. येथील जलक्रीडा केंद्र तर २५ एकरमध्ये होणार आहे. पर्यावरणपूरक आणि पाण्याचे प्रदूषण न होता हा प्रकल्प होणार असल्याने यातून स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे. यामुळे येथून पुढे कोणी नोकरीसाठी बाहेर जाणार नाही. जे बाहेर गेले आहेत तेच आता माघारी आले पाहिजेत, असा उद्देश या प्रकल्पामागे आहे.

कोयना भागातच आपटी-तापोळा पूल तसेच रघुवीर घाटातून कोकणला जोडणारा घाटरस्ता होणार आहे. यामुळे कोकणचे ६-७ तासांचे अंतर दीड तासावर येणार आहे. त्यातच कोयना भागात विकासाच्या खूप संधी आहेत. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचं सरकार सामान्यांचं, शेतकरी, कष्टकरी, महिला तसेच तरुणांचं आहे. या सरकारने विकासाचेच काम केले आहे. त्यामुळे पायाभूत विकासाबरोबरच परदेशी गुंतवणुकीतही राज्य प्रथम क्रमांकावर आहे. दावोसमध्ये ३ लाख ७३ हजार कोटींचे करार झाले. राज्यातील उद्योग दुसरीकडे गेले असते तर पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते. आता कोयना परिसरातही उद्याेगपती येतील. त्यांना सोयीसुविधा पुरावायला हव्यात.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कोयना भाग हा डोंगरी आहे. सतत शासनग्रस्त झालेला भाग आहे. या प्रकल्पामुळे या भागातून मुंबईकडे जाणारा ओढा कमी होईल. हे शास्वत उत्पन्न राहणार असल्याने या प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळावा. कारण आमचा त्यावर कायम हक्क आहे. यासाठी येथील लोकांना प्रशिक्षण द्यावे. तसेच जलाशयात मासेमारीची परवानगी द्यावी, असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी काढले पहिले तिकीट; बोटीतून दरे-मुनावळे प्रवास...

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पर्यटन विकास विभागाच्या कोयना जल पर्यटन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासह अन्य मान्यवरांनी काउंटरवर तिकीट खरेदी केले. तर या कार्यक्रमात स्थानिक तरुणांना प्रातिनिधीक स्वरूपात रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात आली. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्री आणि अधिकाऱ्यांनीही दरे ते मुनावळे हा येण्याजाण्याचा प्रवास बोटीने केला. यावेळी शिवसागर जलाशयात विविध बोटीच दिसून येत होत्या. या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, सरपंच भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे