शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

"उद्योग पळवले म्हणता, मग पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते"; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By नितीन काळेल | Updated: March 9, 2024 18:12 IST

मुनावळेत कोयना जलपर्यटनाचा प्रारंभ; स्थानिकांना रोजगार उपलब्ध 

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: सह्याद्रीच्या कुशीत निसर्गस्थळे लपली आहेत. त्याचा विकास करण्यासाठी इच्छाशक्ती हवी. कोयना जलपर्यटन प्रकल्पातून तर स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे भूमिपूत्रांना बाहेर नोकरीसाठी जावे लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य आहे. उद्योग पळवले म्हणतात, मग राज्यात पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

मुनावळे, ता. जावळी येथे कोयना जलाशयाच्या तीरावर महाराष्ट्र शासन पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जलपर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, एमटीडीसीच्या व्यवस्थापक शर्मा, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, जयंत शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास प्रकल्पाचे सल्लागार सारंग कुलकर्णी, शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘देशातील धरणातील पहिलाच जलक्रीडा प्रकल्प मुनावळे येथे होत आहे. अशी कामे होण्यासाठी इच्छाशक्ती लागते. या मातीतील मी सुपूत्र असल्याने मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. कोयना धरणापासून मागे ४० किलोमीटरपर्यंत बॅकवाॅटर आहे. पण, मुख्यमंत्री झाल्यापासून धरणाबाबतचा हा कायदाच काढून टाकला. त्यामुळेच हे पर्यटन केंद्र होत आहे. आता मासेमारीही होत आहे. येथील जलक्रीडा केंद्र तर २५ एकरमध्ये होणार आहे. पर्यावरणपूरक आणि पाण्याचे प्रदूषण न होता हा प्रकल्प होणार असल्याने यातून स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे. यामुळे येथून पुढे कोणी नोकरीसाठी बाहेर जाणार नाही. जे बाहेर गेले आहेत तेच आता माघारी आले पाहिजेत, असा उद्देश या प्रकल्पामागे आहे.

कोयना भागातच आपटी-तापोळा पूल तसेच रघुवीर घाटातून कोकणला जोडणारा घाटरस्ता होणार आहे. यामुळे कोकणचे ६-७ तासांचे अंतर दीड तासावर येणार आहे. त्यातच कोयना भागात विकासाच्या खूप संधी आहेत. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचं सरकार सामान्यांचं, शेतकरी, कष्टकरी, महिला तसेच तरुणांचं आहे. या सरकारने विकासाचेच काम केले आहे. त्यामुळे पायाभूत विकासाबरोबरच परदेशी गुंतवणुकीतही राज्य प्रथम क्रमांकावर आहे. दावोसमध्ये ३ लाख ७३ हजार कोटींचे करार झाले. राज्यातील उद्योग दुसरीकडे गेले असते तर पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते. आता कोयना परिसरातही उद्याेगपती येतील. त्यांना सोयीसुविधा पुरावायला हव्यात.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कोयना भाग हा डोंगरी आहे. सतत शासनग्रस्त झालेला भाग आहे. या प्रकल्पामुळे या भागातून मुंबईकडे जाणारा ओढा कमी होईल. हे शास्वत उत्पन्न राहणार असल्याने या प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळावा. कारण आमचा त्यावर कायम हक्क आहे. यासाठी येथील लोकांना प्रशिक्षण द्यावे. तसेच जलाशयात मासेमारीची परवानगी द्यावी, असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी काढले पहिले तिकीट; बोटीतून दरे-मुनावळे प्रवास...

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पर्यटन विकास विभागाच्या कोयना जल पर्यटन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासह अन्य मान्यवरांनी काउंटरवर तिकीट खरेदी केले. तर या कार्यक्रमात स्थानिक तरुणांना प्रातिनिधीक स्वरूपात रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात आली. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्री आणि अधिकाऱ्यांनीही दरे ते मुनावळे हा येण्याजाण्याचा प्रवास बोटीने केला. यावेळी शिवसागर जलाशयात विविध बोटीच दिसून येत होत्या. या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, सरपंच भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे