शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

उरमोडीच्या पाण्यासाठी औंधसह सोळा गावांत बंद

By admin | Updated: August 17, 2014 00:21 IST

मोर्चा काढून निषेध : सांगलीला पाणी पळविल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया

औंध : औंधसह १६ गावांच्या शेती पाणीप्रश्नी शनिवारी गावे अधिक आक्रमक झाली. सांगली जिल्ह्यातील ढाणेवाडीसह ७ गावांना दिल्या जाणाऱ्या उरमोडीच्या पाण्याचा आदेश त्वरित रद्द करावा व शासनाच्या कृतीचा निषेध करण्यासाठी औंधसह १६ गावे बंद ठेवून मोर्चा काढून शनिवारी तीव्र निषेध करण्यात आला.सकाळी राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पाणी संघर्ष चळवळीचे प्रणेते दत्तात्रय जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली औंध गावातून निषेध मोर्चा काढून ग्रामस्थ, युवक, शेतकऱ्यांनी निषेध केला.यावेळी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही.’ ‘पाणी द्या, नाही तर चले जाव’ अशा घोषणांनी मोर्चा दणाणून गेला.हा निषेध मोर्चा बाजार पटांगण, बालविकास, हायस्कूल चौक, होळीचा टेक, केदार चौक, मारुती मंदिर मार्गे काढण्यात आला. यावेळी गावातील सर्व बाजारपेठा, आर्थिक व्यवहार, हॉटेल्स, दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.त्यानंतर झालेल्या निषेध मोर्चात बोलताना दत्तात्रय जगदाळे म्हणाले की, ‘लोकप्रतिनिधींकडून या भागातील जनतेची फसवणूक होत असून लोकप्रतिनिधी वर विश्वास न ठेवता आता जनतेने ही लढाई हातात घेण्याची वेळ आली असून यापुढील काळात कितीही मोठा संघर्ष करावा लागला तरी तरुणाई व या भागातील जनता, शेतकऱ्यांनी संघटितपणे रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी. जिल्ह्याचे हक्काचे पाणी सांगलीकर पळवत असून ही जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेच्यादृष्टीने खेदाची बाब आहे.’यावेळी रामभाऊ घार्गे, नंदकुमार रणदिवे, धनाजी आमले यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली.मोर्चा व निषेध सभेत पृथ्वीराज भोकरे, नंदकुमार रणदिवे, सागर जगदाळे, धनाजी आमले, जयसिंग घार्गे विजय हिंगे, दादा माळी, नामदेव भोसले, विनोद कदम, सागर चव्हाण, सागर गुरव, मच्छिंद्र सावंत, वसंतराव जानकर, गणेश चव्हाण, ग्रामस्थ, युवक, शेतकरी विविश युवा मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, परिसरातील १६ गावांतील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. ठिकठिकाणी बैठका घेऊन ग्रामस्थांनी याचा निषेध केला. उरमोडीचे पाणी सांगली जिल्ह्यास देण्याच्या शासनाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद खटाव तालुक्यात उमटले. (वार्ताहर)