शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

औंधला ढगफुटीसदृश पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/ औंध: जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी दुपारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले. औंध येथे दुपारी दीड ते साडेतीनपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने ऐतिहासिक तळे फुल्ल भरून सगळ्या रस्त्यांवर पाणीच-पाणी झाले. एवढेच नव्हे तर श्री यमाई देवी मंदिरात तसेच मोकळाई देवीच्या मंदिरात पाणी शिरले.दरम्यान, यापेक्षाही जोरदार पाऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/ औंध: जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी दुपारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले. औंध येथे दुपारी दीड ते साडेतीनपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने ऐतिहासिक तळे फुल्ल भरून सगळ्या रस्त्यांवर पाणीच-पाणी झाले. एवढेच नव्हे तर श्री यमाई देवी मंदिरात तसेच मोकळाई देवीच्या मंदिरात पाणी शिरले.दरम्यान, यापेक्षाही जोरदार पाऊस मूळपीठ डोंगरावर कोसळत होता. दोन तास झालेल्या जोरदार पावसामुळे औंध येथील घरांमध्ये, रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहत होते. हे पाणी ग्रामनिवासिनी श्री यमाई मंदिरात घुसले. मोकळाई देवीच्या मंदिरातही पाणी घुसले तसेच काही घरांच्या भिंती पडूनही नुकसान झाले आहे. तसेच औंध परिसरातील अनेक गावांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली.औंधवर यंदा मागील दहा वर्षांतील हा विक्रमी पाऊस पडला असून, पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या पावसाचे सर्व फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दुष्काळी भागात इतका पाऊस पडतो हे कोणाला पटत नव्हते. त्यामुळे औंध भागातील आपापल्या पै-पाहुणे नातेवाइकांना फोनवरून या पावसाची खातरजमा करीत होते.या ढगफुटीसदृश पावसाने औंधमधील अनेक घरांत पाणी घुसले असून, अनेक ठिकाणी घरांच्या भिंतीही कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पावसामुळे कुंभारवाड्यानजीकचा, गोटेवाडी, पवारमळा तसेच औंध ते खरशिंगे मार्गावरील रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच अनेक ठिकाणी शेतांमधील पिकांचे आणि बटाटा पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.पूल वाहून गेल्याची भीतीऔंध ते गोटेवाडीकडे जाणारा पूलही पावसाने वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, सायंकाळी उशिरापर्यंत या पुलावरून पाणी वाहत होते. हा पूल एकाबाजूने खचल्याचे दिसत आहे.युवकांकडून स्वयंस्फूर्तीने मदततळे परिसरातील तसेच अन्य काही ठिकाणी पावसाने नुकसान झालेल्या कुटुंबीयांना युवक स्वयंस्फूर्तीने मदत करीत होते. त्यांना आधार देत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत होते. औंधच्या इतिहासात प्रथमच असा पाऊस यापूर्वी दहा वर्षांपूर्वी झाला होता.थोड्या प्रमाणात पाणी गावात आले होते; पण इतका मोठा पाऊसकधीही पाहिला व झाला नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तसेच औंधच्या सर्व बाजूस अगदी डोंगर-कपारीतही पाणी साठल्याचे दृश्य पाहावयासमिळत आहे.भिंत कोसळली; अनेक घरांत पाणीयेथील प्रमोद मोरे यांच्या घराची भिंत पडली आहे. तसेच वनीता काटकर, सुभाष धोंगडे, नथू कोळी, लक्ष्मी इंगळे, सावित्री यादव या तळे परिसरात राहणाºया रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे, घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी औंध येथील युवक, नागरिकांनी मदत करून घरातील साहित्य बाहेर काढले.