शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

कातरखटावमध्ये आठ दिवसांच्या जनता कर्फ्यूमुळे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:32 IST

कातरखटाव : कातरखटावसह परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या ...

कातरखटाव : कातरखटावसह परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने आठ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. यामुळे बाजारपेठामध्ये शुकशुकाट दिसत आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसांत कातरखटावमध्ये रुग्णसंख्या शंभरी ओलांडून पुढे चालली आहे. बाधित सापडत आहेत अशा ठिकाणी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत समितीच्या वतीने परिसर पूर्णपणे सील केला आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्याचे काम आरोग्य विभाग, समिती युद्धपातळीवर करीत आहे. कोरोना महामारीची साखळी तोडायची असेल तर नागरिकांनी खरंच सतर्क राहणं गरजेचं आहे.

नागरिक बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपली व आपल्या कुटुंबाची टेस्ट करून घेणे फार गरजेचं आहे. काही कुटुंब लगेच तपासून घेतात. मात्र, गावात व खेड्यापाड्यात काहीजण असे आहेत की ‘मला काय होत नाही. मी सशक्त आहे. मला काही त्रास होत नाही,’ असे म्हणून पळवाटा काढतात. उगाच इकडे-तिकडे मोकाट फिरत असतात आणि आपल्या कुटुंबासह दहा, वीस जणांच्या संपर्कात येऊन संसर्ग वाढवतात. त्यामुळे साखळी तुटण्याऐवजी लांबत चाललेली दिसत आहे. गावोगावी ग्रामपंचायत, समितीच्या बैठका होऊन जनता कर्फ्यू कडक बंद ठेवून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तरच रुग्णसंख्या कमी होईल, अन्यथा साखळी तुटणे कठीण होईल, असे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वैशाली चव्हाण यांनी सांगितले.

चौकट

पाच हजार रुपये दंड

कोरोना महामारीने सगळीकडे डोकं वर काढलं आहे. त्यामुळे कातरखटावमध्ये आठ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. यादरम्यान व्यावसायिकांनी व नागरिकांनी नियमाचे उल्लंघन करू नये. अन्यथा पाच हजार रुपये दंड करण्यात येईल, असा निर्णय ग्रामसमितीने घेतला आहे.

चौकट

अन्यथा कडक कारवाई

लॉकडाऊन व जनता कर्फ्यू काळात सर्वांनी दुकाने बंद ठेवून नियमाचे पालन करावे. नागरिकांनी कारण नसताना रस्त्यावर फिरू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी दिला आहे.

फोटो विठ्ठल नलवडे यांनी मेल केला आहे.

ओळ कातरखटाव येथे पाळलेल्या जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. (छाया : विठ्ठल नलवडे.)