शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साडेआठ हजार दुकानांचे शटर क्लोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:53 IST

सातारा : सरकारमार्फत विदेशी कंपन्यांना व्यवसायासाठी दारे उघडली जात आहेत. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. जिल्ह्यातील साडेआठ हजार दुकाने शुक्रवारी बंद राहिली. व्यापाºयांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे निवेदन सादर केले.सातारा मर्चंट चेंबर आॅफ कॉमर्स, किराणा रिटेलर असोसिएशन, डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंद पुकारण्यात आला होता. ...

सातारा : सरकारमार्फत विदेशी कंपन्यांना व्यवसायासाठी दारे उघडली जात आहेत. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. जिल्ह्यातील साडेआठ हजार दुकाने शुक्रवारी बंद राहिली. व्यापाºयांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे निवेदन सादर केले.सातारा मर्चंट चेंबर आॅफ कॉमर्स, किराणा रिटेलर असोसिएशन, डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला मेडिकल व्यावसायिकांनीही पाठिंबा दिला. सातारा शहर तसेच जिल्ह्यातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मर्चंट चेंबर आॅफ कॉमर्सचे राजू गोडसे, सुनील झंवर, अजित शहा, लालूशेठ सारडा, किराणा रिटेलर असोसिएशनचे अशोक बादापुरे, राकेश अग्रवाल, महेश भणगे, संदेश नागोरी, परेश दोशी, डिस्ट्रिब्युशन असोसिएशनचे प्रशांत जोशी, प्रदीप शहा, विजय नावंधर आदींनी आपल्या संघटनांच्या सभासदांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.सरकारच्या धोरणामुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्त होतील, असा आरोप यावेळी करण्यात आला. सातारा शहरातील सर्व किराणा व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती राजू गोडसे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. परकीय थेट गुंतवणुकीत किरकोळ वस्तूंचे उत्पादन व्यापारास सरकारने पूर्ण मान्यता दिली. वॉलमार्टसारखी कंपनी भारतीय किरकोळ व्यापारात येत आहे. देशामध्ये सात कोटी व्यापारी आहेत. ४२ लाख कोटी रुपयांचा व्यापार होतो, तो उद्ध्वस्त होईल. नोटबंदी, जीएसटीच्या काळात सर्वाधिक त्रास या व्यापाºयांना झाला. मेक इन इंडियाचा नारा देणारे सरकार विदेशी कंपन्यांना पायघड्या घालून देशांतर्गत असणारा व्यापार मोडीत काढत आहे. व्यापारी करबुडवे आहे, असे सरकारला वाटते. एफडीआय मंजूर करू नये, यासाठी सरकारला १५ डिसेंबरपर्यंत संघटनेने मुदत दिली आहे.दरम्यान, या संपामुळे काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.४० कोटी जनतेला झळ बसण्याची शक्यतादेशांतर्गत असणाºया व्यापारात सात कोटी व्यावसायिक कार्यरत आहेत. या व्यवसायावर ३० कोटी कामगार अवलंबून आहेत. तब्बल ३७ कोटी लोकांच्या जीवनमानाशी खेळण्याचा डाव सरकारने आखला असल्याची माहिती यावेळी व्यापाºयांनी दिली. विदेशी कंपन्यांना व्यवसाय करण्यास मुभा देऊन स्थानिक व्यापार मोडकळीस निघू शकतो. ज्या व्यापाºयांच्या जीवावर भाजप सरकार निवडून आले, त्याच व्यापाºयांना कोंडीत पकडण्याचा डाव आखला गेल्याचा आरोपही केला.