शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

साडेआठ हजार दुकानांचे शटर क्लोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:53 IST

सातारा : सरकारमार्फत विदेशी कंपन्यांना व्यवसायासाठी दारे उघडली जात आहेत. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. जिल्ह्यातील साडेआठ हजार दुकाने शुक्रवारी बंद राहिली. व्यापाºयांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे निवेदन सादर केले.सातारा मर्चंट चेंबर आॅफ कॉमर्स, किराणा रिटेलर असोसिएशन, डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंद पुकारण्यात आला होता. ...

सातारा : सरकारमार्फत विदेशी कंपन्यांना व्यवसायासाठी दारे उघडली जात आहेत. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. जिल्ह्यातील साडेआठ हजार दुकाने शुक्रवारी बंद राहिली. व्यापाºयांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे निवेदन सादर केले.सातारा मर्चंट चेंबर आॅफ कॉमर्स, किराणा रिटेलर असोसिएशन, डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला मेडिकल व्यावसायिकांनीही पाठिंबा दिला. सातारा शहर तसेच जिल्ह्यातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मर्चंट चेंबर आॅफ कॉमर्सचे राजू गोडसे, सुनील झंवर, अजित शहा, लालूशेठ सारडा, किराणा रिटेलर असोसिएशनचे अशोक बादापुरे, राकेश अग्रवाल, महेश भणगे, संदेश नागोरी, परेश दोशी, डिस्ट्रिब्युशन असोसिएशनचे प्रशांत जोशी, प्रदीप शहा, विजय नावंधर आदींनी आपल्या संघटनांच्या सभासदांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.सरकारच्या धोरणामुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्त होतील, असा आरोप यावेळी करण्यात आला. सातारा शहरातील सर्व किराणा व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती राजू गोडसे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. परकीय थेट गुंतवणुकीत किरकोळ वस्तूंचे उत्पादन व्यापारास सरकारने पूर्ण मान्यता दिली. वॉलमार्टसारखी कंपनी भारतीय किरकोळ व्यापारात येत आहे. देशामध्ये सात कोटी व्यापारी आहेत. ४२ लाख कोटी रुपयांचा व्यापार होतो, तो उद्ध्वस्त होईल. नोटबंदी, जीएसटीच्या काळात सर्वाधिक त्रास या व्यापाºयांना झाला. मेक इन इंडियाचा नारा देणारे सरकार विदेशी कंपन्यांना पायघड्या घालून देशांतर्गत असणारा व्यापार मोडीत काढत आहे. व्यापारी करबुडवे आहे, असे सरकारला वाटते. एफडीआय मंजूर करू नये, यासाठी सरकारला १५ डिसेंबरपर्यंत संघटनेने मुदत दिली आहे.दरम्यान, या संपामुळे काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.४० कोटी जनतेला झळ बसण्याची शक्यतादेशांतर्गत असणाºया व्यापारात सात कोटी व्यावसायिक कार्यरत आहेत. या व्यवसायावर ३० कोटी कामगार अवलंबून आहेत. तब्बल ३७ कोटी लोकांच्या जीवनमानाशी खेळण्याचा डाव सरकारने आखला असल्याची माहिती यावेळी व्यापाºयांनी दिली. विदेशी कंपन्यांना व्यवसाय करण्यास मुभा देऊन स्थानिक व्यापार मोडकळीस निघू शकतो. ज्या व्यापाºयांच्या जीवावर भाजप सरकार निवडून आले, त्याच व्यापाºयांना कोंडीत पकडण्याचा डाव आखला गेल्याचा आरोपही केला.