शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

एकमेकांचे पाय ओढणे बंद करा

By admin | Updated: February 19, 2017 23:05 IST

वाठार स्टेशन गट : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रचार सभेत कार्यकर्त्यांना आवाहन

वाठार स्टेशन : ‘जिल्हा परिषद ताब्यातून गेली तर आता माफी नाही. भविष्यात सहकार क्षेत्राची परिस्थिती बिकट होईल, त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडेल, यासाठी या जिल्हा परिषदेवर गावातील गट-तट बाजूला ठेवून एकमेकांचे पाय न ओढता पुढच्या पिढीचा विचार करा,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.वाठार स्टेशन, ता. कोरेगाव प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रुपाली जाधव, राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव महाडिक, माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम, जयश्री भोसले, सुरेखा पाटील, नागेशशेठ जाधव, सरपंच महेश लोंढे, विकास साळुंखे, संभाजीराव धुमाळ, अशोक लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती.रामराजे म्हणाले, ‘आत्ताच्या सरकारने अडीच वर्षांत शेतकऱ्यांचं जीवन जगणं मुश्कील केलं आहे. नोटाबंदीच्या परिणामाने अनेक उद्योग बंद पडले. अनेक तरुण बेरोजगार झाले तर शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला दर नाही, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जनता दबली आहे. शहरी भागात मतदारसंघ वाढले, यामुळे या सरकारने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत शहरी मतदारांना खूश करण्याची भूमिका घेतली आहे. मुळात या शासनाला शेतकरी नको तर व्यापारी जगवायचा आहे.’ यावेळी आमदार दीपक चव्हाण, बाळासाहेब सोळस्कर, राजेंद्र भोसले यांची भाषणे झाली. यावेळी नागेशशेठ जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरपंच महेश लोंढे यांनी आभार मानले. (वार्ताहर)