शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

एकमेकांचे पाय ओढणे बंद करा

By admin | Updated: February 19, 2017 23:05 IST

वाठार स्टेशन गट : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रचार सभेत कार्यकर्त्यांना आवाहन

वाठार स्टेशन : ‘जिल्हा परिषद ताब्यातून गेली तर आता माफी नाही. भविष्यात सहकार क्षेत्राची परिस्थिती बिकट होईल, त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडेल, यासाठी या जिल्हा परिषदेवर गावातील गट-तट बाजूला ठेवून एकमेकांचे पाय न ओढता पुढच्या पिढीचा विचार करा,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.वाठार स्टेशन, ता. कोरेगाव प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रुपाली जाधव, राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव महाडिक, माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम, जयश्री भोसले, सुरेखा पाटील, नागेशशेठ जाधव, सरपंच महेश लोंढे, विकास साळुंखे, संभाजीराव धुमाळ, अशोक लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती.रामराजे म्हणाले, ‘आत्ताच्या सरकारने अडीच वर्षांत शेतकऱ्यांचं जीवन जगणं मुश्कील केलं आहे. नोटाबंदीच्या परिणामाने अनेक उद्योग बंद पडले. अनेक तरुण बेरोजगार झाले तर शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला दर नाही, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जनता दबली आहे. शहरी भागात मतदारसंघ वाढले, यामुळे या सरकारने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत शहरी मतदारांना खूश करण्याची भूमिका घेतली आहे. मुळात या शासनाला शेतकरी नको तर व्यापारी जगवायचा आहे.’ यावेळी आमदार दीपक चव्हाण, बाळासाहेब सोळस्कर, राजेंद्र भोसले यांची भाषणे झाली. यावेळी नागेशशेठ जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरपंच महेश लोंढे यांनी आभार मानले. (वार्ताहर)