शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

एकमेकांचे पाय ओढणे बंद करा

By admin | Updated: February 19, 2017 23:05 IST

वाठार स्टेशन गट : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रचार सभेत कार्यकर्त्यांना आवाहन

वाठार स्टेशन : ‘जिल्हा परिषद ताब्यातून गेली तर आता माफी नाही. भविष्यात सहकार क्षेत्राची परिस्थिती बिकट होईल, त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडेल, यासाठी या जिल्हा परिषदेवर गावातील गट-तट बाजूला ठेवून एकमेकांचे पाय न ओढता पुढच्या पिढीचा विचार करा,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.वाठार स्टेशन, ता. कोरेगाव प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रुपाली जाधव, राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव महाडिक, माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम, जयश्री भोसले, सुरेखा पाटील, नागेशशेठ जाधव, सरपंच महेश लोंढे, विकास साळुंखे, संभाजीराव धुमाळ, अशोक लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती.रामराजे म्हणाले, ‘आत्ताच्या सरकारने अडीच वर्षांत शेतकऱ्यांचं जीवन जगणं मुश्कील केलं आहे. नोटाबंदीच्या परिणामाने अनेक उद्योग बंद पडले. अनेक तरुण बेरोजगार झाले तर शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला दर नाही, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जनता दबली आहे. शहरी भागात मतदारसंघ वाढले, यामुळे या सरकारने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत शहरी मतदारांना खूश करण्याची भूमिका घेतली आहे. मुळात या शासनाला शेतकरी नको तर व्यापारी जगवायचा आहे.’ यावेळी आमदार दीपक चव्हाण, बाळासाहेब सोळस्कर, राजेंद्र भोसले यांची भाषणे झाली. यावेळी नागेशशेठ जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरपंच महेश लोंढे यांनी आभार मानले. (वार्ताहर)