शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसाठी संपादित जमिनीचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST

मसूर : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांमुळे खराडे येथील पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे दुहेरीकरणाच्या इलेक्ट्रिकल लाईनच्या कामासाठी जात असलेल्या प्रकल्पबाधीत ...

मसूर : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांमुळे खराडे येथील पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे दुहेरीकरणाच्या इलेक्ट्रिकल लाईनच्या कामासाठी जात असलेल्या प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याला यश आले. जमिनीची मोजणी पूर्ण होऊन भूसंपादन झाल्याने मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे खराडेतील शेतकऱ्यांनी श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, विकास थोरात यांचे कौतुक केले.

खराडे येथील शेतकऱ्यांनी भूसंपादन होत नाही तोपर्यंत कोणतेही इलेक्ट्रिक लाईनचे काम मुरुमाचा भरावा, बांधकाम या गोष्टी करावयाच्या नाहीत, असा आक्रमक पवित्रा घेतला.

पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे दुहेरीकरणाच्या इलेक्ट्रिकल लाईनचे काम बंद पाडले होते. या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा प्रश्न खासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांच्या सहकाऱ्याने तारगावचे विकास थोरात व कऱ्हाड, कोरेगाव, सातारा, खंडाळा तालुक्यातील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकरी यांचा माध्यमातून भूसंपादन मोबदला व रेल्वेच्या इतर सुविधांसाठी न्यायिक लढा सुरू आहे. यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे भूसंपादन प्रस्ताव तयार झाले असून, मोबदल्याचे पैसेही महसूलकडे आले आहेत. अजून काही रेल्वे लगतच्या गावातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव महसूल प्रशासनाच्या व भूमी अभिलेखच्या माध्यमातून तयार करणे सुरू आहे. परंतु रेल्वे विभागाच्या चुकीच्या रेकॉर्डमुळे बऱ्याचवेळा याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खराडेच्या शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला होता.

आता झालेल्या मोजणीत पूर्वी आणि सद्यस्थितीतील रेल्वे लाईनला संपादित होणारे सर्व गट सामाविष्ट करण्यात आले. गावातील कवठे हद्द ते बेलवाडी हद्दीपर्यंतच्या सर्व गटांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. खराडेच्या भूसंपादन प्रक्रियासाठी खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांच्या माध्यमातून विकास थोरात यांनी प्रयत्न केले. गावामध्ये रेल्वेने सतरा ते अठरा फूट रस्त्यासह संपादन केली. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय हद्दीतून ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये रस्त्याच्या बाबतीत भविष्यातील होणारे तंटे आपोआप सुटणार आहेत.

मोजणीवेळी विकास थोरात, रेल्वे अधिकारी बलवंत कुमार सिंग, मोजणी अधिकारी धसाडे, तलाठी जयसिंग जाधव, अविनाश जाधव, हणमंतराव जाधव, प्रकाश जाधव उपस्थित होते.

कोट

खराडेत रेल्वेसाठी गेलेल्या जमिनीसंदर्भात खासदार श्रीनिवास पाटील यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असलेली जमीन रेल्वे प्रकल्पात जाऊनही त्यांना योग्य न्याय मिळत नव्हता, तो मिळवून दिला.

- हणमंतराव जाधव,

शेतकरी खराडे