शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

कऱ्हाडला प्रीतीसंगम घाटाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:40 IST

शहरासह तालुक्यात २१ ते २४ जुलै यादरम्यान पडलेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. सलग चार दिवस ...

शहरासह तालुक्यात २१ ते २४ जुलै यादरम्यान पडलेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. सलग चार दिवस पावसाने उसंत न घेतल्यामुळे कृष्णा, कोयना नदीपात्राची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यातच कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे अनेक गावांना महापुराच्या पाण्याने वेढा दिला. कऱ्हाड शहरातील दीडशे कुटुंबांसह अन्य गावातील पूररेषेतील कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतरीत केले होते. शुक्रवारी नदीकाठच्या बहुतांश गावांमध्ये पुराच्या पाण्याने शिरकाव केला; तसेच तालुक्यातील कोयना, वांग, दक्षिण मांड, उत्तर मांड नद्यांवर असलेले पूलही पाण्याखाली गेले.

कऱ्हाड शहरातील पाटण कॉलनीसह प्रीतीसंगम घाटावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले होते. हा विळखा आणखी घट्ट होण्याची शक्यता असतानाच शनिवारपासून पावसाचा जोर कमी झाला. धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे नद्यांचे पाणीही ओसरले. शनिवारी शहरातील शाहू चौक, पाटण कॉलनी, प्रीतीसंगम घाटावरील पुराचे पाणी कमी झाले. रविवारी संपूर्ण परिसर रिकामा झाला; मात्र पुराच्या पाण्यामुळे प्रीतीसंगम घाटावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे पालिकेने घाटावरील चिखल हटविण्याचे काम हाती घेतले आहे.

- चौकट

स्थलांतरीत कुटुंबांच्या घराचीही स्वच्छता

कऱ्हाड शहरातील पाटण कॉलनीसह अन्य काही ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षेच्या कारणास्तव पालिकेने स्थलांतरीत केले होते. नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर संबंधित कुटुंबांच्या घरामध्ये पुराचे पाणी गेले होते. सध्या पूर ओसरला असून, स्थलांतरीत कुटुंबे आपापल्या घरी परतली आहेत. त्यांच्याकडूनही घरांची स्वच्छता केली जात आहे.

फोटो : २७केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाडातील प्रीतीसंगम घाटावरील चिखल हटविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.