शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला प्रीतीसंगम घाटाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:40 IST

शहरासह तालुक्यात २१ ते २४ जुलै यादरम्यान पडलेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. सलग चार दिवस ...

शहरासह तालुक्यात २१ ते २४ जुलै यादरम्यान पडलेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. सलग चार दिवस पावसाने उसंत न घेतल्यामुळे कृष्णा, कोयना नदीपात्राची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यातच कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे अनेक गावांना महापुराच्या पाण्याने वेढा दिला. कऱ्हाड शहरातील दीडशे कुटुंबांसह अन्य गावातील पूररेषेतील कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतरीत केले होते. शुक्रवारी नदीकाठच्या बहुतांश गावांमध्ये पुराच्या पाण्याने शिरकाव केला; तसेच तालुक्यातील कोयना, वांग, दक्षिण मांड, उत्तर मांड नद्यांवर असलेले पूलही पाण्याखाली गेले.

कऱ्हाड शहरातील पाटण कॉलनीसह प्रीतीसंगम घाटावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले होते. हा विळखा आणखी घट्ट होण्याची शक्यता असतानाच शनिवारपासून पावसाचा जोर कमी झाला. धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे नद्यांचे पाणीही ओसरले. शनिवारी शहरातील शाहू चौक, पाटण कॉलनी, प्रीतीसंगम घाटावरील पुराचे पाणी कमी झाले. रविवारी संपूर्ण परिसर रिकामा झाला; मात्र पुराच्या पाण्यामुळे प्रीतीसंगम घाटावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे पालिकेने घाटावरील चिखल हटविण्याचे काम हाती घेतले आहे.

- चौकट

स्थलांतरीत कुटुंबांच्या घराचीही स्वच्छता

कऱ्हाड शहरातील पाटण कॉलनीसह अन्य काही ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षेच्या कारणास्तव पालिकेने स्थलांतरीत केले होते. नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर संबंधित कुटुंबांच्या घरामध्ये पुराचे पाणी गेले होते. सध्या पूर ओसरला असून, स्थलांतरीत कुटुंबे आपापल्या घरी परतली आहेत. त्यांच्याकडूनही घरांची स्वच्छता केली जात आहे.

फोटो : २७केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाडातील प्रीतीसंगम घाटावरील चिखल हटविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.