वाई : वाई शहरातील घरगुती गणपती मोठ्या भक्तिभावाने घाटावर विसर्जनासाठी आणतात. वाई नगरपालिकेने प्रत्येक घाटावर मूर्तिदानची सुविधा उपलब्ध केली होती. तसेच निर्माल्यदानची ही व्यवस्था केली होती. गेल्या दहा दिवसांत घाटावर अस्वछता झाली होती. वाई येथील शिवसह्याद्री अॅकॅडमीचे विध्यार्थी व पर्यावरणप्रेमी धावून आले आणि त्यांनी घाट स्वच्छ करून चकाचक केली. या वेळी नगरपालिका प्रशासनाने सहकार्य केले.
सोमवारी सकाळी शिवसह्याद्री अॅकॅडेमीचे ५० विद्यार्थी व १० विद्यार्थिनी स्वच्छता दूत म्हणून महागणपती घाटावर आले. त्यांनी सकाळी आठ वाजेपर्यंत महागणपती घाट स्वच्छ करून चकाचक केला. यावेळी पालिकेने कचरा संकलनासाठी दोन ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. या वेळी दोन ट्रॉली कचरा काढण्यात आला व घाट पाण्यानी धुऊन काढला. अॅकॅडमीच्या माध्यमातून यापूर्वी ही सामाजिक उपक्रम राबविले आहे. यामध्ये रायरेश्वर, पसरणी घाट स्वच्छता, वृक्षारोपण, वणवा मुक्त डोंगर अभियान तसेच अतिवृष्टीमध्ये भूस्खलनग्रस्त गावांना मदत पोहोचविणे अशा विधायक काम करत असल्याची माहिती प्रशांत डोंगरे यांनी दिली.
वास्तविक पाहता वाई तालुक्याची भाग्यरेषा असणारी कृष्णा नदी, सांडपाणी सरळ नदीत सोडल्याने स्वच्छतेला आवाहन देत आहे. वास्तविक पाहता सांडपाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास नदीस्वच्छतेचा प्रश्न बहुतांशी निकाली निघेल. स्वच्छता अभियानात या वेळी प्रशांत डोंगरे, ओंकार सपकाळ, राजेंद्र खरात या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
(चौकट)
कृष्णा नदी व त्यावरील घाट यांचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. नदीपात्रालगतच्या महागणपती घाटावर घाटावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली होती. अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दोन तास अभियान राबून स्वच्छता केल्याने घाट स्वच्छ झाला नागरिक, पर्यटक यांनी कचरा कुठे ही टाकू नये नदीची व घाटावर स्वच्छता राखली पाहिजे आहे.
-राजेंद्र खरात, प्रशिक्षक, शिवसह्याद्री अॅकॅडमी, वाई
२२वाई गणपती घाट