शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

स्वच्छ-सुंदर सातारा निव्वळ घंटागाडीच्या गाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST

सातारा : शहराची हद्दवाढ झाल्यानंतर नव्याने शहरात समाविष्ट झालेल्या शाहूनगरमध्ये घंटागाडी मुख्य रस्त्यावरूनच जात असल्याने स्थानिकांची अडचण होत आहे. ...

सातारा : शहराची हद्दवाढ झाल्यानंतर नव्याने शहरात समाविष्ट झालेल्या शाहूनगरमध्ये घंटागाडी मुख्य रस्त्यावरूनच जात असल्याने स्थानिकांची अडचण होत आहे. त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर सातारा हे निव्वळ घंटागाडीवर गाणं वाजविण्यापुरतंच राहिल्याची भावना रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

भल्या सकाळी शहरातून कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीचा दिवस अगदी सकाळी ६ पासून सुरू होतो. गेल्या काही दिवसांपासून घंटागाडीवर कोविडचे प्रबोधनगीत वाजवले जाते. या गीताचे बोल कानी पडले की सातारकर घरातील कचरा घंटागाडीत टाकायला म्हणून बाहेर पडतात. काही महिन्यांपूर्वी शहरात शाहूनगरचा समावेश करण्यात आला. त्रिशंकू असलेल्या शाहूनगर परिसरात पूर्वी कॉलनीतील रहिवाशांनी स्वखर्चाने कचरा गोळा करण्यासाठी गाडी लावली होती. प्रत्येक घरातून महिन्याला तीस ते पन्नास रुपये देऊन हा कचरा गोळा केला जात होता. पालिका हद्दीत आल्यानंतर मात्र खाजगी घंटागाड्या बंद करण्यात आल्या. संपूर्ण शाहूगनरमध्ये एकच गाडी असल्याने ही घंटागाडी निव्वळ मुख्य रस्त्यावरच उभं राहून स्वच्छ सातारा सुंदर सातारा हे गाणं ऐकवते. त्यामुळे अंतर्गत सोसायटीतील नागरिक मुख्य रस्त्यावर येऊन कचरा टाकेपर्यंत गाडी निघून जात असल्याचे सत्र सुरू झाले आहे. परिणामी नागरिकांच्या घरातच कचरा साठू लागला आहे.

शाहूनगर येथून सातारा शहरात येण्यासाठी अनेकजण चार भिंतीच्या रस्त्याने ये-जा करतात. उच्चविद्याविभूषित आणि महागड्या गाड्यांतून येणारे अनेक जण चार भिंतीसमोरच कचरागाडीतून फेकत असल्याने तिथेही घाणीचे साम्राज्य साठले आहे. घरात कचरा साठवून ठेवून त्यावर बसणाऱ्या चिलटांचा त्रास नको म्हणून हा मार्ग निवडला जात असल्याचे स्थानिक सांगतात. मात्र यामुळे स्वच्छ साताराची घोषणा प्रत्यक्षात उतरत नाही. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चौकट :

पूर्वी ७० आता २०० ची मागणी !

नगरपालिका हद्दीत शाहूनगर परिसर नसल्याने पूर्वी येथे सोसायट्यांनी एकत्र येऊन घंटागाडी सुरू केली होती. प्रत्येक सदस्याकडून ७० रूपये पूर्वी घेतले जायचे आणि जवळपास प्रत्येक घरासमोर ही गाडी थांबायची. पालिका हद्दीत शाहूनगर समाविष्ट झाल्यानंतर मात्र या घंटागाडीचाही दर वाढला. आता एका कुटुंबाकडून महिन्याला निव्वळ कचरा उचलून नेण्यासाठी दोनशे रुपये मागितले जात आहेत.

कोट :

दिवसभर कामाच्या निमित्ताने आम्ही घराबाहेर असतो. त्यामुळे सकाळी घंटागाडी आली नाही तर कचरा तसाच घरात साठून राहतो. चार-पाच दिवस कचरा घरात राहिला की त्यात आळ्या होतायत. या आळ्या स्वयंपाकघरातही येऊ लागल्यात. त्यामुळे घंटागाडीची वेळ आणि शुल्क यावर पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे.

- अ‍ॅड. चैत्रा व्ही. एस. शाहूनगर

...............