शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

‘सिव्हिल’मध्ये मुक्कामी डॉक्टर हवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 01:04 IST

जयकुमार गोरेंचे अधिवेशनात प्रश्न : शासकीय भांडवलानंतरही सूतगिरण्या उभ्याच राहिल्या नाहीत

सातारा : ‘अडचणीत असणाऱ्या सूतगिरण्यांना मदत केली पाहिजे, त्या चालल्याही पाहिजेत. मात्र, कोट्यवधींचे शासकीय भागभांडवल घेऊन ही अनेक सूतगिरण्या उभ्याच राहिल्या नाहीत. अनेकांनी या भागभांडवलाचा अपहार केला आहे. काहींनी कमी क्षमतेच्या सूतगिरण्या उभारून अपहार केला आहे. अशा सूतगिरण्यांच्या संचालक मंडळांवर फौजदारी दाखल करून त्यांच्याकडून पैसा वसूल करण्याची कारवाई सरकार करणार का?,’ असा प्रश्न आ. जयकुमार गोरे यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर रात्री मुक्कामी राहणे बंधनकारक करा, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सूतगिरण्यांबाबत आ. जयकुमार गोरे म्हणाले, ‘ज्या सूतगिरण्या अडचणीत आहेत. त्या सूतगिरण्यांना मदत केली पाहिजे. सूतगिरण्या चालल्याही पाहिजेत. मात्र, अनेकांनी शासनाचे कोट्यवधींचे भागभांडवल घेऊन सूतगिण्या उभ्याच केल्या नाहीत. १४९ सूतगिरण्यांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी ६६ सूतगिरण्या सुरू आहेत. तर ५४ बंद आहेत. सूतगिरण्या बंद असण्याची कारणे काय आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काहींनी २५ हजार चात्यांच्या सूतगिरणीचे भागभांडवल शासनाकडून घेतले. मात्र, सूतगिरणी उभारताना पाच हजार चात्यांचीच उभारली. बाकीचे भागभांडवल कुठे गेले? याचा आजपर्यंत तपास कुणी केला नाही. कोट्यवधींचा अपहार होऊनही, घेतलेले भागभांडवल परत न येताही शासन त्यांना पुन्हा-पुन्हा मदत करण्याची भूमिका घेत आहे. चांगल्या स्थितीत असणाऱ्या सूतगिरण्यांना मदत केली पाहिजे. परंतु ज्या सूतगिरण्यांनी शासनाचे भागभांडवल परत केले नाही, ज्यांनी त्या पैशाचा अपव्यय केला आहे. अशा संचालक मंडळावर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून भागभांडवल वसूल केले जाणार आहे का? मागासवर्गीय सूतगिरण्यांकडे तारण ठेवण्यासाठी काही नाही. किती ठिकाणी मागासवर्गीय लोकांच्या सूतगिरण्या आहेत, याचा तपास करून सरकार काय कारवाई करणार आहे,’ आ. गोरेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विजय देशमुख म्हणाले, ‘काही सूतगिरण्या भागभांडवल, कर्ज घेऊन उभ्या राहिल्या आहेत. काही अर्धवट स्थितीत आहेत. काही तोट्यात आहेत. ज्या सूतगिरण्यांमध्ये चुकीचा कारभार झाला असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल. मागासवर्गीय संस्थांना आता पुन्हा मान्यता देताना किमान २० टक्के संचालकांचे तारण चुकीचे व्यवहार होऊ नयेत म्हणून घेण्यात येतील. संचालकांनी स्वत:ची जमीन तारण घेतली तर सूतगिरण्या उभ्या राहतील. त्यामुळे यापुढे सर्व ती प्रिकॉशन घेतली जाईल.’ असे मंत्री देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी) रुग्णालयात सेवा बंधनकारक करा... ‘शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर रात्री मुक्कामी नसतात. शासन रुग्णांना उपचार देण्यासाठी प्रयत्न करते. मात्र, उपचार करणारे डॉक्टरच रुग्णालयात नसतील तर त्याचा काय उपयोग आहे. एक डॉक्टर तयार करण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करते. मग असे डॉक्टर रुग्णालयात मुक्काम थांबणे तसेच त्यांनी डीग्री घेतल्यानंतर शासकीय रुग्णालयात सेवा बजावणे बंधनकारक करा. त्यात कोणत्याच पळवाटा ठेवू नका,’ अशी मागणीही आ. गोरे यांनी केली.