शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

शहरातील कचरा बनतोय डोकेदुखी

By admin | Updated: October 26, 2014 23:32 IST

सातारकर हैराण : दीपावलीतच साचला शहरातील रस्त्यांवर शेकडो टन कचरा--निवडणूक झाली आता कामाचं बोला

सातारा : दीपावलीचा उत्सव चारच दिवसांत संपला आणि शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा येऊन साचला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शेकडो टन कचरा येऊन पडला आहे. यामध्ये फटाक्यांचे कागद आणि प्लास्टिकचा समावेश आहे. त्यातच गेले दोन सातारा शहर आणि परिसरात हलक्या सरी कोसळत असल्यामुळे गारवा जाणवू लागल्याने सातारकर चांगलेच हैराण झाले असतानाच रस्त्यावर अनेक ठिकाणी साचून राहिलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. दीपावलीनिमित्त साताऱ्यातील अनेक रस्ते गेले काही दिवस गर्दीने फुलले होते. याच काळात अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी रस्त्यांवर दुकानेही टाकली होती. या कालावधीत झालेला कचरा अजूनही दूर झालेला नाही. तो तसाच रस्त्यावर पडून राहिल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावरून येणारे-जाणारे पादचारी मात्र नाकाला रुमाल लावूनच जात आहेत.यशवंतराव चव्हाण यांचा पोवई नाक्यावर पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या बाजूलाच नेहमी कचरा टाकला जातो. या अनुषंगाने अनेकदा तक्रारी झाल्यानंतरही त्याकडे सातारा नगरपालिका कधी गांभीर्याने पाहत असल्याचे ऐकिवात नाही. दीपावलीच्या कालावधीत अनेक फूल विक्रेते येथे बसतात; मात्र तेही येथेच कचरा करून जातात. पालिका कर्मचाऱ्यांनी वारंवार या मंडळींना सूचना केल्यानंतरही कोणत्याही उपाययोजना आखल्या जात नाहीत. बसस्थानक परिसरालगतच सकाळी सहा ते नऊ या वेळेत मंडई भरते. येथे ग्रामीण भागातून शेतकरी आपला माल विकण्यासाठी येतात. ताजा भाजीपाला मिळत असल्याचे सातारकरांची येथे खरेदीसाठी गर्दी असते. मात्र, अनेक शेतकरी मंडईची वेळ संपली की राहिलेला खराब माल आणि उर्वरित कचरा बाजूलाच उचलून टाकतात. मात्र, याचा सर्वात मोठा फटका बसस्थानक येणाऱ्या प्रवाशांना बसतो कारण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. (प्रतिनिधी)जेथे इशारा, तेथेच कचराकोणत्याही शहराचे प्रवेशद्वार पाहिले की, त्या शहरातील स्वच्छतेचा अनुभव अनेकांना येत असतो. सातारा शहरातील अनेक रस्त्यांवर मात्र बाहेरून येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा अनुभव येत आहे. प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. सातारा शहरात अनेक ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून इशारा देण्यात आला आहे. याचे उल्लंघन झाले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. मात्र, जेथे इशारा, तेथेच कचरा टाकण्यात सातारकरांनी धन्यता मानली आहे. ‘येथे कचरा टाकू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल’ असे मोठ्या अक्षरात लिहिल्यानंतरही अगदी बरोबर त्याच्या खालीच कचरा करण्यात सातारकरांनी धन्यता मानली आहे. विसावा नाका परिसरात हे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. बसस्थानक परिसर, पोवईनाका, जुनी मंडई येथे अनेकदा कचरा दिसून येतो. एवढे होत असतानाही सातारा पालिका मात्र त्यावर काही उपाययोजना आखत नाही.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा सातारा शहरातील पोवई नाक्यावर पुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्याच्या बाजूलाच कचरा टाकण्यात येतो. विशेष म्हणजे, या अनुषंगाने अनेकदा तक्रारी झाल्यानंतरही त्याकडे पालिका गांभीर्याने पाहत नाही. कचऱ्याची केली शेकोटीवातारवणातील बदल आणि दोन दिवस पडणाऱ्या हलक्या सरी यामुळे सातारा शहरात गेले दोन दिवस गारवा जाणवत आहे. त्याचा फटका अनेकांना बसत असून, सातारकर बाहेरच पडायला तयार नाहीत. त्याची प्रचितीही आली. एक वयोवृद्ध मात्र पावसाचा शिडकावा होत असतानाच घराबाहेर पडले होते आणि त्यांनी प्रशासकीय इमारतीनजीक एका झाडाखाली पडलेला कचरा पेटवून पाय शेकत होता.शासकीय कर्मचाऱ्यांची अनास्थासातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानजीक असणारी कचराकुंडी ओसंडून वाहत आहे. विशेष म्हणजे, येथे कचरा करणारी माणसे सरकारी कर्मचारी आहेत. कारण याच्यापुढे असणारी वसाहत शासकीय कर्मचाऱ्यांची आहे. त्यांच्यासाठीच येथे कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. ही मंडळीदेखील कुंडीमध्ये नीटपणे कचरा टाकत नाहीत. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीचा फटका अनेकांना बसत आहेत. कारण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रोज हजारो नागरिक येतात. दरम्यान, येथून जाणारे दुचाकीस्वार तोंडाला रुमालच बांधून जातात.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा सातारा शहरातील पोवई नाक्यावर पुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्याच्या बाजूलाच कचरा टाकण्यात येतो. विशेष म्हणजे, या अनुषंगाने अनेकदा तक्रारी झाल्यानंतरही त्याकडे पालिका गांभीर्याने पाहत नाही. सातारा बसस्थानक परिसरालगतच सकाळी सहा ते नऊ या वेळेत मंडई भरते. मंडई संपली की येथील कचरा बाजूलाच उचलून टाकला जातो. हजारो किलो कचरा येथेच पडून राहिल्यामुळे बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरते.