शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जागरुक नागरिकांमुळेच शहराचा कायापालट होईल : शिवेंद्रसिंहराजे

By admin | Updated: June 17, 2015 00:40 IST

वार्डनिहाय समितीची स्थापना : समितीत राजकारणाला थारा नाही

सातारा : पालिका प्रशासनाकडून शहराच्या विकासासाठी प्रयत्न सुरु असतात, मात्र पालिका प्रशासनाला एक मार्गदर्शक किंवा सुचक म्हणून जागरुक नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. वार्ड समितीच्या निमित्ताने सातारा जागरुक नागरिक संघाची स्थापना झाली असून या संघातील सदस्यांनी आपआपल्या वार्डातील समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केल्यास शहरातील सर्व समस्यांचा निपटारा होवून शहराचा कायापालट होईल, असा विश्वास आमदार शिवेंदसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.वार्ड कमिटीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, जेष्ठ नागरिक रामदास बल्लाळ, रघुनाथ राजमाने, हेमंत कासार, चंद्रकांत जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, निवडणूकीसाठी कमिटी स्थापन करण्यात आलेली नसून सातारा शहरातील प्रत्येक वार्डातील गल्ली बोळातील समस्यांचे निराकणर करणे, नागरिकांच्या प्रश्नांची प्रभावीपणे सोडवणूक करणे, यासाठी जागरुक नागरिकांची मोट बांधण्यात आली आहे. राजकारणाला थारा न देता शहरातील समस्या सोडविण्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून ही कमिटी कार्यरत राहिल. यावेळी डॉ. गोडबोले, हेमंत कासार यांनी वार्ड कमिटीमार्फत केल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. (प्रतिनिधी)... त्यांची आत्ताच दूर रहावे : वेदांतिकाराजे कमिटी गठीत करण्याचे कारण विषद करून वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, लोकांनी लोकांसाठी सुरु केलेली ही एक चळवळ असून या चळवळीच्या माध्यमातून सातारा शहराचा कायापालट करायचा आहे. अनेक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या सातारा शहरात जागरुक नागरिक संघ ही संकल्पना अल्पावधीत आदर्श ठरवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ही कमिटी पुर्णपणे राजकारणविरहीत असून नगरसेवक पदाच्या अपेक्षेने कोणी इथे आले असतील तर, त्यांनी आत्ताच कमिटीपासून दूर रहावे.