शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात शहर विकास आघाडी रिंगणात

By admin | Updated: October 3, 2016 00:27 IST

विलासराव पाटील-उंडाळकर : पारदर्शी कारभारासाठी स्वच्छ प्रतिनिधी पाठवा

कऱ्हाड : ‘येत्या नगरपालिका निवडणुकीत कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडी रिंगणात उतरणार असून, पालिकेच्या पारदर्शी कारभारासाठी चांगले प्रतिनिधी तेथे पाठविण्याचा आमचा मानस आहे. ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्या सर्वांना आमची दारे खुली असून जात, पात न पाहता तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी देणार आहे,’ असे मत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी व्यक्त केले. कऱ्हाड येथे आघाडीची घोषणा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अशोक भोसले, कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक मजहर कागदी, सचिव माजी नगरसेविका सावित्री मुठेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब मोहिते, प्रकाश जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. विलासराव पाटील-उंडाळकर म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात कऱ्हाड शहराचा समावेश झाल्यानंतर पाच वर्षे आमदार म्हणून शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. माझ्या पद्धतीने मी भरपूर काम करण्याचा प्रयत्न केला; पण यशवंतराव चव्हाणांचा वारसा आणि चांगली संस्कृती असणाऱ्या शहराचे सामाजिक स्वास्थ्य आज बिघडलेले आहे. नकारात्मक विचारसरणीच्या विकासात्मक आघाड्या शहरात काम करीत असून, त्यामुळेच आज शहराच्या विकासाचे चित्र धुसर दिसत आहे. त्यामुळे कऱ्हाड शहर नगरविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. फक्त या निवडणुका खुल्या वातावरणात, धनशक्तीला न जुमानता झाल्या पाहिजेत, ही अपेक्षा आहे. म्हणूनच दसऱ्याच्या मुहूर्तावर याची मुद्दाम घोषणा केली आहे. आघाडीचा स्वतंत्र जाहीरनामा योग्यवेळी लोकांपर्यंत पोहोचवू.’ अशोक भोसले म्हणाले, ‘कऱ्हाड शहराची अवस्था आज बकाल झाली आहे. याला सत्ताधाऱ्यांचा गलथान कारभार कारणीभूत आहे. शहरातील कचऱ्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. विलासराव पाटील यांनी पार्ले येथे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पंचवीस एकर जागा पालिकेला मिळवून दिली; पण काही राजकीय मंडळींनी त्याला विरोध केल्याने कचऱ्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. पालिकेच्या वतीने मंडई परिसरात दुकान गाळे बांधण्यात आले. मात्र, त्या दुकान गाळ्या पुढील अतिक्रमणे काढण्यापूर्वीच त्याचे लिलाव करण्यात आले. वेळेत अतिक्रमण न निघाल्याने पालिकेचे उत्पन्न घटले. याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. कऱ्हाड शहराची हद्दवाढीचे श्रेय कोणीही घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी उंडाळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पालिकेत आणून हा प्रश्न मांडला होता. (प्रतिनिधी) थांबा आणि पाहा..! तालुक्यातील आपल्या राजकीय आघाडीप्रमाणे शहराच्या तुमच्या या आघाडीत कोण-कोण समाविष्ट होणार, याबाबत उंडाळकरांना छेडले असता, ‘बरेच लोक येणार आहेत. सगळे पत्ते आत्ता ओपन करता येणार नाहीत. जरा सबुरीने घ्या. थांबा आणि पाहा. सर्व चित्र स्पष्ट होईल,’ असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले.