शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात शहर विकास आघाडी रिंगणात

By admin | Updated: October 3, 2016 00:27 IST

विलासराव पाटील-उंडाळकर : पारदर्शी कारभारासाठी स्वच्छ प्रतिनिधी पाठवा

कऱ्हाड : ‘येत्या नगरपालिका निवडणुकीत कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडी रिंगणात उतरणार असून, पालिकेच्या पारदर्शी कारभारासाठी चांगले प्रतिनिधी तेथे पाठविण्याचा आमचा मानस आहे. ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्या सर्वांना आमची दारे खुली असून जात, पात न पाहता तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी देणार आहे,’ असे मत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी व्यक्त केले. कऱ्हाड येथे आघाडीची घोषणा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अशोक भोसले, कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक मजहर कागदी, सचिव माजी नगरसेविका सावित्री मुठेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब मोहिते, प्रकाश जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. विलासराव पाटील-उंडाळकर म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात कऱ्हाड शहराचा समावेश झाल्यानंतर पाच वर्षे आमदार म्हणून शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. माझ्या पद्धतीने मी भरपूर काम करण्याचा प्रयत्न केला; पण यशवंतराव चव्हाणांचा वारसा आणि चांगली संस्कृती असणाऱ्या शहराचे सामाजिक स्वास्थ्य आज बिघडलेले आहे. नकारात्मक विचारसरणीच्या विकासात्मक आघाड्या शहरात काम करीत असून, त्यामुळेच आज शहराच्या विकासाचे चित्र धुसर दिसत आहे. त्यामुळे कऱ्हाड शहर नगरविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. फक्त या निवडणुका खुल्या वातावरणात, धनशक्तीला न जुमानता झाल्या पाहिजेत, ही अपेक्षा आहे. म्हणूनच दसऱ्याच्या मुहूर्तावर याची मुद्दाम घोषणा केली आहे. आघाडीचा स्वतंत्र जाहीरनामा योग्यवेळी लोकांपर्यंत पोहोचवू.’ अशोक भोसले म्हणाले, ‘कऱ्हाड शहराची अवस्था आज बकाल झाली आहे. याला सत्ताधाऱ्यांचा गलथान कारभार कारणीभूत आहे. शहरातील कचऱ्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. विलासराव पाटील यांनी पार्ले येथे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पंचवीस एकर जागा पालिकेला मिळवून दिली; पण काही राजकीय मंडळींनी त्याला विरोध केल्याने कचऱ्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. पालिकेच्या वतीने मंडई परिसरात दुकान गाळे बांधण्यात आले. मात्र, त्या दुकान गाळ्या पुढील अतिक्रमणे काढण्यापूर्वीच त्याचे लिलाव करण्यात आले. वेळेत अतिक्रमण न निघाल्याने पालिकेचे उत्पन्न घटले. याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. कऱ्हाड शहराची हद्दवाढीचे श्रेय कोणीही घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी उंडाळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पालिकेत आणून हा प्रश्न मांडला होता. (प्रतिनिधी) थांबा आणि पाहा..! तालुक्यातील आपल्या राजकीय आघाडीप्रमाणे शहराच्या तुमच्या या आघाडीत कोण-कोण समाविष्ट होणार, याबाबत उंडाळकरांना छेडले असता, ‘बरेच लोक येणार आहेत. सगळे पत्ते आत्ता ओपन करता येणार नाहीत. जरा सबुरीने घ्या. थांबा आणि पाहा. सर्व चित्र स्पष्ट होईल,’ असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले.