शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीनंतर निसर्गाच्या प्रकोपाने अंगावर येतोय शहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:40 IST

कुडाळ : जावळी तालुक्यातील जोरदार अतिवृष्टीमुळे केळघर आणि परिसरात अक्षरशः निसर्गाचा प्रकोप झाला. रस्ते, पूल वाहून गेले. ओढ्यांचे नैसर्गिक ...

कुडाळ : जावळी तालुक्यातील जोरदार अतिवृष्टीमुळे केळघर आणि परिसरात अक्षरशः निसर्गाचा प्रकोप झाला. रस्ते, पूल वाहून गेले. ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाहच बदलले. भातशेती नावापुरतीच राहिली. डोंगरदऱ्यांतून धो-धो कोसळत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने सारेच वाहून नेले. असं आक्रित कवा घडलंच नाही, असा वरुणराजाचा प्रकोप झाला. केळघरच्या रावजीबुआ पुलावरूनही पाणी गेलं अन वेण्णामाईचा रौद्रभीषण अवतार बघून जावळीकरांच्या काळजात अगदी धस्स झालं.

जावळी तालुक्यातील पाचजण या निसर्गाच्या विळख्यात सापडले. पावसात घराची वाट धरली असताना ओढा ओलांडतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. रेंगडीवाडी या छोट्याशा गावातील सहदेव कासुर्डे यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांसह तिघाजणांना जीव गमवावा लागला. मुंबईहून भातलावणीसाठी आलेल्या रवींद्रची आईवडिलांसोबत शेवटचीच भातलावण ठरली. आई भागाबाई, वडील सहदेव आणि चुलती तानाबाई यांच्यासह ओढा ओलांडताना रवींद्रही पुराच्या पाण्यात वाहून गेला.

ही घटना समजल्यावर सारा गाव सुन्न झाला. गुरुवारचा दिवस रेंगडीकरांना नव्हे तर संपूर्ण जावळीकरांसाठी काळरात्रच बनून आला होता. अस काही आक्रित घडेल असे वाटलेही नाही. पावसाने हाहाकार केला होता. चार दिवस मृतदेहांची शोधाशोध अखेर सोमवारी (दि. २६) रवींद्रचा मृतदेह हाती लागला आणि थांबली. या काळात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, सागर धनावडे, नाना जांभळे, शिवेंद्रसिंहराजे मित्रसमूह भागातील युवावर्ग, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्याधिकारी भगवान मोहिते, आदींनी प्रयत्नांची शिकस्त करीत लोकांना धीर देत मदत केली. या भीषण काळात संकटाचा सामना करण्यासाठी समस्त जावळीकर एकवटले आणि माणुसकी जोपासत त्यांनी सामाजिकतेचे दर्शन घडविले.

पावसाळा सुरू झाला की भातलागणीची भागात लगबग सुरू होते. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने सारेच हवालदिल झाले होते. लोकांचीही भातलागणीची कामे नुकतीच सुरू झाली होती. अशातच गेल्या आठवड्यात पावसाने हाहाकार माजविला. दोन-तीन दिवस एवढा काय वरुणराजा बरसला की आजवर असा कधी कोसळलाच नाही! यातच हसत्या-खेळत्या कासुर्डे कुटुंबाची वाताहत झाली. घरातील दोन कर्त्या पुरुषांचा पुरात अंत झाला. सारे कुटुंब उद्विग्न होऊन गेले. वयाच्या अवघ्या तिशीतला रवींद्र हरपला. घरातील तीन लहान मुली, पत्नी अजूनही रवींद्रच्या येण्याची आस लावून बसली होती. भाऊ गणेश पुरता कोसळला.

चौकट

निसर्गाने साथ सोडली तरी माणुसकी जिवंत

निसर्गाच्या रुद्रावताराचा या कुटुंबाला फार मोठा फटका बसला. जावळीकरांची माणुसकी, सामाजिकता या साऱ्यांना धीर देण्यासाठी पुढे सरसावली. अनेक मदतीचे हात पुढे आले. पूरग्रस्तांना मदतीसाठी माणुसकीचा हात मिळाला.