शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीनंतर निसर्गाच्या प्रकोपाने अंगावर येतोय शहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:40 IST

कुडाळ : जावळी तालुक्यातील जोरदार अतिवृष्टीमुळे केळघर आणि परिसरात अक्षरशः निसर्गाचा प्रकोप झाला. रस्ते, पूल वाहून गेले. ओढ्यांचे नैसर्गिक ...

कुडाळ : जावळी तालुक्यातील जोरदार अतिवृष्टीमुळे केळघर आणि परिसरात अक्षरशः निसर्गाचा प्रकोप झाला. रस्ते, पूल वाहून गेले. ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाहच बदलले. भातशेती नावापुरतीच राहिली. डोंगरदऱ्यांतून धो-धो कोसळत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने सारेच वाहून नेले. असं आक्रित कवा घडलंच नाही, असा वरुणराजाचा प्रकोप झाला. केळघरच्या रावजीबुआ पुलावरूनही पाणी गेलं अन वेण्णामाईचा रौद्रभीषण अवतार बघून जावळीकरांच्या काळजात अगदी धस्स झालं.

जावळी तालुक्यातील पाचजण या निसर्गाच्या विळख्यात सापडले. पावसात घराची वाट धरली असताना ओढा ओलांडतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. रेंगडीवाडी या छोट्याशा गावातील सहदेव कासुर्डे यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांसह तिघाजणांना जीव गमवावा लागला. मुंबईहून भातलावणीसाठी आलेल्या रवींद्रची आईवडिलांसोबत शेवटचीच भातलावण ठरली. आई भागाबाई, वडील सहदेव आणि चुलती तानाबाई यांच्यासह ओढा ओलांडताना रवींद्रही पुराच्या पाण्यात वाहून गेला.

ही घटना समजल्यावर सारा गाव सुन्न झाला. गुरुवारचा दिवस रेंगडीकरांना नव्हे तर संपूर्ण जावळीकरांसाठी काळरात्रच बनून आला होता. अस काही आक्रित घडेल असे वाटलेही नाही. पावसाने हाहाकार केला होता. चार दिवस मृतदेहांची शोधाशोध अखेर सोमवारी (दि. २६) रवींद्रचा मृतदेह हाती लागला आणि थांबली. या काळात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, सागर धनावडे, नाना जांभळे, शिवेंद्रसिंहराजे मित्रसमूह भागातील युवावर्ग, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्याधिकारी भगवान मोहिते, आदींनी प्रयत्नांची शिकस्त करीत लोकांना धीर देत मदत केली. या भीषण काळात संकटाचा सामना करण्यासाठी समस्त जावळीकर एकवटले आणि माणुसकी जोपासत त्यांनी सामाजिकतेचे दर्शन घडविले.

पावसाळा सुरू झाला की भातलागणीची भागात लगबग सुरू होते. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने सारेच हवालदिल झाले होते. लोकांचीही भातलागणीची कामे नुकतीच सुरू झाली होती. अशातच गेल्या आठवड्यात पावसाने हाहाकार माजविला. दोन-तीन दिवस एवढा काय वरुणराजा बरसला की आजवर असा कधी कोसळलाच नाही! यातच हसत्या-खेळत्या कासुर्डे कुटुंबाची वाताहत झाली. घरातील दोन कर्त्या पुरुषांचा पुरात अंत झाला. सारे कुटुंब उद्विग्न होऊन गेले. वयाच्या अवघ्या तिशीतला रवींद्र हरपला. घरातील तीन लहान मुली, पत्नी अजूनही रवींद्रच्या येण्याची आस लावून बसली होती. भाऊ गणेश पुरता कोसळला.

चौकट

निसर्गाने साथ सोडली तरी माणुसकी जिवंत

निसर्गाच्या रुद्रावताराचा या कुटुंबाला फार मोठा फटका बसला. जावळीकरांची माणुसकी, सामाजिकता या साऱ्यांना धीर देण्यासाठी पुढे सरसावली. अनेक मदतीचे हात पुढे आले. पूरग्रस्तांना मदतीसाठी माणुसकीचा हात मिळाला.