शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

अतिवृष्टीनंतर निसर्गाच्या प्रकोपाने अंगावर येतोय शहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:40 IST

कुडाळ : जावळी तालुक्यातील जोरदार अतिवृष्टीमुळे केळघर आणि परिसरात अक्षरशः निसर्गाचा प्रकोप झाला. रस्ते, पूल वाहून गेले. ओढ्यांचे नैसर्गिक ...

कुडाळ : जावळी तालुक्यातील जोरदार अतिवृष्टीमुळे केळघर आणि परिसरात अक्षरशः निसर्गाचा प्रकोप झाला. रस्ते, पूल वाहून गेले. ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाहच बदलले. भातशेती नावापुरतीच राहिली. डोंगरदऱ्यांतून धो-धो कोसळत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने सारेच वाहून नेले. असं आक्रित कवा घडलंच नाही, असा वरुणराजाचा प्रकोप झाला. केळघरच्या रावजीबुआ पुलावरूनही पाणी गेलं अन वेण्णामाईचा रौद्रभीषण अवतार बघून जावळीकरांच्या काळजात अगदी धस्स झालं.

जावळी तालुक्यातील पाचजण या निसर्गाच्या विळख्यात सापडले. पावसात घराची वाट धरली असताना ओढा ओलांडतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. रेंगडीवाडी या छोट्याशा गावातील सहदेव कासुर्डे यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांसह तिघाजणांना जीव गमवावा लागला. मुंबईहून भातलावणीसाठी आलेल्या रवींद्रची आईवडिलांसोबत शेवटचीच भातलावण ठरली. आई भागाबाई, वडील सहदेव आणि चुलती तानाबाई यांच्यासह ओढा ओलांडताना रवींद्रही पुराच्या पाण्यात वाहून गेला.

ही घटना समजल्यावर सारा गाव सुन्न झाला. गुरुवारचा दिवस रेंगडीकरांना नव्हे तर संपूर्ण जावळीकरांसाठी काळरात्रच बनून आला होता. अस काही आक्रित घडेल असे वाटलेही नाही. पावसाने हाहाकार केला होता. चार दिवस मृतदेहांची शोधाशोध अखेर सोमवारी (दि. २६) रवींद्रचा मृतदेह हाती लागला आणि थांबली. या काळात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, सागर धनावडे, नाना जांभळे, शिवेंद्रसिंहराजे मित्रसमूह भागातील युवावर्ग, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्याधिकारी भगवान मोहिते, आदींनी प्रयत्नांची शिकस्त करीत लोकांना धीर देत मदत केली. या भीषण काळात संकटाचा सामना करण्यासाठी समस्त जावळीकर एकवटले आणि माणुसकी जोपासत त्यांनी सामाजिकतेचे दर्शन घडविले.

पावसाळा सुरू झाला की भातलागणीची भागात लगबग सुरू होते. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने सारेच हवालदिल झाले होते. लोकांचीही भातलागणीची कामे नुकतीच सुरू झाली होती. अशातच गेल्या आठवड्यात पावसाने हाहाकार माजविला. दोन-तीन दिवस एवढा काय वरुणराजा बरसला की आजवर असा कधी कोसळलाच नाही! यातच हसत्या-खेळत्या कासुर्डे कुटुंबाची वाताहत झाली. घरातील दोन कर्त्या पुरुषांचा पुरात अंत झाला. सारे कुटुंब उद्विग्न होऊन गेले. वयाच्या अवघ्या तिशीतला रवींद्र हरपला. घरातील तीन लहान मुली, पत्नी अजूनही रवींद्रच्या येण्याची आस लावून बसली होती. भाऊ गणेश पुरता कोसळला.

चौकट

निसर्गाने साथ सोडली तरी माणुसकी जिवंत

निसर्गाच्या रुद्रावताराचा या कुटुंबाला फार मोठा फटका बसला. जावळीकरांची माणुसकी, सामाजिकता या साऱ्यांना धीर देण्यासाठी पुढे सरसावली. अनेक मदतीचे हात पुढे आले. पूरग्रस्तांना मदतीसाठी माणुसकीचा हात मिळाला.