शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांची सर्कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST

सातारा : राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर फळ विक्रेते बसलेले असतात. याबाबत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे वाहन आले, तर विक्रेते ...

सातारा : राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर फळ विक्रेते बसलेले असतात. याबाबत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे वाहन आले, तर विक्रेते इतरत्र पळून जातात. वाहन गेले की पुन्हा रस्त्यावर येतात. त्यांची दिवसभर ही सर्कस सुरूच असते. पण मंडईत जाण्याची मानसिकता होत नाही.

०००००००

खड्ड्यामुळे धोका

सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावरील रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र बसस्थानकाकडे जाणारा भुयारी रस्ता संपतो तेथेच मोठमोठे दोन-तीन खड्डे पडले आहेत. या ठिकाणी सुसाट वाहने अचानक खड्डा अडवा आल्यानंतर तो चुकविण्यासाठी वाहने आडवी-तिडवी नेत असतात. पाठीमागून आलेल्या वाहनचालकांची फसगत होत असते. यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे.

०००००

दुचाकींची घसरगुंडी

सातारा : साताऱ्यातील अनेक भागात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. मात्र त्यासाठीची वाळू रस्त्यावरच साठ केला जातो. मात्र काम झाल्यानंतर पडलेली वाळू तशीच पडून असते. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहे. सायकलही पडत आहेत.

०००

मैदान फुलले

सातारा : कोरोनानंतर मार्चपासून मैदाने खेळासाठी बंद ठेवली होती. आता निर्बंध हटत असल्याने मुलंही मैदानावर खेळासाठी जात आहेत. शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर दररोज सायंकाळी मोठ्या संख्येने मुलं खेळण्यासाठी जात असतात. त्यामुळे मैदाने फुलली आहेत.

००००००

उरमोडी नदीवर पूल बांधण्याची मागणी

सातारा : साठेवाडीनजिक उरमोडी नदीवर पूल बांधण्याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज उरमोडी पूल समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण, सदस्य जगन्नाथ कदम, राजकुमार पाटील, संकेत माने यांनी हे निवेदन दिले. यामध्ये अनेक कामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

०००००

वाहनांमुळे ध्वनीप्रदूषण

सातारा : साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाजवळ कोल्हापूरकडून येणारा रस्ता अरुंद होत असतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. प्रत्येकालाच पुढे जायची घाई असते. त्यामुळे वाहनचालक या ठिकाणी मोठमोठ्याने हॉर्न वाजवत असतात. त्यामुळे ध्वनीप्रदूषण होत असते.

०००००

ग्रामीण भागात गाड्या

सातारा : कोरोना काळात एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर दिवाळीत एसटी सुरू झाली; पण शाळा-महाविद्यालयेच बंद असल्याने ग्रामीण भागात एसटी जात नव्हती. आता राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या ग्रामीण व दुर्गम भागातही धावत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची सोय होत आहे.