शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
4
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
5
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
6
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
7
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
8
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
9
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
10
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
11
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
12
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
13
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
14
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
15
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
16
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
17
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
18
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
19
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
20
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा

विक्रेत्यांची सर्कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST

सातारा : राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर फळ विक्रेते बसलेले असतात. याबाबत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे वाहन आले, तर विक्रेते ...

सातारा : राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर फळ विक्रेते बसलेले असतात. याबाबत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे वाहन आले, तर विक्रेते इतरत्र पळून जातात. वाहन गेले की पुन्हा रस्त्यावर येतात. त्यांची दिवसभर ही सर्कस सुरूच असते. पण मंडईत जाण्याची मानसिकता होत नाही.

०००००००

खड्ड्यामुळे धोका

सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावरील रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र बसस्थानकाकडे जाणारा भुयारी रस्ता संपतो तेथेच मोठमोठे दोन-तीन खड्डे पडले आहेत. या ठिकाणी सुसाट वाहने अचानक खड्डा अडवा आल्यानंतर तो चुकविण्यासाठी वाहने आडवी-तिडवी नेत असतात. पाठीमागून आलेल्या वाहनचालकांची फसगत होत असते. यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे.

०००००

दुचाकींची घसरगुंडी

सातारा : साताऱ्यातील अनेक भागात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. मात्र त्यासाठीची वाळू रस्त्यावरच साठ केला जातो. मात्र काम झाल्यानंतर पडलेली वाळू तशीच पडून असते. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहे. सायकलही पडत आहेत.

०००

मैदान फुलले

सातारा : कोरोनानंतर मार्चपासून मैदाने खेळासाठी बंद ठेवली होती. आता निर्बंध हटत असल्याने मुलंही मैदानावर खेळासाठी जात आहेत. शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर दररोज सायंकाळी मोठ्या संख्येने मुलं खेळण्यासाठी जात असतात. त्यामुळे मैदाने फुलली आहेत.

००००००

उरमोडी नदीवर पूल बांधण्याची मागणी

सातारा : साठेवाडीनजिक उरमोडी नदीवर पूल बांधण्याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज उरमोडी पूल समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण, सदस्य जगन्नाथ कदम, राजकुमार पाटील, संकेत माने यांनी हे निवेदन दिले. यामध्ये अनेक कामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

०००००

वाहनांमुळे ध्वनीप्रदूषण

सातारा : साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाजवळ कोल्हापूरकडून येणारा रस्ता अरुंद होत असतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. प्रत्येकालाच पुढे जायची घाई असते. त्यामुळे वाहनचालक या ठिकाणी मोठमोठ्याने हॉर्न वाजवत असतात. त्यामुळे ध्वनीप्रदूषण होत असते.

०००००

ग्रामीण भागात गाड्या

सातारा : कोरोना काळात एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर दिवाळीत एसटी सुरू झाली; पण शाळा-महाविद्यालयेच बंद असल्याने ग्रामीण भागात एसटी जात नव्हती. आता राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या ग्रामीण व दुर्गम भागातही धावत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची सोय होत आहे.