शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

दुष्काळ निधी घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : माण, खटाव पीक नुकसान अनुदानात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यातील दोषी अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सीआयडी चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन पक्षांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांकडे मागणी केली.सातारा जिल्ह्यात दुष्काळाने होरपळणाºया तालुक्यांसाठी आलेल्या दुष्काळ निधीत कोट्यवधींचा घोटाळा ही संतापजनक बाब ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : माण, खटाव पीक नुकसान अनुदानात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यातील दोषी अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सीआयडी चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन पक्षांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांकडे मागणी केली.सातारा जिल्ह्यात दुष्काळाने होरपळणाºया तालुक्यांसाठी आलेल्या दुष्काळ निधीत कोट्यवधींचा घोटाळा ही संतापजनक बाब असून या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.जाधव म्हणाले, दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना सरकारने केलेली मदत ही शेतकºयांपर्यंत न पोहोचता त्याचा मलिदा लाटण्याचे काम झाले आहे. हा मलिदा लाटण्यामध्ये अधिकारी असल्याचे समोर येत आहे. खटाव तालुक्याव्यतिरिक्त जिल्ह्यातील कोरेगाव, फलटण, खंडाळा, माण या दुष्काळी तालुक्यातही अशा प्रकारचा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. स्थानिक राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हा घोटाळा होऊच शकत नाही. यात राजकीय मोठे मासे असण्याची शक्यता असल्याने या घोटाळ्याची चौकशी अधिकाºयांपुरती मर्यादित न ठेवता या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करून खºया सूत्रधारांचा शोध घेतला पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्याच्या विकास निधीमध्ये पहिल्यापासूनच दुष्काळी तालुके असल्याचे कारण पुढे करत भरमसाठ निधी दुष्काळी तालुक्यात वळविला जातो; परंतु वारंवार असे दिसून आले आहे की, हा निधी नेमका त्या त्या कारणासाठी त्या भागात खर्च होत नाही. त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आहे. अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून स्वत:ची घरे भरण्याचा उद्योग करणाºया अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अर्जुनराव साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष राजू शेळके, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, सुकाणू समितीचे अध्यक्ष अलीभाई इनामदार, कºहाड तालुकाध्यक्ष देवानंद पाटील, उपाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, कºहाड दक्षिण अध्यक्ष सचिन नलवडे, जीवन शिर्के, संजय साबळे, आस्लम फरास, हणमंत मोरे, सचिन मोरे, अनिल साळुंखे, दीपक चव्हाण, जनार्दन आवारे, सुनील साळुंखे, आनंद फडके, कल्याण जगताप, गणेश लांडगे, बाळकृष्ण शेडगे, बाळकृष्ण चव्हाण, संदीप पाटील आदी उपस्थित होते.लाटलेला निधी तहसीलदारांच्या परिवाराकडेसातारा : खटाव तालुक्याच्या दुष्काळी जनतेसाठी आलेला निधी तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळे यांनी त्यांच्या मित्रपरिवाराच्या मदतीने लाटला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी बुधवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात केली. आमदार शिंदे म्हणाले, ‘दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारसह विरोधकही प्रयत्न करत आहे. यासाठी मोठा निधी मंजूर केला जात आहे. मात्र, निधीचा गैरवापर करण्याचे पाप काही अधिकारी करत आहेत. दुष्काळी जनतेसाठी मंजूर केलेल्या निधीवर अधिकाºयांनी डल्ला मारला आहे. अडीच कोटी रुपयांचा अपहार करताना तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळे यांनी मित्र आणि परिवाराच्या बँक खात्यांचा वापर केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी.’