शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

दुष्काळ निधी घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : माण, खटाव पीक नुकसान अनुदानात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यातील दोषी अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सीआयडी चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन पक्षांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांकडे मागणी केली.सातारा जिल्ह्यात दुष्काळाने होरपळणाºया तालुक्यांसाठी आलेल्या दुष्काळ निधीत कोट्यवधींचा घोटाळा ही संतापजनक बाब ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : माण, खटाव पीक नुकसान अनुदानात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यातील दोषी अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सीआयडी चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन पक्षांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांकडे मागणी केली.सातारा जिल्ह्यात दुष्काळाने होरपळणाºया तालुक्यांसाठी आलेल्या दुष्काळ निधीत कोट्यवधींचा घोटाळा ही संतापजनक बाब असून या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.जाधव म्हणाले, दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना सरकारने केलेली मदत ही शेतकºयांपर्यंत न पोहोचता त्याचा मलिदा लाटण्याचे काम झाले आहे. हा मलिदा लाटण्यामध्ये अधिकारी असल्याचे समोर येत आहे. खटाव तालुक्याव्यतिरिक्त जिल्ह्यातील कोरेगाव, फलटण, खंडाळा, माण या दुष्काळी तालुक्यातही अशा प्रकारचा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. स्थानिक राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हा घोटाळा होऊच शकत नाही. यात राजकीय मोठे मासे असण्याची शक्यता असल्याने या घोटाळ्याची चौकशी अधिकाºयांपुरती मर्यादित न ठेवता या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करून खºया सूत्रधारांचा शोध घेतला पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्याच्या विकास निधीमध्ये पहिल्यापासूनच दुष्काळी तालुके असल्याचे कारण पुढे करत भरमसाठ निधी दुष्काळी तालुक्यात वळविला जातो; परंतु वारंवार असे दिसून आले आहे की, हा निधी नेमका त्या त्या कारणासाठी त्या भागात खर्च होत नाही. त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आहे. अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून स्वत:ची घरे भरण्याचा उद्योग करणाºया अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अर्जुनराव साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष राजू शेळके, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, सुकाणू समितीचे अध्यक्ष अलीभाई इनामदार, कºहाड तालुकाध्यक्ष देवानंद पाटील, उपाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, कºहाड दक्षिण अध्यक्ष सचिन नलवडे, जीवन शिर्के, संजय साबळे, आस्लम फरास, हणमंत मोरे, सचिन मोरे, अनिल साळुंखे, दीपक चव्हाण, जनार्दन आवारे, सुनील साळुंखे, आनंद फडके, कल्याण जगताप, गणेश लांडगे, बाळकृष्ण शेडगे, बाळकृष्ण चव्हाण, संदीप पाटील आदी उपस्थित होते.लाटलेला निधी तहसीलदारांच्या परिवाराकडेसातारा : खटाव तालुक्याच्या दुष्काळी जनतेसाठी आलेला निधी तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळे यांनी त्यांच्या मित्रपरिवाराच्या मदतीने लाटला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी बुधवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात केली. आमदार शिंदे म्हणाले, ‘दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारसह विरोधकही प्रयत्न करत आहे. यासाठी मोठा निधी मंजूर केला जात आहे. मात्र, निधीचा गैरवापर करण्याचे पाप काही अधिकारी करत आहेत. दुष्काळी जनतेसाठी मंजूर केलेल्या निधीवर अधिकाºयांनी डल्ला मारला आहे. अडीच कोटी रुपयांचा अपहार करताना तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळे यांनी मित्र आणि परिवाराच्या बँक खात्यांचा वापर केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी.’