शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

दराअभावी कांदा पुन्हा शिवारातल्या चाळीत!

By admin | Updated: May 6, 2016 01:17 IST

शेतकरी चिंतेत : दुष्काळात तेरावा महिना त्याप्रमाणे अवस्था; शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ जमेना

खटाव : एकीकडे दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकरी वर्गाला बिकट आर्थिक परिस्थिीला ही तोंड द्यावे लागत आहे. बाजारात कांद्याचे भाव वधारल्यानंतर बऱ्याच शेतकरी वर्गाने कांद्याची लागवड केली. कांद्याचे उत्पादनही वाढले; परंतु बाजारात कांद्याचे भाव उतरल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तर बहुतांश शेतकरी वर्गाने निघालेला कांदा चाळीत भरून ठेवला आहे. कांदा हे पीक बागायती म्हणून ओळखले जाते. खटाव तालुक्यात बहुतांश शेतकरी कांद्याची लागवड करतात. कांदा लागवडी पासून ते त्याच्या काढणीपर्यंत शेतकरी वर्गाला येणारा खर्च पाहता आज कांद्याला बाजारात मिळणारा दर आणि झालेला खर्च यांचा ताळमेळ घातला तर शेतकरी वर्ग पुरता अडचणीत येत आहे. एक वेळ कांद्याचा उच्चांकी दर झाल्यानंतर पुन्हा कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी वर्गाने आता उत्पादित केलेला कांदा चाळीत भरण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन खर्च आणि विक्रीतून येणारी रक्कम पाहता झालेला खर्चही निघत नसल्यामुळे योग्य दर येईपर्यंत तो सुरक्षित कांदा चाळीत ठेवण्याचा निर्णय शेतकरी वर्गाने घेतला आहे. रब्बी हंगामात ज्यांना पाण्याची सोय आहे त्या शेतकरी वर्गाने कांद्याची लागण केली आणि ज्याच्याकडे ती सोय नाही त्यांनी रब्बी ज्वारी, गव्हाचे उत्पादन केले; परंतु कांदा उत्पादन केलेल्या शेतकऱ्याला मात्र या उतरलेल्या दरामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. घरात असणाऱ्या दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे. सध्या तरी शेतकरी वर्गाने कांदाचाळीचा आधार घेऊन कांदा ठेवला आहे. आता त्याला प्रतीक्षा आहे, ती बाजारात दर वाढण्याची. (प्रतिनिधी)