शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डॉल्बीच्या विरोधात चिंधवलीचाही पुढाकार

By admin | Updated: May 29, 2015 23:48 IST

सर्व गट एकत्र : शुभकार्यात आशिर्वाद हवेत; शिव्याशाप नको

भुर्इंज : ‘डॉल्बीमुळे साताऱ्यात तिघांचे बळी गेले, खंडाळा तालुक्यातही एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे जीवावर उठलेल्या डॉल्बीला रोखणे गरजेचे झाले आहे. डॉल्बीच्या दणदणाटाने ग्रामीण भागात तर जुनी घरे ढासळतील की काय? अशी भीती वाटते, त्यामुळेच गावात डॉल्बीबंदी करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल,’ अशी माहिती चिंंधवली, ता. वाई गावच्या सरपंच माया पवार व उपसरंपच नारायण इथापे यांनी दिली.चिंधवली गावात डॉल्बीबंदी व्हावा यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यासाठी ग्रामसभेचा ठरावही करण्यात आला आहे. दिवसेंदिवस डॉल्बीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या भयानक स्वरुप धारण करत आहेत. विशेषत: वृद्ध, लहान मुले, रुग्ण यांना डॉल्बीचा भयानक त्रास सहन करावा लागत आहे. आनंदाच्या किंवा लग्नासारख्या शुभप्रसंगी लोकांचे वधू वरांना आशिर्वाद मिळाले पाहिजेत. आपल्या आनंदात इतरांनीही आनंदाने सहभागी झाले पाहिजे. मात्र, डॉल्बीमुळे शिव्याशाप मिळत आहेत. त्यामुळे ‘आशिर्वाद पाहिजेत की शिव्याशाप’ याचाही संबंधितांनी विचार करणे गरजेचे आहे. या विचारातूनच डॉल्बीबंदीच्या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पवार व इथापे यांनी केले आहे. (वार्ताहर)विरोधकही एकवटले...ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गटतटाचे राजकारण असते. सत्ताधाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी आमचा विरोध म्हणत विरोधक आडकाठी करत असतात. मात्र डॉल्बीचे दुष्परिणामच एवढे आहेत की डॉल्बीबंदीसाठी आमचा पाठिंबा म्हणत विरोधकही डॉल्बीबंदीच्या निर्णयात सहभागी होत आहेत.