शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बीच्या विरोधात चिंधवलीचाही पुढाकार

By admin | Updated: May 29, 2015 23:48 IST

सर्व गट एकत्र : शुभकार्यात आशिर्वाद हवेत; शिव्याशाप नको

भुर्इंज : ‘डॉल्बीमुळे साताऱ्यात तिघांचे बळी गेले, खंडाळा तालुक्यातही एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे जीवावर उठलेल्या डॉल्बीला रोखणे गरजेचे झाले आहे. डॉल्बीच्या दणदणाटाने ग्रामीण भागात तर जुनी घरे ढासळतील की काय? अशी भीती वाटते, त्यामुळेच गावात डॉल्बीबंदी करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल,’ अशी माहिती चिंंधवली, ता. वाई गावच्या सरपंच माया पवार व उपसरंपच नारायण इथापे यांनी दिली.चिंधवली गावात डॉल्बीबंदी व्हावा यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यासाठी ग्रामसभेचा ठरावही करण्यात आला आहे. दिवसेंदिवस डॉल्बीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या भयानक स्वरुप धारण करत आहेत. विशेषत: वृद्ध, लहान मुले, रुग्ण यांना डॉल्बीचा भयानक त्रास सहन करावा लागत आहे. आनंदाच्या किंवा लग्नासारख्या शुभप्रसंगी लोकांचे वधू वरांना आशिर्वाद मिळाले पाहिजेत. आपल्या आनंदात इतरांनीही आनंदाने सहभागी झाले पाहिजे. मात्र, डॉल्बीमुळे शिव्याशाप मिळत आहेत. त्यामुळे ‘आशिर्वाद पाहिजेत की शिव्याशाप’ याचाही संबंधितांनी विचार करणे गरजेचे आहे. या विचारातूनच डॉल्बीबंदीच्या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पवार व इथापे यांनी केले आहे. (वार्ताहर)विरोधकही एकवटले...ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गटतटाचे राजकारण असते. सत्ताधाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी आमचा विरोध म्हणत विरोधक आडकाठी करत असतात. मात्र डॉल्बीचे दुष्परिणामच एवढे आहेत की डॉल्बीबंदीसाठी आमचा पाठिंबा म्हणत विरोधकही डॉल्बीबंदीच्या निर्णयात सहभागी होत आहेत.