शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

चिमुकल्यांना चक्क अभ्यासाचाच विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोविड संसर्गाची बाधा नको म्हणून बच्चे कंपनी शाळेत गेलीच नाही. परिणामी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोविड संसर्गाची बाधा नको म्हणून बच्चे कंपनी शाळेत गेलीच नाही. परिणामी ही नुसती लुडबूड घरात राहून चक्क अभ्यास करणंच विसरू लागली आहे. अभ्यास चुकविण्यासाठी एकसे एक भन्नाट कारणं सांगून ऐन शैक्षणिक वर्ष सुरू झालं तरीही सुट्टीचा आनंद घेणारी चिमुरडी पालकांना अस्वस्थ करत आहेत.

कोविड काळात आॅनलाइन शाळा सुरू झाल्याने पूर्वीसारखं आवरून शाळेत जाणं, वर्गात लक्षपूर्वक शिकवलेलं ऐकणं, गृहपाठ करणं ही सवय मोडली आहे. आॅनलाइन वर्ग सुरू असताना घरात अन्य सदस्यांच्या हालचाली विद्यार्थ्यांना विचलित करत आहेत. त्यामुळे त्यांना शिकवलेलं लक्षात राहत नसल्याचं समोर आले आहे. कोविडचा काळ सरेपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे पालकांनी अधिक लक्ष देणं आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

चौकट :

ही असतात अभ्यास टाळण्याची कारणं :

तुला स्वयंपाकात मदत करतो

झाडांना पाणी घालतो

स्कूलचा ग्रुप बंद झाला. आता उद्याच अभ्यास करू

शिकवलेलं काही कळलंच नाही

आता थोडासा कंटाळा आलाय

थोडं एन्जॉय करू दे

खेळून आलो की अभ्यास करतो

आत्ता एकदम जाम बोरिंग होतंय

मोबाईलची बॅटरीच चार्ज नाही

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची अडचण

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना अवघ्या तीन ते चार वर्षांचाच शाळेचा अनुभव आहे.

गणवेशासह शाळेत जाणं, फळ्यावर शिक्षकांनी शिकवणं, वर्गमित्रांबरोबर दंगा करणं ही शाळेची संकल्पना आहे.

बालवाडी, छोटा आणि मोठा गट या वर्गातील मुलांना गेल्या दोन वर्षांत अभ्यासाचा कसलाच गंध राहिलेला नाही.

अक्षरओळखच्या नावाने ओरड

कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मार्च २०२० पासून शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यावेळी छोटा आणि मोठ्या गटात शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. नेमकं याच दोन वर्गांमध्ये मुलांना अक्षरओळख आणि हस्ताक्षराचा सराव करण्याचे तंत्र शाळांमध्ये शिकविले जाते. आॅनलाईन वर्ग सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदविला नाही. जे सहभागी झाले, त्यांनाही उभी आणि आडवी रेष सोडलं तर फारसं ज्ञान अर्जित करता आलं नाही. ही मुलं पहिली दुसरीत गेली तरीही त्यांच्या वाचनासह अक्षरओळखीची ओरड आहे.

मुलांच्या मनात अभ्यासाची धास्ती!

मुलांना शिकविण्याची आवश्यक असणारी शास्त्रीय पध्दत शिकविण्याची कला पालकांमध्ये नाही. त्यामुळे संयम तुटून मुलांवर ओरडणं, त्यांना शिक्षा करणं हे प्रकार घराघरांमध्ये वाढले आहेत. अभ्यासामुळे आपल्याला मानहानीला सामोरे जावं लागतंय, या धास्तीने मुलांच्या मनात अभ्यासाविषयी अधिक भीती बसली आहे.

कोट :

अभ्यास करण्यासाठी वाचणं आणि लिहिण्याएवढचं समजून घेणेही महत्त्वाचे आहे. आॅनलाईन वर्ग सुरू असला तरीही प्रत्येक पालकाकडे स्वतंत्र खोली नाही. एकाच घरात चार वेगवेगळ्या कृती सुरू असताना मुलांचे लक्ष केंद्रित होणे निव्वळ कठीण आहे. त्यामुळे त्यांना कितीही शिकवलं तरी त्याचा विसर पडणं हे स्वाभाविक आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी वेळ काढणं आवश्यक आहेच.

- डॉ. देवदत्त गायकवाड, सातारा

शाळा त्यांच्या पद्धतीने आॅनलाईन वर्ग घेत आहे. पण शाळेत जाऊन गृहपाठ दाखवणं आणि घरी बसून वर्गाच्या ग्रुपवर पाठवणं यात फरक आहे. माझी मुलगी अभ्यास टाळण्यासाठी एकसे एक भन्नाट कारणं शोधते. ग्रुप बंद झालाय आता पाठवून काय उपयोग, असं ती ऐकवते. अनेकदा अभ्यास नको म्हणून घर आवरायलाही तिचा पुढाकार असतो.

- अ‍ॅड. नीता फडतरे, सातारा

...........