शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

चिमुकल्यांच्या हाती चक्क कोयनेचा पाऊस!

By admin | Updated: July 6, 2014 00:31 IST

कोयनानगरमध्ये पोरखेळ : मुले ओततायत पर्जन्यमापकात पाणी

धीरज कदम, कोयनानगर : ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय,’ असा प्रश्न बालगीतातून विचारणाऱ्या चिमुकल्यांनी चक्क पर्जन्यमापकात बाटलीनं पाण्याची धार ओतून मुसळधार पाऊस पडल्याची नोंद करण्याचा चमत्कार केलाय खरा; पण या बाललीलांमुळे चुकीची आकडेवारी नोंद होऊन डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोयना परिसरात पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीवरूनच वीजनिर्मितीचं गणित सोडविलं जातं. पाऊस कमी झाला तर राज्यावर वीजटंचाईचं संकट येणार आणि त्याचा फटका उद्योगधंद्यांना बसणार, याची चिंता असल्यामुळे पावसाळ्यात त्यामुळे कोयना धरण क्षेत्रात किती पाऊस झाला, याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. साहजिकच कोयना धरण व्यवस्थापनावर पावसाची अचूक आकडेवारी ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. पर्जन्यमापन केंद्रांवर गेल्या वर्षीपर्यंत पावसाची नोंद ठेवण्याचे काम पर्जन्यमापक करत होते. पावसाळ्यात हे कर्मचारी स्वत: रोज पडणाऱ्या पावसाची आकडेवारी घेऊन त्याच्या अचूक नोंदी ठेवत असत. मात्र, यंदा त्यांना घरी बसवून कोयना धरण क्षेत्रात येणाऱ्या कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, बामणोली येथील केंद्रांवर अत्याधुनिक पर्जन्यमापन यंत्रणा बसविली आहे. यामुळे हवी तेव्हा पावसाची माहिती मिळत आहे. ही यंत्रणा स्वयंचलित असल्यामुळे त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. याचाच फायदा लहान मुले उठविताना दिसत आहे. खेळता-खेळता मुले पर्जन्यमापकाच्या भांड्याजवळ जातात आणि त्यात पाणी ओततात. या प्रकारामुळे पावसाची अचूक आकडेवारी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.सुरक्षेचे तीन तेरानवीन पर्जन्यमापन यंत्रणेमुळे हवी तेव्हा पावसाची आकडेवारी मिळत असली तरी त्याच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे पाहावयास मिळत आहे. लहान मुले पर्जन्यमापन यंत्राजवळ जातात आणि खेळता-खेळता त्या यंत्राच्या भांड्यात पाणी ओततात. त्यामुळे अनेकदा पावसाची आकडेवारी चुकीची नोंद होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात तासा-तासाला पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवावी लागते. वेळोवेळी येथील पावसाची आकडेवारी विविध शासकीय कार्यालयांना द्यावी लागते. त्यामुळे पर्जन्यमापन हे जबाबदारीचे काम असून अचूक नोंद करण्याची मोठी जबाबदारी असते.