शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

चिमुकल्यांच्या हाती चक्क कोयनेचा पाऊस!

By admin | Updated: July 6, 2014 00:31 IST

कोयनानगरमध्ये पोरखेळ : मुले ओततायत पर्जन्यमापकात पाणी

धीरज कदम, कोयनानगर : ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय,’ असा प्रश्न बालगीतातून विचारणाऱ्या चिमुकल्यांनी चक्क पर्जन्यमापकात बाटलीनं पाण्याची धार ओतून मुसळधार पाऊस पडल्याची नोंद करण्याचा चमत्कार केलाय खरा; पण या बाललीलांमुळे चुकीची आकडेवारी नोंद होऊन डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोयना परिसरात पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीवरूनच वीजनिर्मितीचं गणित सोडविलं जातं. पाऊस कमी झाला तर राज्यावर वीजटंचाईचं संकट येणार आणि त्याचा फटका उद्योगधंद्यांना बसणार, याची चिंता असल्यामुळे पावसाळ्यात त्यामुळे कोयना धरण क्षेत्रात किती पाऊस झाला, याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. साहजिकच कोयना धरण व्यवस्थापनावर पावसाची अचूक आकडेवारी ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. पर्जन्यमापन केंद्रांवर गेल्या वर्षीपर्यंत पावसाची नोंद ठेवण्याचे काम पर्जन्यमापक करत होते. पावसाळ्यात हे कर्मचारी स्वत: रोज पडणाऱ्या पावसाची आकडेवारी घेऊन त्याच्या अचूक नोंदी ठेवत असत. मात्र, यंदा त्यांना घरी बसवून कोयना धरण क्षेत्रात येणाऱ्या कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, बामणोली येथील केंद्रांवर अत्याधुनिक पर्जन्यमापन यंत्रणा बसविली आहे. यामुळे हवी तेव्हा पावसाची माहिती मिळत आहे. ही यंत्रणा स्वयंचलित असल्यामुळे त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. याचाच फायदा लहान मुले उठविताना दिसत आहे. खेळता-खेळता मुले पर्जन्यमापकाच्या भांड्याजवळ जातात आणि त्यात पाणी ओततात. या प्रकारामुळे पावसाची अचूक आकडेवारी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.सुरक्षेचे तीन तेरानवीन पर्जन्यमापन यंत्रणेमुळे हवी तेव्हा पावसाची आकडेवारी मिळत असली तरी त्याच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे पाहावयास मिळत आहे. लहान मुले पर्जन्यमापन यंत्राजवळ जातात आणि खेळता-खेळता त्या यंत्राच्या भांड्यात पाणी ओततात. त्यामुळे अनेकदा पावसाची आकडेवारी चुकीची नोंद होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात तासा-तासाला पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवावी लागते. वेळोवेळी येथील पावसाची आकडेवारी विविध शासकीय कार्यालयांना द्यावी लागते. त्यामुळे पर्जन्यमापन हे जबाबदारीचे काम असून अचूक नोंद करण्याची मोठी जबाबदारी असते.