शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

चिमुकल्यांच्या हाती चक्क कोयनेचा पाऊस!

By admin | Updated: July 6, 2014 00:31 IST

कोयनानगरमध्ये पोरखेळ : मुले ओततायत पर्जन्यमापकात पाणी

धीरज कदम, कोयनानगर : ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय,’ असा प्रश्न बालगीतातून विचारणाऱ्या चिमुकल्यांनी चक्क पर्जन्यमापकात बाटलीनं पाण्याची धार ओतून मुसळधार पाऊस पडल्याची नोंद करण्याचा चमत्कार केलाय खरा; पण या बाललीलांमुळे चुकीची आकडेवारी नोंद होऊन डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोयना परिसरात पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीवरूनच वीजनिर्मितीचं गणित सोडविलं जातं. पाऊस कमी झाला तर राज्यावर वीजटंचाईचं संकट येणार आणि त्याचा फटका उद्योगधंद्यांना बसणार, याची चिंता असल्यामुळे पावसाळ्यात त्यामुळे कोयना धरण क्षेत्रात किती पाऊस झाला, याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. साहजिकच कोयना धरण व्यवस्थापनावर पावसाची अचूक आकडेवारी ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. पर्जन्यमापन केंद्रांवर गेल्या वर्षीपर्यंत पावसाची नोंद ठेवण्याचे काम पर्जन्यमापक करत होते. पावसाळ्यात हे कर्मचारी स्वत: रोज पडणाऱ्या पावसाची आकडेवारी घेऊन त्याच्या अचूक नोंदी ठेवत असत. मात्र, यंदा त्यांना घरी बसवून कोयना धरण क्षेत्रात येणाऱ्या कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, बामणोली येथील केंद्रांवर अत्याधुनिक पर्जन्यमापन यंत्रणा बसविली आहे. यामुळे हवी तेव्हा पावसाची माहिती मिळत आहे. ही यंत्रणा स्वयंचलित असल्यामुळे त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. याचाच फायदा लहान मुले उठविताना दिसत आहे. खेळता-खेळता मुले पर्जन्यमापकाच्या भांड्याजवळ जातात आणि त्यात पाणी ओततात. या प्रकारामुळे पावसाची अचूक आकडेवारी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.सुरक्षेचे तीन तेरानवीन पर्जन्यमापन यंत्रणेमुळे हवी तेव्हा पावसाची आकडेवारी मिळत असली तरी त्याच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे पाहावयास मिळत आहे. लहान मुले पर्जन्यमापन यंत्राजवळ जातात आणि खेळता-खेळता त्या यंत्राच्या भांड्यात पाणी ओततात. त्यामुळे अनेकदा पावसाची आकडेवारी चुकीची नोंद होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात तासा-तासाला पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवावी लागते. वेळोवेळी येथील पावसाची आकडेवारी विविध शासकीय कार्यालयांना द्यावी लागते. त्यामुळे पर्जन्यमापन हे जबाबदारीचे काम असून अचूक नोंद करण्याची मोठी जबाबदारी असते.