शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

मुलं उतरणार ‘स्पर्धे’त!

By admin | Updated: May 27, 2016 00:02 IST

विद्यार्थ्यांचा कल : बारावीनंतर अनेकांनी निवडला स्पर्धा परीक्षांचा पर्याय--लोकमत सर्वेक्षण

सातारा : आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी देणारी अन् सर्वच विद्यार्थ्यांना ज्याची धास्ती असते ती बारावीची परीक्षा यशस्वी केल्यानंतर आता विद्यार्थी भविष्याची परीक्षा द्यायला सज्ज झाले आहेत. बारावीनंतर पुढे काय? या प्रश्नावर विद्यार्थ्यांना बोलतं केलं असता मेडिकल, इंजिनिअरींग, स्पर्धा परीक्षा व इतर अशा चार पर्यायांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा हा पर्याय निवडल्याचे समोर आले आहे.बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा कल नेमका कशात आहे, याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेत असे दिसून आले की, आता अनेक शासकीय क्षेत्रात नोकरभरतीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या माध्यमातून विविध पदे भरली जात आहेत. त्यामुळे नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. साहजिकच स्पर्धा परीक्षांकडे कल वाढला आहे. मेडिकल, इंजिनिअरींग, सी. ए. सी. एस., एम. बी. ए. या शाखेत प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. स्पर्धा परीक्षाच का?नोकरीच्या संधी जास्त असल्याने बारावीनंतर गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थीदेखील आता स्पर्धा परीक्षेकडे वळू लागले आहेत. इतर शाखेत जाण्यापेक्षा आर्टस्, कॉमर्सची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षा देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागला आहे.पदवी अन् स्पर्धा परीक्षांचा अभ्यास एकत्रकॉमर्स, आर्टस् शाखेत प्रवेश घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करता येऊ शकतो. बारावीनंतर पदवीसाठी तीन वर्षे लागतात. त्यामुळे या कालावधीत शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठीही वेळ मिळू शकतो. पदवी घेतल्यानंतर लगेच स्पर्धा परीक्षा देता येते. त्यामुळे नोकरी मिळविण्याच्या संधी जास्त असतात. म्हणून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळू लागले आहेत.वेळ आणि खर्चही वाचतोबारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरींग यासारख्या शाखेत प्रवेश घेतात. त्यांची स्वप्नं वेगळी असतात. मात्र, हे शिक्षण घेण्यासाठी खर्च जास्त असल्याने आता अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा पर्याय निवडत आहेत. त्यामानाने रेग्युलर शिक्षणाला फारसा खर्च येत नाही.स्पर्धेत मुलींचे प्रमाण जास्तस्पर्धा परीक्षा देणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण वाढू लागले आहे. विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून श्रेणी १, २ ची पदे भरली जातात. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. शालेय अभ्यासक्रमात गुंतून राहण्यापेक्षा तो वेळ स्पर्धा परीक्षेसाठी दिल्यास हमखास नोकरी मिळू शकते, हा विश्वास मुलींमध्ये पाहायला मिळतो.