शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुख्यमंत्री रोजगार योजनेला बँकांकडून खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:39 IST

सातारा : शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री रोजगार योजनेचा सातारा जिल्ह्यात खेळखंडोबा झाला आहे. १०० प्रकरणे दाखल केली, तर अवघ्या ...

सातारा : शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री रोजगार योजनेचा सातारा जिल्ह्यात खेळखंडोबा झाला आहे. १०० प्रकरणे दाखल केली, तर अवघ्या तीन प्रकरणांनाच बँकांकडून मंजुरी मिळत असल्याचे चित्र असून, गरजूंवर अन्याय होताना पहायला मिळतो आहे. शासनाच्या योजना केवळ कागदोपत्री राहण्याची भीती यातून स्पष्टपणे पुढे येताना दिसत आहे.

राज्यातील नवीन उद्योजकांना भागभांडवल देऊन त्यांना उभारी देण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या भांडवलातून उद्योग निर्मितीचे स्वप्न करणारे अनेक बेरोजगार पुढे आले. खादी ग्रामोद्योग तसेच जिल्हा रोजगार कार्यालयाकडे त्यांनी प्रस्ताव सादर केले. तब्बल ९०० प्रस्ताव दाखल झाले असले तरी २०२०-२१ या आर्थिक वर्षात केवळ ७० प्रस्ताव बँकांनी मंजूर केले आहेत. उर्वरित प्रस्तावांना केराची टोपली दाखवली आहे.

वास्तविक, ही योजना सुशिक्षित बेरोजगारांना बळ मिळावे. या हेतूने सुरू झालेली आहे. ज्याच्याकडे काहीच नाही, त्याला संधी देण्यासाठी शासनाने तयारी केली असताना बँकांकडे येणारे प्रस्ताव नामंजूर करण्यावरच बँकांनी भर दिल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. नवीन उद्योजकाकडे बॅलन्स शीट, आयटी रिटर्न मागितली जाते आहे. प्रस्तावधारक वारंवार हेलपाटे मारत असतानादेखील बँका प्रस्तावकाशी संपर्क होऊ शकलेला नाही, अथवा प्रस्ताव दाखल करणारे बँकेत आले नाहीत, अशी कारणे दाखवून कर्ज नामंजूर केले जाते. शासनाचे उद्योग निरीक्षक वारंवार पाठपुरावा करत असले तरी बँका त्यांनाही दाद देत नसल्याचे चित्र आहे.

गतवर्षभरात उद्योगांकडून बँकांना दिलेले प्रस्ताव

९००

गत वर्षभरात बँकांकडून मंजूर झालेले प्रस्ताव

७०

जिल्हा अग्रणी बँक अधिकाऱ्याचा कोट...

कोरोना महामारीच्या काळातच ही योजना सुरू झाली. उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत. यासाठी तालुकानिहाय बैठका घेऊन आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

- युवराज पाटील, अग्रणी बँक अधिकारी

प्रस्ताव रद्द करताना दिली जातात कारणे

जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योग महामंडळावर मुख्यमंत्री रोजगार योजनेची जबाबदारी आहे. सर्वच तालुक्यांतून या योजनेसाठी उद्योजकांचे अर्ज यावेत, यासाठी या दोन्ही कार्यालयांतर्फे प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अनेक प्रस्ताव प्रस्ताव दाखल करणाऱ्यांनी केवळ बँकेच्या शाखेला भेट दिली नाही, म्हणून प्रस्ताव नामंजूर केले आहेत. हे उद्योजक नवीन असतानादेखील त्यांना बॅलन्स शीट, आयटी रिटर्न मागितले जात आहेत. आम्ही बँकांकडे वारंवार पाठपुरावा केला; परंतु बँका प्रतिसाद देत नाहीत, अशी माहिती जिल्हा उद्योग अधिकारी संदीप रोकडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

डमी : सीएम रोजगार योजना ५ फेब्रुवारी

फाेटो : रोजगार प्रूफला