शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

मुख्यमंत्री रोजगार योजनेला बँकांकडून खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:39 IST

सातारा : शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री रोजगार योजनेचा सातारा जिल्ह्यात खेळखंडोबा झाला आहे. १०० प्रकरणे दाखल केली, तर अवघ्या ...

सातारा : शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री रोजगार योजनेचा सातारा जिल्ह्यात खेळखंडोबा झाला आहे. १०० प्रकरणे दाखल केली, तर अवघ्या तीन प्रकरणांनाच बँकांकडून मंजुरी मिळत असल्याचे चित्र असून, गरजूंवर अन्याय होताना पहायला मिळतो आहे. शासनाच्या योजना केवळ कागदोपत्री राहण्याची भीती यातून स्पष्टपणे पुढे येताना दिसत आहे.

राज्यातील नवीन उद्योजकांना भागभांडवल देऊन त्यांना उभारी देण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या भांडवलातून उद्योग निर्मितीचे स्वप्न करणारे अनेक बेरोजगार पुढे आले. खादी ग्रामोद्योग तसेच जिल्हा रोजगार कार्यालयाकडे त्यांनी प्रस्ताव सादर केले. तब्बल ९०० प्रस्ताव दाखल झाले असले तरी २०२०-२१ या आर्थिक वर्षात केवळ ७० प्रस्ताव बँकांनी मंजूर केले आहेत. उर्वरित प्रस्तावांना केराची टोपली दाखवली आहे.

वास्तविक, ही योजना सुशिक्षित बेरोजगारांना बळ मिळावे. या हेतूने सुरू झालेली आहे. ज्याच्याकडे काहीच नाही, त्याला संधी देण्यासाठी शासनाने तयारी केली असताना बँकांकडे येणारे प्रस्ताव नामंजूर करण्यावरच बँकांनी भर दिल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. नवीन उद्योजकाकडे बॅलन्स शीट, आयटी रिटर्न मागितली जाते आहे. प्रस्तावधारक वारंवार हेलपाटे मारत असतानादेखील बँका प्रस्तावकाशी संपर्क होऊ शकलेला नाही, अथवा प्रस्ताव दाखल करणारे बँकेत आले नाहीत, अशी कारणे दाखवून कर्ज नामंजूर केले जाते. शासनाचे उद्योग निरीक्षक वारंवार पाठपुरावा करत असले तरी बँका त्यांनाही दाद देत नसल्याचे चित्र आहे.

गतवर्षभरात उद्योगांकडून बँकांना दिलेले प्रस्ताव

९००

गत वर्षभरात बँकांकडून मंजूर झालेले प्रस्ताव

७०

जिल्हा अग्रणी बँक अधिकाऱ्याचा कोट...

कोरोना महामारीच्या काळातच ही योजना सुरू झाली. उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत. यासाठी तालुकानिहाय बैठका घेऊन आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

- युवराज पाटील, अग्रणी बँक अधिकारी

प्रस्ताव रद्द करताना दिली जातात कारणे

जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योग महामंडळावर मुख्यमंत्री रोजगार योजनेची जबाबदारी आहे. सर्वच तालुक्यांतून या योजनेसाठी उद्योजकांचे अर्ज यावेत, यासाठी या दोन्ही कार्यालयांतर्फे प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अनेक प्रस्ताव प्रस्ताव दाखल करणाऱ्यांनी केवळ बँकेच्या शाखेला भेट दिली नाही, म्हणून प्रस्ताव नामंजूर केले आहेत. हे उद्योजक नवीन असतानादेखील त्यांना बॅलन्स शीट, आयटी रिटर्न मागितले जात आहेत. आम्ही बँकांकडे वारंवार पाठपुरावा केला; परंतु बँका प्रतिसाद देत नाहीत, अशी माहिती जिल्हा उद्योग अधिकारी संदीप रोकडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

डमी : सीएम रोजगार योजना ५ फेब्रुवारी

फाेटो : रोजगार प्रूफला