शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST

सातारा : शासनाने राज्याचा अधिकाधिक विकास करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक ...

सातारा : शासनाने राज्याचा अधिकाधिक विकास करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असून जिल्ह्याच्या समातोल विकासावर भर राहणार आहे, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांड बाळासाहेब आलदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

अख्ख जग कोविड १९ च्या विळख्यात अडकलं होतं. आता विळखा थोडा सैल झालाय, पण धोका अजून संपलेला नाही पण मागच्या सात आठ महिन्यात शासनाने वेळोवेळी घेतलेले निर्णय, लोकांनी दाखवलेला संयम आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातले अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचं कौतुक केले.

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना गोपनीय क्षेत्रात, गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री यांचे असाधारण आसूचना कुशलता पदक देऊन गौरव केला आहे. त्याचबरोबर पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनाही राष्ट्रीय सुधार सेवा पदक व प्रमाणपत्र, गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक तसेच आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा कोविड वॉरियर्स म्हणून गौरव करण्यात आला.

कलापथकाद्वारे कोरोना संसर्गाविषयी जनजागृती

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील आठवडी बाजारांमध्ये कलापथकाद्वारे कोरोना संसर्गाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लोककलारंग संस्थेमार्फत कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली. जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम स्तुत्य असून यातून कोरोना संसर्गा विषयी ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.