शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

छत्रपतींच्या वंशजांनी जनतेच्या उठावाचे नेतृत्व करावे : भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 16:52 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी परंपरेला शोभेल असा संघर्ष करावा. चारशे वर्षांपूर्वी सरंजामशाहीमुळे संकटात सापडलेल्या जनतेला पेचातून सोडविण्यासाठी शिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे, जनतेच्या उठावाचे नेतृत्व त्यांनी करावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देशिवरायांचे तत्व आचरणात आणून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे केले आवाहनशिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे

सातारा ,11 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी परंपरेला शोभेल असा संघर्ष करावा. चारशे वर्षांपूर्वी सरंजामशाहीमुळे संकटात सापडलेल्या जनतेला पेचातून सोडविण्यासाठी शिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे, जनतेच्या उठावाचे नेतृत्व त्यांनी करावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे.

येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी मार्गदर्शनाची व सहकार्याची गरज आहे, त्या ठिकाणी आम्ही करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

डॉ. पाटणकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील जनतेला छत्रपती शिवराज, छत्रपती शंभूराजे आणि शंभूपुत्र शाहूमहाराज यांची देदीप्यमान परंपरा लाभली आहे. सरंजामदार, जमीनदारांपासून रयतेला मुक्त करण्याचे कार्य करण्याचा वारसादेखील आहे. शिवरायांनी जातीय शोषणाच्या उतरंडीला आव्हान देऊन अगदी तळातील जातींनाही सन्मानाने जगण्यासाठी परिसर तयार केला.

स्त्रियांना मुक्तपणे आणि निर्भयपणे जगता येणारी सामाजिक परिस्थिती तयार केली. हा वारसा जपण्याची जबाबदारी छत्रपतींचे वंशज आणि सातारकर जनतेचीदेखील आहे. या जबाबदारीला तडा पडेल, अशा घटना इथून पुढे घडू नयेत, याची काळजी दोघांनीही घ्यायला हवी. आज देशातील कष्टकरी जनता संकटात आहे.

बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शासनाच्या घोषणांमधून दुष्काळ नाहीसा होईल, असे वाटत नसल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. सार्वत्रिकपणे भयाच्या छायेखाली जनतेला ठेवले जात आहे. जातीभेदाचे राजकारण खेळून समाजात भिंती निर्माण केल्या जात आहेत. अशी परिस्थिती बदलून भयमुक्त पर्यावरण संतुलित आणि सर्व कष्टकरी जनतेच्या जीवनात समृद्धी आणणारा विकासाचा आराखडा राबविण्यासाठी, जातीअंतासाठी, स्त्रीमुक्तीसाठी जनचळवळ उभारणे तातडीचे बनले आहे. वास्तविक, अशी चळवळ उभी करणे हेच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आहे.

छत्रपतींच्या सर्व वारसांनी यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी डॉ. पाटणकर यांनी केले. पत्रकार परिषदेला डॉ. प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी, संतोष घोटल, यशवंत लावंड, जयसिंग कदम आदींची उपस्थिती होती.या प्रश्नांवर लढा उभारा

  1.  शेतकरी, कामगारांना उद्ध्वस्त करणारी सरकारची धोरणे
  2.  भांडवलदारांसाठी शेतकºयांना भूमिहीन करून घातक प्रकल्पांची उभारणी
  3.  कोट्यवधी रुपये खर्चूनही दुष्काळ कायम
  4. अन्यायाविरुध्द लढणाºयाला संपविण्याचे कारस्थान
  5.  शेतकºयांची कर्जबाजारी
  6.  अन्यायकारक टोलनाके बंद झालेच पाहिजेत

शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत धोरण हाती घेऊन विकास साधण्याचा प्रयत्न हाती घ्यावा. हे धोरण राबविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात होणाºया उठावाचे नेतृत्व छत्रपतींच्या वंशजांनी करावे.- डॉ. भारत पाटणकर