शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या वंशजांनी जनतेच्या उठावाचे नेतृत्व करावे : भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 16:52 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी परंपरेला शोभेल असा संघर्ष करावा. चारशे वर्षांपूर्वी सरंजामशाहीमुळे संकटात सापडलेल्या जनतेला पेचातून सोडविण्यासाठी शिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे, जनतेच्या उठावाचे नेतृत्व त्यांनी करावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देशिवरायांचे तत्व आचरणात आणून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे केले आवाहनशिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे

सातारा ,11 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी परंपरेला शोभेल असा संघर्ष करावा. चारशे वर्षांपूर्वी सरंजामशाहीमुळे संकटात सापडलेल्या जनतेला पेचातून सोडविण्यासाठी शिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे, जनतेच्या उठावाचे नेतृत्व त्यांनी करावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे.

येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी मार्गदर्शनाची व सहकार्याची गरज आहे, त्या ठिकाणी आम्ही करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

डॉ. पाटणकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील जनतेला छत्रपती शिवराज, छत्रपती शंभूराजे आणि शंभूपुत्र शाहूमहाराज यांची देदीप्यमान परंपरा लाभली आहे. सरंजामदार, जमीनदारांपासून रयतेला मुक्त करण्याचे कार्य करण्याचा वारसादेखील आहे. शिवरायांनी जातीय शोषणाच्या उतरंडीला आव्हान देऊन अगदी तळातील जातींनाही सन्मानाने जगण्यासाठी परिसर तयार केला.

स्त्रियांना मुक्तपणे आणि निर्भयपणे जगता येणारी सामाजिक परिस्थिती तयार केली. हा वारसा जपण्याची जबाबदारी छत्रपतींचे वंशज आणि सातारकर जनतेचीदेखील आहे. या जबाबदारीला तडा पडेल, अशा घटना इथून पुढे घडू नयेत, याची काळजी दोघांनीही घ्यायला हवी. आज देशातील कष्टकरी जनता संकटात आहे.

बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शासनाच्या घोषणांमधून दुष्काळ नाहीसा होईल, असे वाटत नसल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. सार्वत्रिकपणे भयाच्या छायेखाली जनतेला ठेवले जात आहे. जातीभेदाचे राजकारण खेळून समाजात भिंती निर्माण केल्या जात आहेत. अशी परिस्थिती बदलून भयमुक्त पर्यावरण संतुलित आणि सर्व कष्टकरी जनतेच्या जीवनात समृद्धी आणणारा विकासाचा आराखडा राबविण्यासाठी, जातीअंतासाठी, स्त्रीमुक्तीसाठी जनचळवळ उभारणे तातडीचे बनले आहे. वास्तविक, अशी चळवळ उभी करणे हेच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आहे.

छत्रपतींच्या सर्व वारसांनी यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी डॉ. पाटणकर यांनी केले. पत्रकार परिषदेला डॉ. प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी, संतोष घोटल, यशवंत लावंड, जयसिंग कदम आदींची उपस्थिती होती.या प्रश्नांवर लढा उभारा

  1.  शेतकरी, कामगारांना उद्ध्वस्त करणारी सरकारची धोरणे
  2.  भांडवलदारांसाठी शेतकºयांना भूमिहीन करून घातक प्रकल्पांची उभारणी
  3.  कोट्यवधी रुपये खर्चूनही दुष्काळ कायम
  4. अन्यायाविरुध्द लढणाºयाला संपविण्याचे कारस्थान
  5.  शेतकºयांची कर्जबाजारी
  6.  अन्यायकारक टोलनाके बंद झालेच पाहिजेत

शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत धोरण हाती घेऊन विकास साधण्याचा प्रयत्न हाती घ्यावा. हे धोरण राबविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात होणाºया उठावाचे नेतृत्व छत्रपतींच्या वंशजांनी करावे.- डॉ. भारत पाटणकर