शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

श्रेय लाटणे विरोधकांना अशोभनीय

By admin | Updated: April 14, 2017 22:13 IST

अजित पवार : चिंधवली पुलाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी नेत्यांकडून घणाघात

पाचवड : ‘वर्षानुवर्षे रखडलेली कामे मार्गी लागल्यानंतर ती कामे आपणच केली, असे लोकांना भासवून दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटणे हे विरोधकांना न शोभणारे आहे,’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. आमदार मकरंदआबा पाटील यांच्या अथक परिश्रमातून व नाबार्डच्या योजनेतून तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ते पाचवड-चिंधवली रस्ता व कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अजितदादा पवार म्हणाले, ‘आमदार मकरंदआबांचे काम हे सर्व मतदार संघात सर्वश्रूत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसचे संयुक्त सरकार असताना या पुलासाठी मकरंदआबांनी अथक परिश्रम घेतलेले मी स्वत: पाहिले असून, या कामाचे श्रेय घेण्याचे काम विरोधकांनी जाणीवपूर्वक केले.’ पुढे बोलताना ते म्हणाले, ‘केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले असून, राज्यातील शेतकरी या सरकारच्या कचखाऊ धोरणांमुळे आज मेटाकुटीला आला आहे. लाखोंचा पोशिंदा असलेला शेतकरी कधी संपावर गेला नव्हता परंतु आज शेतकऱ्यांनीच संपावर जायचं ठरवल्याने या सरकारचं डोकं लवकरच ठिकाणावर येणार आहे,’ असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘ज्यांना दररोज पक्ष बदलण्याची घाई त्यांना वाई तालुक्यातील मातब्बर नेते कळाले नाहीत. सोयीनुसार स्वार्थ आणि सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या व विरोधक म्हणून आमच्यावर तोंडसुख घेऊन प्रसिद्धीत राहण्याचा खटाटोप करणाऱ्यांना उद्या आपण कुठे असाल, असा सवाल करत आघाडी सरकारच्या विकासकामांना भाजपाच्या दोरीला बांधणारे माजी खासदार गजानन बाबर यांनी एकदा समोरासमोर यावे मग त्यांना राष्ट्रवादी काय आहे, हे आम्ही दाखवून देऊ,’ असा घणाघात आमदारांनी यावेळी केला. (वार्ताहर) पुलाच्या डागडुजीत कारकिर्द घालवली आमदार मकरंद पाटील यांनी चिंंधवलीच्या पुलाचे १० कोटी २० लाखांचे काम नाबार्डच्या योजनेअंतर्गत मंजूर करून आणले याचा दाखला देत चिंधवली गावच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी गावात ५०० मीटर रस्ता सोडून साधे संडासही बांधले नाही त्यांनी १० कोटींच्या कामाचे श्रेय घेणे म्हणजे मोठी अतिशयोक्ती असल्याचे सांगितले. ज्या माजी मुख्यमंत्र्यांनी या पुलास मंजुरी दिली, असे म्हटले जाते ते उद्घाटनास का हजर नव्हते याचे उत्तर त्यांनी प्रथम जनतेस द्यावे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास प्रतापराव पवार, रजनीताई भोसले-पाटील, अनिल जगताप, महादेव मस्कर, नितीन पाटील, मनोज पवार, मंगेश धुमाळ, संगीता मस्कर, शारदा ननावरे उपस्थित होते.