शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

कृषी सीमकार्डधारकांची फसवणूक

By admin | Updated: December 5, 2015 00:18 IST

‘बीएसएनएल’चा झटका : सुविधा कमी केल्याने बिलात तिपटीने वाढ

वाई : बीएसएनएलने पाच वर्षांपूर्वी खास शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा असणारी कृषीकार्डची योजना जाहीर केली होती़ या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी परवडतील, अशा अनेक सुविधा होत्या. अलीकडे या कार्डधारकांना मोठ्या रकमेची बिले येऊ लागल्यामुळे शेतकरी हादरला आहे.कृषीकार्ड योजनेत कार्ड ते कार्ड अमर्याद मोफत सेवा, लँडलाईन व एसटीडी कॉलिंगसाठी सुविधा, १ जीबी इंटरनेट सेवा मोफत, इतर कंपन्यांच्या कार्डला २०० कॉल मोफत, तसेच ३० पैसे प्रतिकॉल चार्जेस आकरण्यात येत होते़ अशा अनेक सुविधा होत्या़ पोस्टपेड व प्रीपेडसाठी वेगवेगळ्या अनेक सुविधा होत्या़ अशा लोकप्रिय सुविधामुळेच अनेक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्यअ प्रमाणात कृषी कार्डधारक झाले़ अनेक वर्षांपासून ही सुविधा सुरळीत चालली होती़ त्यांमुळे कृषी कार्डधारकांची संख्या खूप मोठी आहे़ कृषी कार्डधारकांची मोठी संख्या असताना आॅक्टोबर महिन्यात बीएसएनएलने एकाएकी सुविधा कमी करून भरमसाठ दरवाढ केल्याने सर्व सामान्य कृषी कार्ड शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ ही त्यांची फसवणूक आहे. कार्डधारकांच्या बिलात तिपटीने वाढ झाल्याने कार्डधारकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, बीएसएनएलने त्वरित भाववाढ कमी न केल्यास कार्डधारक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़ अनेक ग्राहक बीएसएनएलची कार्ड बंद करून खासगी कंपन्याकडे वळण्याच्या विचारात आहेत. काही कार्डधारकांनी न्यायालयात तसेच ग्राहक मंचात जाण्याच्या तयारीत आहेत़ (प्रतिनिधी)शेतकऱ्यांचा विश्वासघात केला--बीएसएनएलने कृषीकार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा काढल्याने अनेक लोकांनी कृषीकार्ड घेतली; परंतु एकाएक सुविधा कमी करून बीएसएनएलने विश्वासघात केला आहे़ ही दरवाढ त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांना बीएसएनएलने दिलासा द्यावा; अन्यथा बीएसएनएलविरोधात आंदोलन उभारण्यात येईल - पी़ एस़ पाटील, कार्डधारकबीएसएनएलने दिलेल्या चांगल्या सुविधामुळे अनेक लोकांनी हा प्लॅन घेतला होता; पण अशा प्रकारे सुविधा कमी केल्याने बिले तिपटीने वाढली आहेत, तेव्हा आम्ही कार्ड बंद करण्याच्या मानसिकतेत आहे़ - मिलिंद गाढवे, कार्डधारक