शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून पारंपरिक शेती व्यवसायात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:38 IST

मायणी : ग्रामीण भागातील शेतकरी आता पारंपरिक शेती व्यवसायाला बगल देऊन व्यापारी पिके घेण्यास बहुतांश शेतकरी प्राधान्य देत आहेत. ...

मायणी : ग्रामीण भागातील शेतकरी आता पारंपरिक शेती व्यवसायाला बगल देऊन व्यापारी पिके घेण्यास बहुतांश शेतकरी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचनचा वापर करू लागले आहेत. लाॅकडाऊन असूनही पेरणी व लागवडी पूर्व कामास वेग आला आहे.

ग्रामीण भागामध्ये खरीप हंगाम व रब्बी हंगाम अशा दोन हंगामातच पारंपरिक शेती व्यवसाय गेल्या कित्येक वर्षापासून केला जात आहे. वडिलोपार्जित शेतजमीन असल्याने घरातील वडीलधारी मंडळीच बऱ्यापैकी शेतीत लक्ष घालत होती व येणारे उत्पन्नामध्ये वर्षभराचा अन्नधान्याचा प्रश्न मार्गी लावत होते. मात्र गेल्या वर्षापासून ग्रामीण भागातील शेती व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला आहे. युवा पिढी शेती व्यवसायात लक्ष घालू लागल्याने पारंपरिक शेतीबरोबरच व्यापारी पिकांनाही प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. मान्सून आगमनापूर्वी शेतीतील मशागत व पेरणीपूर्व कामे करण्याची पद्धत गेल्या कित्येक वर्षापासून आहे. येणारा हंगाम हा खरिपाचा हंगाम असतो. त्या हंगामामध्ये शेतकरी व्यापारी पिकांना प्राधान्य देत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने घेवडा, मूग, उडीद, मका, चवळी, मटकी, तूर आदी पिके शेतकरी वर्गाकडून पारंपरिक शेती करून घेतली जात आहेत. मात्र आता या क्षेत्रात युवा पिढी आल्यामुळे या खरीप हंगामातील पिकांबरोबर इतरही कमी पाण्यात व कोरडवाहू क्षेत्रांमध्ये येणारी व्यापारी व अधिक उत्पन्न देणारी पिके व फळबाग लागवडीला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.

(चौकट)

ग्रामीण भागात पारंपरिक शेतीबरोबरच सध्या परिसरामध्ये द्राक्ष, पेरू, सीताफळ, हापूस व केशर आंबा, केळी आदी बागांची लागवड केली जात आहे. आले, बटाटा, शेवगा, मोठी मिरची, फ्लॉवर, कोबी व पिके घेण्यास सुरुवात झाली आहे.

कोट..

कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळावे, यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन करण्यावर अधिक भर दिला जात आहे. सुरुवातीला हे सिंचन करण्यासाठी थोडेफार आर्थिक भांडवल लागते. मात्र शासनाकडूनही जवळजवळ पन्नास टक्के अनुदान दिले जात आहे. खर्च होत असला तरी कमी पाण्यावर अधिक क्षेत्र ओलिताखाली आणून अधिक उत्पादन घेता येत आहे.

-संजय क्षीरसागर, युवा व प्रयोगशील शेतकरी, मायणी

२३ठिबक

मायणी

ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग ठिबक व तुषार सिंचनाला प्राधान्य देत आहेत. (छाया : संदीप कुंभार)