शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

शेतकऱ्यांकडून पारंपरिक शेती व्यवसायात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:38 IST

मायणी : ग्रामीण भागातील शेतकरी आता पारंपरिक शेती व्यवसायाला बगल देऊन व्यापारी पिके घेण्यास बहुतांश शेतकरी प्राधान्य देत आहेत. ...

मायणी : ग्रामीण भागातील शेतकरी आता पारंपरिक शेती व्यवसायाला बगल देऊन व्यापारी पिके घेण्यास बहुतांश शेतकरी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचनचा वापर करू लागले आहेत. लाॅकडाऊन असूनही पेरणी व लागवडी पूर्व कामास वेग आला आहे.

ग्रामीण भागामध्ये खरीप हंगाम व रब्बी हंगाम अशा दोन हंगामातच पारंपरिक शेती व्यवसाय गेल्या कित्येक वर्षापासून केला जात आहे. वडिलोपार्जित शेतजमीन असल्याने घरातील वडीलधारी मंडळीच बऱ्यापैकी शेतीत लक्ष घालत होती व येणारे उत्पन्नामध्ये वर्षभराचा अन्नधान्याचा प्रश्न मार्गी लावत होते. मात्र गेल्या वर्षापासून ग्रामीण भागातील शेती व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला आहे. युवा पिढी शेती व्यवसायात लक्ष घालू लागल्याने पारंपरिक शेतीबरोबरच व्यापारी पिकांनाही प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. मान्सून आगमनापूर्वी शेतीतील मशागत व पेरणीपूर्व कामे करण्याची पद्धत गेल्या कित्येक वर्षापासून आहे. येणारा हंगाम हा खरिपाचा हंगाम असतो. त्या हंगामामध्ये शेतकरी व्यापारी पिकांना प्राधान्य देत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने घेवडा, मूग, उडीद, मका, चवळी, मटकी, तूर आदी पिके शेतकरी वर्गाकडून पारंपरिक शेती करून घेतली जात आहेत. मात्र आता या क्षेत्रात युवा पिढी आल्यामुळे या खरीप हंगामातील पिकांबरोबर इतरही कमी पाण्यात व कोरडवाहू क्षेत्रांमध्ये येणारी व्यापारी व अधिक उत्पन्न देणारी पिके व फळबाग लागवडीला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.

(चौकट)

ग्रामीण भागात पारंपरिक शेतीबरोबरच सध्या परिसरामध्ये द्राक्ष, पेरू, सीताफळ, हापूस व केशर आंबा, केळी आदी बागांची लागवड केली जात आहे. आले, बटाटा, शेवगा, मोठी मिरची, फ्लॉवर, कोबी व पिके घेण्यास सुरुवात झाली आहे.

कोट..

कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळावे, यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन करण्यावर अधिक भर दिला जात आहे. सुरुवातीला हे सिंचन करण्यासाठी थोडेफार आर्थिक भांडवल लागते. मात्र शासनाकडूनही जवळजवळ पन्नास टक्के अनुदान दिले जात आहे. खर्च होत असला तरी कमी पाण्यावर अधिक क्षेत्र ओलिताखाली आणून अधिक उत्पादन घेता येत आहे.

-संजय क्षीरसागर, युवा व प्रयोगशील शेतकरी, मायणी

२३ठिबक

मायणी

ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग ठिबक व तुषार सिंचनाला प्राधान्य देत आहेत. (छाया : संदीप कुंभार)