शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

पत्ते बदलले तरी डाव मात्र राजेंच्याच हाती!

By admin | Updated: August 7, 2015 22:14 IST

आधे इथर, आधे उधर : सातारा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील लढायांनंतरचे चित्र संमिश्र--ग्रामपंचायत विश्लेषण

सागर गुजर- सातारा -पत्त्यांच्या खेळात हुकमाची पाने ज्याच्याकडे जास्त तो विजयी होतो. हुकमाची पाने असणारा सवंगडी समोर असला म्हणजे जीत आपलीच, हे जो जाणतो, तो खरा माहीर खेळाडू ठरतो. सातारा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही असे खेळाडू लढले. पत्ते बदलले तरी डाव मात्र राजेंनीच जिंकला.जिल्ह्यात कुठेही कुणाची सत्ता असेना; पण सातारा शहरासह तालुक्यात दोन राजेंशिवाय पर्याय नाही, हे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर पुन्हा सिद्ध झाले. अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाल्याने त्या-त्या ठिकाणचे पत्ते बदलले गेले. जिंकून आलेले नवे भिडू काहीजण ‘जलमंदिर पॅलेस’वर तर काही ‘सुरुची पॅलेस’वर जाऊन भेटून आले. त्यामुळे कुणाचेही पॅनेल निवडून आले तरी सातारा तालुक्यात राजेंचा प्रभाव मात्र कायम आहे. तालुक्यातील ४१ पैकी १३ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात यश आले. २८ गावांत सत्ताधारी व विरोधकांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. शेंद्रे, परळी, डोळेगाव, संभाजीनगर, बोरगाव या प्रमुख ग्रामपंचायतींसह इतर काही ग्रामपंचायतींमध्ये सत्ता परिवर्तन झाले. सत्ता बदल झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांमध्येच लढाया झाल्या. डोळेगावात खासदार समर्थकांची २५ वर्षे सत्ता होती. मात्र, ती उलथवून टाकत आमदार गटाने परिवर्तन घडविले. परळीतही आमदार गटाने मुसंडी मारली. शेंद्रेमध्ये आमदार गटाचे ज्ञानेश्वर गायकवाड व सहकाऱ्यांंच्या अजिंक्य पॅनेलने परिवर्तन घडविले. सासपडेत आमदार गटाचे मधुकर यादव यांनी ११ पैकी ८ जागा जिंकून सत्ता कायम राखली. बोरगावातही आमदार गटाने सत्ता काबीज केली आहे. नागेवाडी, गजवडी, गवडीतही आमदार गटाचेच वर्चस्व आहे.महादरेची सत्ता कायम राखण्यात खासदार उदयनराजे गटाला यश आले. कारंडवाडीत खासदार गटाने आमदार गटाचा ६-५ असा पराभव केला. या परिस्थितीत कुठल्या राजेंकडे किती ग्रामपंचायती, याची चर्चा सुरू आहे.कारभाऱ्यांचा प्रभाव ओसरला!संभाजीनगर ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे व आनंदराव कणसे यांनी सत्ता कायम ठेवण्यासाठी मोठी धडपड केली; पण संभाजीनगरातील जनतेने त्यांची सत्ता उलथून टाकली. १७ जागांपैकी त्यांना अवघ्या सहा जागा मिळविता आल्या. या ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाची सत्ता आली आहे.मनोज घोरपडेंचा फत्त्यापुरात करिष्माकऱ्हाड उत्तर विधानसभा लढलेले स्वाभिमानी पक्षाचे मनोज घोरपडे यांचा फत्त्यापूरमध्ये करिष्मा कायम आहे. घोरपडे यांच्या गटाने ५ विरुद्ध ४ अशा फरकाने फत्त्यापूर ग्रामपंचायत ताब्यात घेतल्याने हा करिष्मा सिद्ध झाला.विलासपुरात मनोमिलनाला तीन अपक्षांचा चेकविलासपूर ग्रामपंचायत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोन गटांनी मनोमिलनाच्या माध्यमातून लढविली. शिवेंद्रसिंहराजे समर्थक फिरोज पठाण यांनी जोरदार प्रयत्न करून १३ पैकी ९ जागा मिळविल्या; पण तीन अपक्षांनी ग्रामपंचायतीत शिरकाव करून मनोमिलनाच्या सत्तेला ‘चेक’ दिला आहे.खेडमध्ये सत्ता उलथण्याचे मनसुबे धुळीलाखेड ग्रामपंचायती आमदार शशिकांत शिंदे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली होती; पण विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळाले. अनिल पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी ग्रामविकास आघाडीने १७ पैकी १३ जागा पटकावल्या. हरिभाऊ लोखंडे, मिलिंद पाटील यांच्या गटाला अवघ्या तीन जागा मिळाल्या. तर संदीप मोझर यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या आहेत.