शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जातींच्या हजारो तुकड्यांची मोट बांधण्यासाठी परिवर्तन यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:27 IST

‘तोडा, फोडा आणि राज्य करा या नितीने देशभरातील बहुजन मूलनिवासी हे हजारो जातींच्या तुकड्यात वाटले गेले आहेत.

सातारा : ‘तोडा, फोडा आणि राज्य करा या नितीने देशभरातील बहुजन मूलनिवासी हे हजारो जातींच्या तुकड्यात वाटले गेले आहेत. तुकड्या तुकड्याने असलेल्या या जातींना एकत्रित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा ही कल्पना साकारत आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, ३६७ तालुके व ४४ हजार गावांत परिवर्तन यात्रा सुरू आहे.

विकासापासून वंचित राहिलेल्या हजारो जातींना तुकड्यात वाटून त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. तो दूर करण्यासाठी ही परिवर्तन यात्रा आता देशभरातील ३१ राज्यांत ५५० जिल्ह्यांत व १ लाख ५० हजार गावांमध्ये जाणार आहे, अशी ही पहिलीच परिवर्तन यात्रा आहे,’ असे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले.

बहुजन क्रांती मोर्चातर्फे सुरू असलेल्या परिवर्तन यात्रेचे सातारा येथे आगमन झाले. त्यानंतर गांधी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष भालचंद्र माळी, क्रांती थिएटरचे अध्यक्ष अमर गायकवाड, चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश रावखंडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र्र कांबळे, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या संध्या शिर्के , घिसाडी समाजाचे नेते मुरलीधर पवार, आरपीआय ब्ल्यू फोर्सचे दादासाहेब ओव्हाळ, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे आयूब मुल्ला, अमोल बनसोडे उपस्थित होते.

वामन मेश्राम म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांचे वर्तन संशयास्पद असेच होते, दंगलीचा कट करणाऱ्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांना त्यांनी क्लीनचिट दिले. त्यांनी चौकशीचा अहवाल येईपर्यंत वाट पाहणे आवश्यक होते. मात्र, त्या दंगलीला चितावणी देणाºयांना वाचविण्याची भूमिका जगजाहीर झालेली आहे. न्यायालयात आता पुरावे सादर करण्याचे काम सुरू असून, जनतेतून खासगी चौकशी सुरू आहे.

सगळे ठोस पुरावे न्यायालयात सादर केल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात कायद्याच्या विरोधी आचरण केल्याप्रकरणी केसेस दाखल करणार आहोत. प्रस्थापितांकडून सुरू असलेल्या अन्याय, अत्याचारात देशभरातील हजारो जातींच्या तुकड्यात वाटलेली जनता भरडून निघत आहे.’ जिल्ह्यातील विविध जातींच्या २५० संघटनांनी पाठिंबाही मिळाला.