शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

केंद्रप्रमुख आळशी; मुख्याध्यापक बेजबाबदार!--कºहाड पंचायत समिती सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘तालुक्यात आयएसओ मानांकनाचा दावा करणाºया प्राथमिक शाळांकडून गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाहीत. शिक्षण विभागाने नेमलेले केंद्रप्रमुख तर आळशी आहेतच परंतु, मुख्याध्यापक आणि शिक्षकही नेमून दिलेली कामे प्रामाणिकपणे करीत नाहीत. बेजबाबदारपणे वागतात.मराठी शाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी आम्ही ओढाताण करीत असताना शिक्षकांना मात्र त्याचे अजिबात ...

ठळक मुद्देशाळांच्या कारभारावर सदस्यांचे ताशेरे; ‘आयएसओ’ शाळांचा गुणात्मक दर्जा सुधारण्याची मागणी संबंधित पदाधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी तारखाही वारंवार बदलल्या जाऊ नयेत,

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘तालुक्यात आयएसओ मानांकनाचा दावा करणाºया प्राथमिक शाळांकडून गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाहीत. शिक्षण विभागाने नेमलेले केंद्रप्रमुख तर आळशी आहेतच परंतु, मुख्याध्यापक आणि शिक्षकही नेमून दिलेली कामे प्रामाणिकपणे करीत नाहीत. बेजबाबदारपणे वागतात.मराठी शाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी आम्ही ओढाताण करीत असताना शिक्षकांना मात्र त्याचे अजिबात गांभीर्य नाही,’ अशा शब्दांत सदस्यांनी शिक्षण विभागाचे वाभाडे काढले.

येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. त्यावेळी रमेश चव्हाण, चंद्रकांत मदने, शरद पोळ या सदस्यांनी शिक्षकांच्या कारभारावर ताशेरे ओढले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शालन माळी होत्या. यावेळी उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल उपस्थित होते.

शरद पोळ यांनी आयएसओ मानांकन देण्यात आलेल्या शाळांचा गुणात्मक दर्जा तपासण्यासाठी समिती नेमण्याची पुन्हा मागणी केली. यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी व्ही. एम. गायकवाड यांनी अशी समिती लवकरच काम सुरू करणार असल्याची माहिती दिली. चंद्रकांत मदने यांनी हजारमाची येथील प्राथमिक शाळेच्या शौचालयाची दुरवस्था झाली असल्याचे सांगून तेथील गटाराच्या सांडपाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगितले.

गटशिक्षणाधिकारी गायकवाड यांनी बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार सर्वेक्षण केल्यानंतर धोकादायक आढळून आलेल्या शाळांच्या खोल्यांमध्ये वर्ग बसविणे बंद केले असल्याची माहिती दिली. स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांना पर्यायी वर्ग खोल्यांची व्यवस्था करण्यास सांगितले असल्याचीही त्यांनीमाहिती दिली.

बाळासाहेबनिकम आणि सुरेखा पाटील यांनी याबाबत नवीन सर्वेक्षण करून धोकादायक खोल्यांच्या बदली नवीन खोल्या बांधून देण्याची मागणीकेली.देवराज पाटील यांनी जिल्हा विकास निधीच्या गेल्या वर्षीच्या ५७ कोटी रुपयांपैकी केवळ अडीच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने गेल्या वर्षीची उर्वरित रक्कम तसेच यावर्षीची रक्कम तातडीने उपलब्ध करून द्यावी. यासाठी सभागृहाचा ठराव करण्याची मागणी केली.

वीज कंपनीच्या ठेकेदारांनी मीटरचे रिडींग घेण्यासाठी नेमलेल्या कर्मचाºयांकडून मीटरचा फोटोच योग्य प्रकारे काढला जात नाही. त्या फोटोत रिडींगचे आकडेच दिसत नाहीत. याबाबत तक्रार केल्यास सॉफ्टवेअरचे कारण सांगितले जात असल्याची तक्रार चंद्र्रकांत मदने यांनी केली. मीटर रिडींग घेण्याच्या तारखाही वारंवार बदलल्या जाऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.

उपसभापती रमेश देशमुख, चंद्र्रकांत मदने, सुरेखा पाटील यांनी स्वाईन फ्लू आणि डेंग्यूबाबत प्रत्येक गावात सर्वेक्षण करून स्वच्छतेची खबरदारी घेण्याची मागणी केली. गटविकास अधिकाºयांनी पुढील दहा दिवसांत तालुक्यातील सर्व गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती दिली.चंद्रकांत मदने यांनी हजारमाची प्राथमिक आरोग्य केंद्राचे विरवडे येथे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी यावेळी केली.चाळीस गावांत दूषित पाणीपुरवठातालुक्यात स्वाईन फ्लूचे ७४ रुग्ण आढळले. त्यापैकी २२ रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले होते. आतापर्यंत १७ जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. सर्व गावांमध्ये सर्वेक्षण करून औषध पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. कºहाड तालुक्यातील तब्बल ३९ गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.तर कामावर हजर होऊ देणार नाहीकरवडी येथे उभारण्यात आलेली सामाजिक सभागृहाची इमारत म्हणजे केवळ एक सांगाडाच असल्याची टीका करीत त्या कामाची चौकशी करण्याची मागणी सुरेश कुंभार यांनी केली. शरद पोळ यांनी अनेक बदली होऊन आलेल्या ग्रामसेवकांना संबंधित कामावर हजर होऊ देत नाहीत. त्यांना तो अधिकार आहे का, असे विचारत संबंधित पदाधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली.