शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

जावळीत अनोख्या पद्धतीने होणार रक्षाबंधन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 16:54 IST

सायगाव : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे,’ या संत तुकारामांच्या ओवीप्रमाणे सर्व झाडेझुडपे हे आपल्या सामाजिक पर्यावरणाचे घटक आहेत. पर्यावरणात होणारे बदल रोखण्यासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या उद्देशानेच जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी तालुक्यात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देगटविकास अधिकाºयांचा उपक्रमवृक्ष लावून राखी बांधून रक्षाबंधन करावा साजरासंगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकवर

सायगाव : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे,’ या संत तुकारामांच्या ओवीप्रमाणे सर्व झाडेझुडपे हे आपल्या सामाजिक पर्यावरणाचे घटक आहेत. पर्यावरणात होणारे बदल रोखण्यासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या उद्देशानेच जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी तालुक्यात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान एक तरी झाड लावून त्या झाडाला राखी बांधून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घ्यायची आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.

     नैसर्गिक आपत्तीत वाढ, तापमानात दिवसेंदिवस होत असलेली वाढ व इतर विपरीत बदल पर्यावरणात घडताना दिसत आहेत. यावर एकच उपाय म्हणजे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा आहे. रक्षाबंधन या सणाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण स्थान आहे. त्यामुळे या सणाचे महत्त्व ओळखून व औचित्य साधून नूतन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी सात आॅगस्टला किमान एक तरी झाड लावून त्या झाडाला राखी बांधून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक यांनी घेऊन रक्षाबंधन साजरा करावा, असे परिपत्रक काढले आहे.

    शालेय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे नवनवे उपक्रम या निमित्ताने राबवून तसे राबवल्याचे पंचायत समितीस अवगत करण्याच्या सूचना देखील बुद्धे यांनी केल्या आहेत. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक व स्वागत होत आहे. तालुक्यातील शाळा देखील हा उपक्रम राबवण्यासाठी तयारीला लागल्या आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली.शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन हे मूल्य समजवणे हा आपल्या मूल्यशिक्षणाचा भाग आहे. त्यादृष्टीने हा अनोखा उपक्रम तालुक्यात राबवला जात आहे. त्यानुसार हा उपक्रम सक्तीने राबण्यासंदर्भात शाळांना सूचना देखील केल्या आहेत.     - सतीश बुद्धे, गटविकास अधिकारी जावळी