शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सावधान... खटाव तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट होतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:29 IST

पुसेगाव : काहीकाळ सुप्तावस्थेत गेलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. माण-खटाव तालुक्यांत मोठ्या बाजारपेठांची गावे नागरिकांच्या वाढत्या रहदारीने ...

पुसेगाव : काहीकाळ सुप्तावस्थेत गेलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. माण-खटाव तालुक्यांत मोठ्या बाजारपेठांची गावे नागरिकांच्या वाढत्या रहदारीने धोक्यात आली आहेत. परिसरासह इतर तालुक्यातील नागरिकही आता पुसेगावात खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कोरोना रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी जनतेने केली आहे.

गेल्या अकरा महिन्यांत खटाव तालुक्यातील विविध गावांत कोरोनाबाधित रुग्ण सापडत गेले. रुग्णांची संख्या जशी झपाट्याने वाढत होती तसा नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस, आरोग्य व स्थानिक प्रशासन कोरोना रोखण्यासाठी जीवाची बाजी लावत होते. वारंवार सूचना करूनही लॉकडाऊनच्या काळात नागरिक योग्य ती काळजी घेताना दिसले नव्हते. सध्या तर पोलीस प्रशासनाने अंगच काढून घेतले असल्याने पुसेगावात ‘आवो जावो घर तुम्हारा,’ अशीच परिस्थिती गावातील मुख्य चौकात, बाजारपेठेत, किराणासह इतर दुकानात दिसून येत आहे.

लग्नकार्य, वाढदिवसासाठी तोबा गर्दीत सुरू आहे. पाचवीपासून पदवीचे वर्ग सुरू झाले. धार्मिक विधी व मंदिरे दर्शनासाठी खुली झाली. गावोगावचे आठवडा बाजार चालू झाले. कोरोना आपल्यातून गायब झाला अशाच आविर्भावात नागरिक दैनंदिन व्यवहार करू लागले आहेत. ना सोशल डिस्टन्सिंग, ना सॅनिटायझर, ना तोंडाला मास्क. मुंबई-पुणे व अन्य भागातून आलेल्या नागरिकांनी सतत खरेदीच्या निमित्ताने गर्दी केल्यानेच खटाव तालुक्यात कोरोनाने पुन्हा पाय पसरायला सुरुवात केली आहे.

गेल्या दहा-अकरा महिन्यांत मागील कार्यकाळ असलेल्या पुसेगाव ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी कोरोनाबाबत काळजी घेतली. येथील नागरिकांना त्यावेळी केलेली गावातील दुकानांची बंदी अंगवळणी पडली होती. त्यानुसार नागरिक वागत होते. कोरोनाची भीती कमी वाटत होती. मात्र, भागातील मोठी गावे अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः बंद होती. त्यामुळे इतर भागातील नागरिक मोठ्या संख्येने पुसेगावात गर्दी करत होते.

चौकट..

कडक कायदा राबविण्याची गरज...

खटाव तालुक्यात प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता कडक कायदा राबविण्याची गरज दिसत आहे. पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली पाहिजे. ग्रामपंचायतीने गावातील बाजारपेठ काही दिवस बंद, काही दिवस चालू, असे करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढू नये, त्याला त्वरित आळा घालता यावा यासाठी हा निर्णय प्रशासनाने घेण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.

(चौकट)

खटाव तालुक्यात आतापर्यंत ४,२५४ कोरोना बाधितांची संख्या झाली होती. त्यातील १५६ रुग्ण दगावले आहेत. ३,९८६ रुग्णांची कोरोनातून सुटका झाली. खटाव तालुक्यातील विविध गावात सध्या ११४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. जानेवारी महिन्यात ११० कोरोना रुग्ण होते तर फेब्रुवारीच्या १८ तारखेला १९६ रुग्ण कोरोना बाधित आहेत. म्हणजे कोरोना वाढीचा आलेख चढता होत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.