शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उलटलेल्या रासायनिक टँकरमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 14:07 IST

पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव घेऊन जाणारा टँकर उलटल्याने घाटाच्या परिसरात सुटलेल्या उग्र वासाने आसपासच्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देअठरा तासांनंतरही टँकर घटनास्थळीचनागरिकांत भीतीचे वातावरणनायट्रीक आम्ल बाहेर पडू लागल्याने परिसरात सर्वत्र उग्र वास टँकरचा स्फोट होण्याच्या भितीमुळे घाटमार्गाची वाहतूक बोगदा मार्गाने बोगद्यातून दुहेरी वाहतूक संथ गतीने सुरुच

खंडाळा : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव घेऊन जाणारा टँकर उलटल्याने घाटाच्या परिसरात सुटलेल्या उग्र वासाने आसपासच्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.

आम्लाची तीव्रता कमी करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध न झाल्याने  घाटातील टँकर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे तब्बल अठरा तासानंतरही घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. 

     खंबाटकी घाट उतरताना मंगळवार दि .१९ रोजी  सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रासायनिक द्रव्य घेऊन जाणारा (क्र टीएन -३० बी एच -६९७९) टँकर उलटला होता. टॅकर उलटल्याने त्यामध्ये असलेले नायट्रीक आम्ल बाहेर पडू लागल्याने परिसरात सर्वत्र उग्र वास सुटला. 

टँकरचा स्फोट होण्याच्या भितीमुळे घाटमार्गाची वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली होती.  उग्र वासाच्या व शरीरास अपायकारक द्रव्यामुळे टँकर जवळ जाण्यास भीती वाटत असल्याने पोलिसांनी वाई नगरपालिका व भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले आहे.

आग्निशामक दलाच्या दोन्ही गाडी आल्यानंतरही आम्लाची दाहकता कमी करण्यास ही यंत्रणा तुटपूंजी ठरली . हे आम्ल हवेत मिसळल्याने परिसरात त्याचा वास जास्त प्रमाणात पसरल्याने या भागात जाणे कठीण बनले आहे . या परिसरातील गावांमधील लोकांनाही काही प्रमाणात याचा त्रास जाणवू लागला आहे .

टँकर उलटल्याने कोल्हापूरकडे जाणारी संपूर्ण वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली आहे . तब्बल अठरा तासानंतरही घाट मार्ग खुला होऊ शकला नसल्याने बोगद्यातून दुहेरी वाहतूक संथ गतीने सुरुच आहे.

 दरम्यान, महामार्गावर आम्ल किंवा आम्लारी वाहतूक करणाºया टँकरबाबत अशा घटना घडल्यानंतर त्याची दाहकता कमी करण्याची यंत्रणा संपूर्ण सातारा जिल्हयातच उपलब्ध नाही. त्यामुळे अशा वेळी नैसर्गिकरित्या अशा पदार्थांची दाहकता कमी होण्याची वाट पहावी लागते. मात्र, याचा त्रास परिसरातील नागरिकांना व इतर वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.