शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

उलटलेल्या रासायनिक टँकरमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 14:07 IST

पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव घेऊन जाणारा टँकर उलटल्याने घाटाच्या परिसरात सुटलेल्या उग्र वासाने आसपासच्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देअठरा तासांनंतरही टँकर घटनास्थळीचनागरिकांत भीतीचे वातावरणनायट्रीक आम्ल बाहेर पडू लागल्याने परिसरात सर्वत्र उग्र वास टँकरचा स्फोट होण्याच्या भितीमुळे घाटमार्गाची वाहतूक बोगदा मार्गाने बोगद्यातून दुहेरी वाहतूक संथ गतीने सुरुच

खंडाळा : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव घेऊन जाणारा टँकर उलटल्याने घाटाच्या परिसरात सुटलेल्या उग्र वासाने आसपासच्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.

आम्लाची तीव्रता कमी करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध न झाल्याने  घाटातील टँकर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे तब्बल अठरा तासानंतरही घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. 

     खंबाटकी घाट उतरताना मंगळवार दि .१९ रोजी  सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रासायनिक द्रव्य घेऊन जाणारा (क्र टीएन -३० बी एच -६९७९) टँकर उलटला होता. टॅकर उलटल्याने त्यामध्ये असलेले नायट्रीक आम्ल बाहेर पडू लागल्याने परिसरात सर्वत्र उग्र वास सुटला. 

टँकरचा स्फोट होण्याच्या भितीमुळे घाटमार्गाची वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली होती.  उग्र वासाच्या व शरीरास अपायकारक द्रव्यामुळे टँकर जवळ जाण्यास भीती वाटत असल्याने पोलिसांनी वाई नगरपालिका व भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले आहे.

आग्निशामक दलाच्या दोन्ही गाडी आल्यानंतरही आम्लाची दाहकता कमी करण्यास ही यंत्रणा तुटपूंजी ठरली . हे आम्ल हवेत मिसळल्याने परिसरात त्याचा वास जास्त प्रमाणात पसरल्याने या भागात जाणे कठीण बनले आहे . या परिसरातील गावांमधील लोकांनाही काही प्रमाणात याचा त्रास जाणवू लागला आहे .

टँकर उलटल्याने कोल्हापूरकडे जाणारी संपूर्ण वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली आहे . तब्बल अठरा तासानंतरही घाट मार्ग खुला होऊ शकला नसल्याने बोगद्यातून दुहेरी वाहतूक संथ गतीने सुरुच आहे.

 दरम्यान, महामार्गावर आम्ल किंवा आम्लारी वाहतूक करणाºया टँकरबाबत अशा घटना घडल्यानंतर त्याची दाहकता कमी करण्याची यंत्रणा संपूर्ण सातारा जिल्हयातच उपलब्ध नाही. त्यामुळे अशा वेळी नैसर्गिकरित्या अशा पदार्थांची दाहकता कमी होण्याची वाट पहावी लागते. मात्र, याचा त्रास परिसरातील नागरिकांना व इतर वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.