शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

उलटलेल्या रासायनिक टँकरमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 14:07 IST

पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव घेऊन जाणारा टँकर उलटल्याने घाटाच्या परिसरात सुटलेल्या उग्र वासाने आसपासच्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देअठरा तासांनंतरही टँकर घटनास्थळीचनागरिकांत भीतीचे वातावरणनायट्रीक आम्ल बाहेर पडू लागल्याने परिसरात सर्वत्र उग्र वास टँकरचा स्फोट होण्याच्या भितीमुळे घाटमार्गाची वाहतूक बोगदा मार्गाने बोगद्यातून दुहेरी वाहतूक संथ गतीने सुरुच

खंडाळा : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव घेऊन जाणारा टँकर उलटल्याने घाटाच्या परिसरात सुटलेल्या उग्र वासाने आसपासच्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.

आम्लाची तीव्रता कमी करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध न झाल्याने  घाटातील टँकर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे तब्बल अठरा तासानंतरही घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. 

     खंबाटकी घाट उतरताना मंगळवार दि .१९ रोजी  सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रासायनिक द्रव्य घेऊन जाणारा (क्र टीएन -३० बी एच -६९७९) टँकर उलटला होता. टॅकर उलटल्याने त्यामध्ये असलेले नायट्रीक आम्ल बाहेर पडू लागल्याने परिसरात सर्वत्र उग्र वास सुटला. 

टँकरचा स्फोट होण्याच्या भितीमुळे घाटमार्गाची वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली होती.  उग्र वासाच्या व शरीरास अपायकारक द्रव्यामुळे टँकर जवळ जाण्यास भीती वाटत असल्याने पोलिसांनी वाई नगरपालिका व भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले आहे.

आग्निशामक दलाच्या दोन्ही गाडी आल्यानंतरही आम्लाची दाहकता कमी करण्यास ही यंत्रणा तुटपूंजी ठरली . हे आम्ल हवेत मिसळल्याने परिसरात त्याचा वास जास्त प्रमाणात पसरल्याने या भागात जाणे कठीण बनले आहे . या परिसरातील गावांमधील लोकांनाही काही प्रमाणात याचा त्रास जाणवू लागला आहे .

टँकर उलटल्याने कोल्हापूरकडे जाणारी संपूर्ण वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली आहे . तब्बल अठरा तासानंतरही घाट मार्ग खुला होऊ शकला नसल्याने बोगद्यातून दुहेरी वाहतूक संथ गतीने सुरुच आहे.

 दरम्यान, महामार्गावर आम्ल किंवा आम्लारी वाहतूक करणाºया टँकरबाबत अशा घटना घडल्यानंतर त्याची दाहकता कमी करण्याची यंत्रणा संपूर्ण सातारा जिल्हयातच उपलब्ध नाही. त्यामुळे अशा वेळी नैसर्गिकरित्या अशा पदार्थांची दाहकता कमी होण्याची वाट पहावी लागते. मात्र, याचा त्रास परिसरातील नागरिकांना व इतर वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.