शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत; पतीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST

सातारा : अपघातात पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीवरच बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनीच फिर्याद दिली ...

सातारा : अपघातात पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीवरच बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनीच फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील माजगाव येथील राजेश विठ्ठल गायकवाड (३५, रा. माजगाव, ता. सातारा) हे आपली पत्नी अश्विनी हिच्यासमवेत दुचाकीवरून (एम. एच. ११ - एसी ९०११) निघाले होते. ते भरधाव वेगाने दुचाकी चालवित होते. माजगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल निसर्गजवळ आल्यानंतर भरधाव वेगामुळे त्यांची दुचाकी स्लीप झाली. यात पाठीमागे बसलेल्या अश्विनी राजेश गायकवाड (२८) या खाली पडल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. १८ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती.

दरम्यान, पोलिसांनी केलेला पंचनामा आणि घटनास्थळावरील माहिती लक्षात घेता अश्विनी यांच्या मृत्यूस पती राजेश गायकवाड कारणीभूत असल्याचे समोर आले. यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर काशिनाथ सुर्वे (४२) यांनी राजेश याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात हलगर्जीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरले असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार महाडिक हे करीत आहेत.