शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘मनस्विनी’ महिलांसाठी सक्षम व्यासपीठ

By admin | Updated: March 12, 2015 00:10 IST

तारा भवाळकर : वाठार येथील कार्यक्रम; महिलांची मोठी उपस्थिती

कऱ्हाड : ‘कृष्णा फाउंडेशनने ‘मनस्विनी’च्या माध्यमातून महिलांसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे महिलांना जीवनातील उद्याच्या स्पर्धेला समर्थपणे सामोरे जाण्याचे बळ मिळाले आहे,’ असे मत डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले. वाठार, ता. कऱ्हाड येथे आयोजित कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी प्रा. मनीषा थोरात, प्रा. संध्या शेंडगे, प्रा. परिणिता चव्हाण, प्रा. दीपाली पाटील, प्रा. सुलोचना पाटील, प्रा. सीमा पाटील, प्रा. विभावरी जगदाळे, प्रा. आरती चतुर्वेदी, प्रा. अप्सरा मुजावर, प्रा. अपर्णा सोमदे, प्रा. मनीषा पाटील, प्रा. धनश्री माळी, भाग्यश्री यादव आदी उपस्थित होत्या. डॉ. भवाळकर म्हणाल्या, ‘स्त्रियांनी आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची कास धरावी. कालच्या काळातील जात्यावरती ओवी गाणाऱ्या स्त्रीपेक्षा आजच्या युगातील अनेक पदवी घेतलेल्या स्त्रिया कालच्या युगातील स्त्रियांच्या बौद्धिकदृष्ट्या असक्षम ठरत आहेत. यातून बोध घेत उद्याच्या युगातील मातृत्वाचे आव्हान स्वीकारावे व स्त्री स्वावलंबनाचा अट्टाहास करावा.’ सौंदर्यतज्ज्ञ सुलभा सूर्यवंशी म्हणाल्या, ‘कोणत्याही स्त्रिला सौंदर्याचे आकर्षण राहत असून, चेहऱ्यावरचे सौंदर्य महत्त्वाचे असूनही मनाचे व त्याचबरोबर व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य असणे ही गरज आहे. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक व सांस्कृतिक ज्ञान स्त्रियांनी जोपासावे. यावेळी सुलभा सूर्यवंशी यांनी उपस्थित महिलांसमोर सौंदर्य वाढविणे व ते टिकविणे यासाठी आवश्यक उपाय व त्याची विविध प्रायोगिक प्रात्यक्षिके करून दाखविली व उपस्थित माहिला समुदायाकडून दाद मिळविली. कार्यक्रमाचे सीमा मांडवे व सुप्रिया शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कोमल मोहिते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)