शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सदाशिव गडावरील प्रस्तावित रस्ता रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST

कराड : रस्ता झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडच्या पावित्र्यास बाधा पोहोचणार आहे. तसेच ...

कराड : रस्ता झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडच्या पावित्र्यास बाधा पोहोचणार आहे. तसेच सदाशिवगडासह पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. लोकवर्गणीतून सदाशिवगडावर लाखो रुपयांची कामे झाली असताना आता रस्ता झाला तरच गडाचा विकास होईल? हा केवळ भ्रम असून, शासनाने सदाशिवगडावरील प्रस्तावित रस्ता रद्द करावा, अशी मागणी बाबरमाची ग्रामस्थांसह सदाशिवगड बचाव कृती समिती, शिवराय ट्रेकिंग ग्रुपने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जयराम स्वामी वडगाव मठाचे मठाधिपती विठ्ठल महाराज स्वामी, प्रकाश बापूराव पवार, रमेश टोण्णे यांच्यासह बाबरमाची ग्रामस्थ, दुर्गप्रेमी नागरिक, शिवराय ट्रेकिंग ग्रुपसह सदाशिवगड बचाव कृती समितीकडून हे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बाबरमाची, डिचोली, तसेच राजमाची परिसरातील गडाच्या पायथा परिसरात दररोज काही तळीराम ओली पार्टी करतात. काहीजण गडावर येऊन गडावरील पठारावर बिनधास्तपणे दारू पित असतात. हजारमाची पायरी मार्गालगतही दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. गडावर रस्ता नसतानाही अशी परिस्थिती आहे. यापूर्वी आम्ही काही लोकांना, युवकांना पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे; मात्र ठोस कारवाई होत नाही. रस्ता झाल्यावर सायंकाळनंतर गडावर ओल्या पार्ट्या करण्यास कोणीही अटकाव करू शकणार नाही. राज्यात ज्या-ज्या गडावर रस्ता झाला आहे, तेथील पावित्र्य धोक्यात आल्याचेच दिसते. म्हणूनच किल्ले सदाशिवगडावर रस्ता करून राज्य शासनाला किल्ले सदाशिवगडास तळीरामांचा अड्डा करावयाचा आहे का?

किल्ले सदाशिवगडावर वनपर्यटनाच्या माध्यमातून शिवसृष्टी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, आजवर सदाशिवगडावर महत्त्वाकांक्षी पाणी योजनेसह अन्नछत्र, दोन स्वच्छतागृह, तसेच अन्य कामांसाठी लागणारे साहित्य दुर्गप्रेमींसह सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला सहकार्य करणाऱ्या दुर्गप्रेमींनी हजारमाची पायथ्यापासून पायरी मार्गाने खांद्यावरून गडावर नेले आहे. त्यामुळे भविष्यात वनपर्यटनाच्या माध्यमातून गडावर शिवसृष्टी करावयाची झाल्यास सर्व साहित्य खांद्यावरून पायरी मार्गाने नेणे सहज शक्य आहे. वनपर्यटन आणि शिवसृष्टी या आडून रस्त्याचा घाट घालत गडाला, तसेच पर्यावरणास हानी पोहोचविणे कितपत योग्य आहे? याचा शासनाने विचार करणे आवश्यक आहे.

फोटो :