शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सदाशिव गडावरील प्रस्तावित रस्ता रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST

कराड : रस्ता झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडच्या पावित्र्यास बाधा पोहोचणार आहे. तसेच ...

कराड : रस्ता झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडच्या पावित्र्यास बाधा पोहोचणार आहे. तसेच सदाशिवगडासह पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. लोकवर्गणीतून सदाशिवगडावर लाखो रुपयांची कामे झाली असताना आता रस्ता झाला तरच गडाचा विकास होईल? हा केवळ भ्रम असून, शासनाने सदाशिवगडावरील प्रस्तावित रस्ता रद्द करावा, अशी मागणी बाबरमाची ग्रामस्थांसह सदाशिवगड बचाव कृती समिती, शिवराय ट्रेकिंग ग्रुपने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जयराम स्वामी वडगाव मठाचे मठाधिपती विठ्ठल महाराज स्वामी, प्रकाश बापूराव पवार, रमेश टोण्णे यांच्यासह बाबरमाची ग्रामस्थ, दुर्गप्रेमी नागरिक, शिवराय ट्रेकिंग ग्रुपसह सदाशिवगड बचाव कृती समितीकडून हे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बाबरमाची, डिचोली, तसेच राजमाची परिसरातील गडाच्या पायथा परिसरात दररोज काही तळीराम ओली पार्टी करतात. काहीजण गडावर येऊन गडावरील पठारावर बिनधास्तपणे दारू पित असतात. हजारमाची पायरी मार्गालगतही दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. गडावर रस्ता नसतानाही अशी परिस्थिती आहे. यापूर्वी आम्ही काही लोकांना, युवकांना पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे; मात्र ठोस कारवाई होत नाही. रस्ता झाल्यावर सायंकाळनंतर गडावर ओल्या पार्ट्या करण्यास कोणीही अटकाव करू शकणार नाही. राज्यात ज्या-ज्या गडावर रस्ता झाला आहे, तेथील पावित्र्य धोक्यात आल्याचेच दिसते. म्हणूनच किल्ले सदाशिवगडावर रस्ता करून राज्य शासनाला किल्ले सदाशिवगडास तळीरामांचा अड्डा करावयाचा आहे का?

किल्ले सदाशिवगडावर वनपर्यटनाच्या माध्यमातून शिवसृष्टी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, आजवर सदाशिवगडावर महत्त्वाकांक्षी पाणी योजनेसह अन्नछत्र, दोन स्वच्छतागृह, तसेच अन्य कामांसाठी लागणारे साहित्य दुर्गप्रेमींसह सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला सहकार्य करणाऱ्या दुर्गप्रेमींनी हजारमाची पायथ्यापासून पायरी मार्गाने खांद्यावरून गडावर नेले आहे. त्यामुळे भविष्यात वनपर्यटनाच्या माध्यमातून गडावर शिवसृष्टी करावयाची झाल्यास सर्व साहित्य खांद्यावरून पायरी मार्गाने नेणे सहज शक्य आहे. वनपर्यटन आणि शिवसृष्टी या आडून रस्त्याचा घाट घालत गडाला, तसेच पर्यावरणास हानी पोहोचविणे कितपत योग्य आहे? याचा शासनाने विचार करणे आवश्यक आहे.

फोटो :