शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

कालवा भरला...अन् विहिरी आटल्या!

By admin | Updated: January 6, 2017 23:11 IST

आदर्कीत विरोधाभास : धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे अस्तरीकरण करण्याची मागणी

सूर्यकांत निंबाळकर ल्ल आदर्कीआदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागास वरदान ठरणाऱ्या धोम-बलकवडी कालव्यात सालपे ते बिबीपर्यंतचे नैसर्गिक पाणी पाझरत असल्याने दहा किलोमीटर कालवा पाण्याने भरला आहे. त्याचा परिणाम विहिरीतील पाण्यावर झाल्यामुळे ‘कालवा भरला अन् विहिरी आटल्या’ असा विरोधाभास निर्माण झाला आहे. विहिरीतील पाणीसाठा टिकून राहावा, यासाठी कालव्याचे तत्काळ अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.माजी आमदार शिवाजीराजे नाईक-निंबाळकर, कृष्णचंद्र भोईटे, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार चिमणराव कदम यांनी ‘कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला मिळवून देणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करून शासनाच्या पटलावर पाणी प्रश्न सतत लावून धरला. त्यानंतर काँग्रेसची सत्ता १९९५ जाऊन भाजप-शिवसेना युती शासन अपक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेत आले. यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून धोम-बलकवडी प्रकल्पास मंजुरी मिळून धरणाच्या कामास सुरुवात झाली.धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे फलटण, खंडाळा तालुक्यात सर्वेक्षण झाले. त्यानंतर कालव्याचे फेर सर्वेक्षण होऊन सालपे ते आळजापूरपर्यंत ५०० ते १००० मीटर कालवा गावाजवळून घेण्यात आला. त्यामुळे पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट बंधारे कालव्याच्या वरील बाजूस राहिले. तर कालवा जमिनीपासून २० ते ४० फूट खोलीवरून गेल्यामुळे ओढा-नाल्याचे पाणी कालव्यात पाझरू लागले. याचा परिणाम विहिरींच्या पाणीपातळीवर झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कालव्यात पाणी असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. विहिरीतील पाणीसाठा टिकून रहावा, यासाठी कालव्याचे अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.उपाययोजनेची गरज आदर्कीसह परिसरातील अनेक विहिरी उन्हाळ सुरू होण्यापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुरू असले तरी कालव्याची खोली अधिक असल्याने हे पाणी विहिरींऐवजी कालव्यात पाझरत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कालव्याचे अस्तरीकरण केल्यास हे संकट टळू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.