शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कालवा भरला...अन् विहिरी आटल्या!

By admin | Updated: January 6, 2017 23:11 IST

आदर्कीत विरोधाभास : धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे अस्तरीकरण करण्याची मागणी

सूर्यकांत निंबाळकर ल्ल आदर्कीआदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागास वरदान ठरणाऱ्या धोम-बलकवडी कालव्यात सालपे ते बिबीपर्यंतचे नैसर्गिक पाणी पाझरत असल्याने दहा किलोमीटर कालवा पाण्याने भरला आहे. त्याचा परिणाम विहिरीतील पाण्यावर झाल्यामुळे ‘कालवा भरला अन् विहिरी आटल्या’ असा विरोधाभास निर्माण झाला आहे. विहिरीतील पाणीसाठा टिकून राहावा, यासाठी कालव्याचे तत्काळ अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.माजी आमदार शिवाजीराजे नाईक-निंबाळकर, कृष्णचंद्र भोईटे, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार चिमणराव कदम यांनी ‘कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला मिळवून देणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करून शासनाच्या पटलावर पाणी प्रश्न सतत लावून धरला. त्यानंतर काँग्रेसची सत्ता १९९५ जाऊन भाजप-शिवसेना युती शासन अपक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेत आले. यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून धोम-बलकवडी प्रकल्पास मंजुरी मिळून धरणाच्या कामास सुरुवात झाली.धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे फलटण, खंडाळा तालुक्यात सर्वेक्षण झाले. त्यानंतर कालव्याचे फेर सर्वेक्षण होऊन सालपे ते आळजापूरपर्यंत ५०० ते १००० मीटर कालवा गावाजवळून घेण्यात आला. त्यामुळे पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट बंधारे कालव्याच्या वरील बाजूस राहिले. तर कालवा जमिनीपासून २० ते ४० फूट खोलीवरून गेल्यामुळे ओढा-नाल्याचे पाणी कालव्यात पाझरू लागले. याचा परिणाम विहिरींच्या पाणीपातळीवर झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कालव्यात पाणी असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. विहिरीतील पाणीसाठा टिकून रहावा, यासाठी कालव्याचे अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.उपाययोजनेची गरज आदर्कीसह परिसरातील अनेक विहिरी उन्हाळ सुरू होण्यापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुरू असले तरी कालव्याची खोली अधिक असल्याने हे पाणी विहिरींऐवजी कालव्यात पाझरत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कालव्याचे अस्तरीकरण केल्यास हे संकट टळू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.