शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

कालवा भरला...अन् विहिरी आटल्या!

By admin | Updated: January 6, 2017 23:11 IST

आदर्कीत विरोधाभास : धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे अस्तरीकरण करण्याची मागणी

सूर्यकांत निंबाळकर ल्ल आदर्कीआदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागास वरदान ठरणाऱ्या धोम-बलकवडी कालव्यात सालपे ते बिबीपर्यंतचे नैसर्गिक पाणी पाझरत असल्याने दहा किलोमीटर कालवा पाण्याने भरला आहे. त्याचा परिणाम विहिरीतील पाण्यावर झाल्यामुळे ‘कालवा भरला अन् विहिरी आटल्या’ असा विरोधाभास निर्माण झाला आहे. विहिरीतील पाणीसाठा टिकून राहावा, यासाठी कालव्याचे तत्काळ अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.माजी आमदार शिवाजीराजे नाईक-निंबाळकर, कृष्णचंद्र भोईटे, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार चिमणराव कदम यांनी ‘कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला मिळवून देणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करून शासनाच्या पटलावर पाणी प्रश्न सतत लावून धरला. त्यानंतर काँग्रेसची सत्ता १९९५ जाऊन भाजप-शिवसेना युती शासन अपक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेत आले. यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून धोम-बलकवडी प्रकल्पास मंजुरी मिळून धरणाच्या कामास सुरुवात झाली.धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे फलटण, खंडाळा तालुक्यात सर्वेक्षण झाले. त्यानंतर कालव्याचे फेर सर्वेक्षण होऊन सालपे ते आळजापूरपर्यंत ५०० ते १००० मीटर कालवा गावाजवळून घेण्यात आला. त्यामुळे पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट बंधारे कालव्याच्या वरील बाजूस राहिले. तर कालवा जमिनीपासून २० ते ४० फूट खोलीवरून गेल्यामुळे ओढा-नाल्याचे पाणी कालव्यात पाझरू लागले. याचा परिणाम विहिरींच्या पाणीपातळीवर झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कालव्यात पाणी असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. विहिरीतील पाणीसाठा टिकून रहावा, यासाठी कालव्याचे अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.उपाययोजनेची गरज आदर्कीसह परिसरातील अनेक विहिरी उन्हाळ सुरू होण्यापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुरू असले तरी कालव्याची खोली अधिक असल्याने हे पाणी विहिरींऐवजी कालव्यात पाझरत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कालव्याचे अस्तरीकरण केल्यास हे संकट टळू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.