शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

रखडलेल्या बिलांसाठी छावणी चालकांचे साकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST

औंध : छावणी चालकांची रखडलेली बिले व अडीअडचणी सोडविण्यासाठी माण-खटाव तालुक्यांतील छावणीचालकांनी काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांची भेट घेऊन, ...

औंध : छावणी चालकांची रखडलेली बिले व अडीअडचणी सोडविण्यासाठी माण-खटाव तालुक्यांतील छावणीचालकांनी काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांची भेट घेऊन, याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर लक्ष घालून अडचणींतून मार्ग काढण्यासाठी शिष्टमंडळाने विनंती केली.

२०१८-१९ मध्ये खटाव-माण तालुक्यात दुष्काळाच्या भीषण झळांनी शेतकरी पशुधन जगवताना मेटाकुटीला आला होता. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हरणाई उद्योग समूहाने पुढाकार घेऊन चारा छावण्या सुरू केल्या. यामुळे लाखमोलाचे पशुधन जगविण्यात शेतकरी यशस्वी झाला. मात्र, छावण्या बंद झाल्यानंतर छावणी चालकांची बिले शासनदरबारी रखडलेली आहेत. बिले अडकल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत. यातून मार्ग निघावा, छावणी चालकांचे रखडलेले पैसे व अडीअडचणींसंदर्भात न्याय मिळावा, यासाठी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण तालुक्यांतील छावणी चालकांनी हरणाई सहकारी सूतगिरणीचे संस्थापक-अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यासाठी लक्ष घालण्याची मागणी केली.

यावेळी रासप जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन खाडे, सदाशिव खाडे, सोमनाथ भोसले, तुषार ओंबासे, गजानन भोसले, नामदेव सावंत, सुभाष काटकर, सुभाष खाडे, प्रमोद जगदाळे, रामचंद्र जगदाळे, धर्मराज जगदाळे उपस्थित होते.

कोट..

चारा छावणी चालकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन मंत्रालय स्तरावर बैठक लावण्यासाठी आग्रह धरला जाईल. या प्रश्नाचा शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध आहे.

- रणजितसिंह देशमुख, संस्थापक, हरणाई उद्योग समूह

०१औंध

फोटो : रखडलेले चारा छावणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी छावणी चालकांच्या शिष्टमंडळाने रणजितसिंह देशमुख यांची भेट घेतली. यावेळी मामूशेठ वीरकर, अर्जुन खाडे, सोमनाथ भोसले यांच्यासह छावणीचालक उपस्थित होते. (छाया-रशिद शेख)