शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

साठ्याच्या दुप्पट पाणी वाटपाचा हिशोब!

By admin | Updated: September 15, 2014 23:24 IST

अधिकाऱ्याचा जावईशोध : साठवण क्षमता ५.८५ टीएमसी

एकनाथ माळी - तारळे  -तारळी धरणातील पाणीसाठा व त्याचा होणारा वापर याबाबत अधिकारीच अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ५.८५ टीएमसी असताना चक्क १० टीएमसी पाणी वाटप होणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे़ याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो, एवढेच उत्तर त्यांच्याकडून दिले जात आहे़ मुरूड येथे सुमारे ५़८५ टीएमसी पाणीसाठ्याचे धरण बांधण्यात आले आहे़ बांबवडे, तारळे या दोन उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्या असून, धुमाकवाडी, आवर्डे, कोंजवडे या उपसा सिंचन योजनांची कामे काही दिवसांत सुरू होणार आहेत़ पन्नास मीटर हेडने शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यात येणार आहे़ या धरणामुळे पाटण तालुक्यासह कऱ्हाड, सातारा, माण, खटाव तालुक्यांतील शेती सुजलाम्-सुफलाम् होणार आहे़ मात्र, तारळे विभागातील व इतर तालुक्यात देण्यात येणारे पाणी किती प्रमाणात देण्यात येणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे़ तारळी धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने यावर्षी अल्पावधीतच धरण भरून वाहू लागले़ धरणातील पाणीसाठ्याचा वापर शेती व अन्य कारणासाठी किती होणार, याची बहुतांश लोकांना माहितीच नाही़ अशातच काही दिवसांतच तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनांच्या पोटपाटाचे काम सुरू होणार आह़े यासाठी संबंधित विभागाच्या परूळेकर नामक अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांनी पाणी वापराबाबत चौकशी केली़ त्यावेळी त्यांनी दिलेली आकडेवारी व पाणीसाठा यामध्ये फारच तफावत दिसून आली़ संबंधित अधिकाऱ्यांना चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना ‘पुन्हा माहिती देतो,’ असे सांगितले़ त्यानंतर मात्र त्या अधिकाऱ्याने फोन घेणेच टाळले़ धरणाची पाणी साठवण क्षमता ५़८५ टीएमसी असताना अधिकाऱ्याने ९़०५, ८़८४, ७़४९, ६़३७ टीएमसी असा पाणी वाटपाचा हिशोब सांगितला आह़े़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ही गोष्ट गांभीर्र्याने घेतली नाही़