शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

साखरेला स्थिर बाजारपेठ मिळावी

By admin | Updated: April 5, 2016 00:52 IST

पृथ्वीराज चव्हाण : प्रतापगड कारखान्याच्या गळित हंगामाची सांगता; ४ लाख ५०० क्विंंटल साखरेचे उत्पादन

सातारा : ‘ऊस पिकविणारा शेतकरी व या उसावर प्रक्रिया करून साखर उत्पादन करणारा सहकारी साखर उद्योग हे दोन्ही घटक परस्परांवर अवलंबून आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या साखर उद्योगाचे अर्थकारण बाजारातील साखरेच्या भावावर तर या भावावर शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊसदर अवलंबून असतो. यासाठी केंद्र व राज्य सरकारने उसाच्या एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) मध्ये व्यवहारीकता आणून साखरेला स्थिर बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने चालविण्यास घेतलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाची सांगता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गव्हाणीचे विधिवत पूजन करून झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार आनंदराव पाटील, अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, प्रतापगड कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र फरांदे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘सहकारी साखर उद्योग हा सहकार चळवळीचा पाया आहे. आघाडी शासनाच्या काळात सहकारात काम करणाऱ्या काही व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थासाठी सहकारी साखर कारखाने मोडीत काढून त्याचे खासगीकरण केले. त्याचवेळी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व सहकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आजारी सहकारी साखर कारखाने सहकारात ठेवण्याची भूमिका मी घेतली. त्यातूनच प्रतागपड व खंडाळा साखर कारखाना सहकारात जिवंत राहिला. मदन भोसले यांनी थोरल्या भावाच्या भूमिकेतून प्रतापगड तर सक्षमपणे चालविलाच, शिवाय खंडाळा कारखाना लवकरच सुरू होत आहे.’ मदन भोसले म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मालकीच्या प्रतापगड कारखान्यामध्ये चार हंगाम आम्ही अडचणीत सापडला तरी शेतकरी, हितचिंतक, ऊस तोडणी मजूर, वाहनधारक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे यशस्वी झाला. प्रारंभी पृथ्वीराज चव्हाण व अन्य मान्यवरांच्या हस्ते चार लाख, एकशे अकरा साखरपोत्यांचे पूजन करण्यात आले. प्रतापगडमध्ये चालू गळित हंगामात दैनंदिन सरासरी २,७१५मेट्रिक टनाने १३५ दिवसांत ३ लाख ५८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४ लाख ५०० क्विंंटल साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा ११.२१ टक्के मिळाला. यावेळी सर्वाधिक ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या तीन ट्रॅक्टर गाडीवान व बैलगाडीवान यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास तिन्ही कारखान्यांचे सभासद शेतकरी, मजूर, कर्मचारी उपस्थित होते.