शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

साखरेला स्थिर बाजारपेठ मिळावी

By admin | Updated: April 5, 2016 00:52 IST

पृथ्वीराज चव्हाण : प्रतापगड कारखान्याच्या गळित हंगामाची सांगता; ४ लाख ५०० क्विंंटल साखरेचे उत्पादन

सातारा : ‘ऊस पिकविणारा शेतकरी व या उसावर प्रक्रिया करून साखर उत्पादन करणारा सहकारी साखर उद्योग हे दोन्ही घटक परस्परांवर अवलंबून आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या साखर उद्योगाचे अर्थकारण बाजारातील साखरेच्या भावावर तर या भावावर शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊसदर अवलंबून असतो. यासाठी केंद्र व राज्य सरकारने उसाच्या एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) मध्ये व्यवहारीकता आणून साखरेला स्थिर बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने चालविण्यास घेतलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाची सांगता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गव्हाणीचे विधिवत पूजन करून झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार आनंदराव पाटील, अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, प्रतापगड कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र फरांदे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘सहकारी साखर उद्योग हा सहकार चळवळीचा पाया आहे. आघाडी शासनाच्या काळात सहकारात काम करणाऱ्या काही व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थासाठी सहकारी साखर कारखाने मोडीत काढून त्याचे खासगीकरण केले. त्याचवेळी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व सहकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आजारी सहकारी साखर कारखाने सहकारात ठेवण्याची भूमिका मी घेतली. त्यातूनच प्रतागपड व खंडाळा साखर कारखाना सहकारात जिवंत राहिला. मदन भोसले यांनी थोरल्या भावाच्या भूमिकेतून प्रतापगड तर सक्षमपणे चालविलाच, शिवाय खंडाळा कारखाना लवकरच सुरू होत आहे.’ मदन भोसले म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मालकीच्या प्रतापगड कारखान्यामध्ये चार हंगाम आम्ही अडचणीत सापडला तरी शेतकरी, हितचिंतक, ऊस तोडणी मजूर, वाहनधारक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे यशस्वी झाला. प्रारंभी पृथ्वीराज चव्हाण व अन्य मान्यवरांच्या हस्ते चार लाख, एकशे अकरा साखरपोत्यांचे पूजन करण्यात आले. प्रतापगडमध्ये चालू गळित हंगामात दैनंदिन सरासरी २,७१५मेट्रिक टनाने १३५ दिवसांत ३ लाख ५८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४ लाख ५०० क्विंंटल साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा ११.२१ टक्के मिळाला. यावेळी सर्वाधिक ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या तीन ट्रॅक्टर गाडीवान व बैलगाडीवान यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास तिन्ही कारखान्यांचे सभासद शेतकरी, मजूर, कर्मचारी उपस्थित होते.