शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सौसाठी श्रींचे गुडघ्याला बाशिंग !

By admin | Updated: July 17, 2017 14:47 IST

निवडणुकीचे धुमशान : अनेक गावात मोचेर्बांधणी

आॅनलाईन लोकमत

कऱ्हाड (जि. सातारा), दि. १६ : कऱ्हाड तालुक्यात १७ आॅक्टोबर ते १८ फेब्रुवारी या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सौ साठी श्री आग्रही असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये दिसत आहे.

कऱ्हाड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका आॅक्टोंबर २०१७ ते फेब्रवारी २०१८ या कालावधीत होणार आहेत. सदर ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण प्रसिध्द करण्यात आले आहे. सरपंचपद प्रथमच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार आहेत.

सप्टेंबर महिन्यामध्ये या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात आल्या असून दि. ३ आॅगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

आगामी काळात थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना, अपक्ष, विकास आघाड्या इत्यादींना सरपंचपदाची निवडणूक लढविणे सोपे होणार असले तरी संघर्ष करावा लागणार आहे. तर अनेक ठिकाणी इच्छुकांना स्वत:ऐवजी आपल्या सौना रिंगणात उतरावे लागणार आहे. अशावेळी सरपंचपदाचा उमेदवार निश्चित करताना गटप्रमुखांची चांगलीच दमछाक होणार आहे.