शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

तेरा एकरातील ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:38 IST

मसूर : चिखली ता. कऱ्हाड येथे थळोबा मंदिरामागचा १३ एकरांतील ऊस आगीत जळून खाक झाला. यात एकूण ३० ...

मसूर : चिखली ता. कऱ्हाड येथे थळोबा मंदिरामागचा १३ एकरांतील ऊस आगीत जळून खाक झाला. यात एकूण ३० शेतकऱ्यांचे ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना आग विझविण्यासाठीचा प्रयत्न करता आला नाही. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

चिखलीत थळोबा मंदिरामागे दोन दिवसांपूर्वी अचानक शेतातील उसाला आग लागली. त्यानंतर शेजारच्या एकूण १३ एकर क्षेत्रातील शेतातील उसाला आग लागत गेली. त्यामध्ये ३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कष्ट करून उभा केलेला ऊस जळताना पाहून शेतकरी हताश झाले. प्रारंभी शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याने वायरमन शैलेश शिंदे यांनी ट्रान्सफॉर्मरमधील फ्यूज काढून वीजप्रवाह बंद केला. मात्र, आग शॉर्टसर्किटने लागली नाही, याची खात्री झाली. विजय पाटील, भिकू सावंत, भानुदास सावंत, सुरेश सावंत, दिनकर सावंत, कुसुम सावंत, दादासाहेब सावंत, राजेंद्र सावंत, ज्ञानदेव सावंत, संभाजी सूर्यवंशी, निवृत्ती सावंत, गोपीनाथ कांबळे, सुहास क्षीरसागर, वच्छला क्षीरसागर, वसंत क्षीरसागर, हणमंत क्षीरसागर, भगवान क्षीरसागर, वासुदेव क्षीरसागर, श्यामराव क्षीरसागर, मच्छिंद्र क्षीरसागर, बाळासाहेब क्षीरसागर, प्रमोद क्षीरसागर, भरत क्षीरसागर, राजाराम क्षीरसागर, प्रल्हाद क्षीरसागर, कृष्णाजी क्षीरसागर या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे.

उपसरपंच महेश पाटील यांनी शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. मंडळाधिकारी श्रीराम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी रमेश लाखे यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. पोलीस पाटील, चंद्रकांत माळी घटनास्थळी उपस्थित होते.

फोटो : १७केआरडी०२

कॅप्शन : चिखली येथे १३ एकरांतील ऊस जळून खाक झाला.