शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

जंगले तोडून धनिकांनी बांधले बंगले!

By admin | Updated: November 17, 2014 23:21 IST

महाबळेश्वरचा निसर्ग धोक्यात : महसूल विभाग पंचनामे करण्यापुरताच

महाबळेश्वर : महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मेटतळे गावच्या हद्दीत अनेक धनिकांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून विनापरवाना बंगले बांधले आहेत. महसूल विभागाने पंचनामे केले; परंतु कोणत्याही बांधकामावर अथवा वृक्षतोडीवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या भागातील निसर्गसंपदा नष्ट होत चालली आहे. या कामासाठी स्थानिकच आर्थिक फायद्यासाठी धनिकांना मदत करीत असल्याने येथील पर्यावरण धोक्यात आले आहे.अशाच पद्धतीने तीस गुंठे क्षेत्र असलेल्या येथील मिळकत नं. ५ चा २ मध्ये मुंबईच्या धनिकाने स्थानिक दलालांच्या मदतीने एक आलिशान बंगला बांधला आहे. पूर्वीप्रमाणे याही बंगल्याच्या बांधकामाला प्रारंभ होताच, तलाठ्यांनी पंचनामा केला व पुढील कारवाईसाठी पाठविला. त्यानंतर अल्पावधीतच या मिळकतीमध्ये बंगल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. आता हा बंगला हॉटेल व्यवसायासाठी सज्ज झाला आहे; परंतु विनापरवाना बांधकाम अथवा विनापरवाना वृक्षतोड यासंदर्भात या मिळकतधारकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या संदर्भात तलाठ्यांना विचारताच ‘पंचनामा करणे आमच्या हातात आहे, कारवाई आम्ही करू शकत नाही, ती अधिकारी यांनी केली पाहिजे,’ असे उत्तर दिले जाते. तर दलालांना विचारले असता, ‘सर्व काही मॅनेज करता येते, त्यामुळे येथील बांधकामावर कोणतीही कारवाई होणार नाही,’ असा आत्मविश्वास ते व्यक्त करतात.यासाठी यंत्रणा कशी मॅनेज करायची याचे धडेही या भागातील दलाल धनिकास देतात व या संदर्भातील सर्व मदत ते करतात. वृक्षांची कत्तल करून त्याचे पुरावे नष्ट करण्याचे हातखंडे या दलालांकडे आहेत. कधी मुळासह वृक्ष उपटले जातात, तर कधी बुंध्यापासून तोडले जातात. कधी जाळून तर कधी गाडून पुरावे नष्ट केले जातात. काहीदा गावातील लोकांना ते मोफत वाटण्यात येते. त्यानंतर तेथे बांधकाम होते. त्यानंतर तलाठी बांधकामाचा पंचनामा करून वरिष्ठ विभागाकडे पाठवितात. तलाठ्यांनी या मिळकतीकडे परत कधी फिरकू नये, यासाठी स्थानिक दलाल सर्व व्यवस्था करतात. प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनासाठी केंद्र शासनाने संपूर्ण तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून घोषित केला आहे. तरीही या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होताना दिसत आहे. महाबळेश्वर-पाचगणी रस्ता, तापोळा रस्ता, महाबळेश्वर, माचुतर या भागातील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या धनिकांना येथील दलाल हे प्रतापगड रस्त्यावर असलेले मेटतळे गाव दाखवितात. या गावातून किल्ले प्रतापगड व किल्ले मकरंदगडाचे विलोभनीय निसर्गसौंदर्य नजरेस पडत असल्यामुळे अवैध बांधकामे होत आहेत.