शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘बंडोबां’मुळे संघ-समितीची वाढणार डोकेदुखी

By admin | Updated: June 14, 2015 23:56 IST

शिक्षक बॅँक निवडणूक : नऊ गटांत दुरंगी तर बारा गटांत तिरंगी लढत

कुडाळ : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या असलेल्या माजी आमदार शिवाजीराव पाटील प्रणित संघ व थोरात प्रणित संघात मनोमिलन झाल्यामुळे सत्ताधारी समितीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. बॅँकेच्या या निवडणुकीत नऊ मतदारसंघांत दुरंगी लढत होणार तर बारा मतदारसंघांत इच्छुकांनी बंडखोरी केल्यामुळे या बंडोबांमुळे संघ समितीची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळत आहे. या बारा गटांत तिरंगी लढतीची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरांची समजूत काढण्यात दोन्ही गटांचे नेते कामाला लागले आहेत. बॅँकेची सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही संघटनांमध्ये काऊंटडाऊन सुरू झाले आहे. जिल्ह्यात जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, दहिवडी, गिरवी, म्हसवड, फलटण या मतदारसंघांत संघाची ताकद आहे. संघाचा बालेकिल्ला असलेल्या जावळीत संघाला धोका नाही; मात्र खंडाळा तालुक्यात संघाचे माजी बँक संचालक मच्छिंद्र ढमाळ यांनी संघाचे अधिकृत उमेदवार भगवान धायगुडे यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. त्यामुळे खंडाळ्यातील बंडाळीची चर्चा जिल्ह्यात जास्त आहे. तर गिरवी-तरडगाव गटात शिवाजीराव पाटील प्रणित संघाचे राज्य कार्याध्यक्ष तुकाराम कदम यांनी समितीसह बंडखोरांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यांच्यासाठी शिक्षकसंघाची टीम कामाला लागलेली पाहायला मिळत आहे. तशीच परिस्थिती दहिवडी मतदारसंघात आहे. महेंद्र अवघडे व समितीचे विजय चव्हाण व बंडखोर, असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.समितीची वाई, कोरेगाव, रहिमतपूर, मायणी, परळी मतदारसंघांवर मजबूत पकड आहे. मात्र, समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे यांच्या परळी मतदारसंघातच महेश वंजारी यांची बंडखोरी समितीचे उमेदवार अनिल चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार आहे. तर आरळे मतदारसंघात समितीने दोंदे गटाला उमेदवारी दिल्यामुळे या मतदारसंघात दोंदे गटाला विजयासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहे. याठिकाणी संघाने नगरपालिकेच्या ज्ञानेश्वर कांबळे यांना अनुसूचित जाती-जमाती राखीव गटातून उमेदवारी दिल्यामुळे नगरपालिकेतील मते या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे दोंदे गटाच्या रजनी चव्हाण, विरोधी गटाचे दत्तात्रय कोरडे यांच्यातच सामना रंगणार व कांबळे यांची भूमिका निर्णायक ठरणार हे निश्चित. (प्रतिनिधी) बंडखोरांची संघातून हकालपट्टी करा शिक्षक संघाने शिखर-शिंगणापूर येथून तर शिक्षक समितीने अंगापूर येथून धुमधडाक्यात प्रचाराचा शुभारंभ केला. समितीने बँकेवर तर संघाने बॅँकेसह शिक्षकांचे प्रश्न हा प्रचाराचा मुद्दा केला. प्रचाराच्या या सभेत माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी बंडखोरांच्या बाबतीत कडक भूमिका घेऊन अशा बंडखोरांची संघातून हकालपट्टी करावी, असे आदेश जिल्ह्यातील नेत्यांना दिले.