शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

पाण्याची अभयस्थाने निर्माण करा

By admin | Updated: May 6, 2015 00:14 IST

एन.जे. पवार : कऱ्हाड येथील पाणी परिषदेला मान्यवरांची उपस्थिती

कऱ्हाड : ‘प्राचीन काळात मंदिराच्या परिसरामध्ये देवराईच्या स्वरूपात विविध वृक्षवेलींना संरक्षण प्राप्त होत होते. त्याचप्रमाणे आता पाण्याच्या साठ्यांना अभय देऊन त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या भूगर्भशास्त्र विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय पाणी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सदस्य ए. एन. मुल्ला होते. शंकराप्पा संसुद्दी, शिरपूर प्रकल्पाचे जनक सुरेश खानापूरकर, प्राचार्य डॉ. एस. के. वडगबाळकर, प्राचार्य डॉ. जे. बी. पिष्टे, नांदेड विद्यापीठाचे डॉ. डी. बी. पानस्कर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. बजेकल, वेणुताई चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एन. कालेकर, डॉ. बी. एन. गोफणे, प्रा. यू. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पवार म्हणाले, ‘आपल्याकडे पाण्याचा गैरवापर आणि वाया जाणे, हे जास्त प्रमाणात आहे. अशुद्ध पाण्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून बाटलीबंद पाण्याकडे आपण वळतो; परंतु त्याच बाटल्या आणि इतर कचरा मात्र आपण नदीत, विहिरीत टाकतो, हे थांबवलेच पाहिजे. आपण आर्थिक नियोजनात खूपच बारकाईने लक्ष देतो. मुला-मुलींची शिक्षणे, लग्न, यासाठी नियोजनपूर्वक पैसे ठेवतो. तशी वेळ आता पाण्याच्या नियोजनाची आली आहे. अन्यथा आपल्या नातवंडांना कदाचित पाणीच मिळणार नाही. म्हणूनच पाण्याची अभयस्थाने निर्माण करणे, ही काळाची गरज आहे.’ परिषदेचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी बीज भाषण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. एन. मुल्ला यांनी पाण्यासाठी काटेकोर नियोजनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. एस. एस. बजेकल यांनी स्वागत केले. प्रा. यू. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा प्रा. डॉ. आर. ए. सूर्यवंशी परिचय यांनी करून दिला. प्रा. आर. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. पी. रेळेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)