शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

पाण्याची अभयस्थाने निर्माण करा

By admin | Updated: May 6, 2015 00:14 IST

एन.जे. पवार : कऱ्हाड येथील पाणी परिषदेला मान्यवरांची उपस्थिती

कऱ्हाड : ‘प्राचीन काळात मंदिराच्या परिसरामध्ये देवराईच्या स्वरूपात विविध वृक्षवेलींना संरक्षण प्राप्त होत होते. त्याचप्रमाणे आता पाण्याच्या साठ्यांना अभय देऊन त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या भूगर्भशास्त्र विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय पाणी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सदस्य ए. एन. मुल्ला होते. शंकराप्पा संसुद्दी, शिरपूर प्रकल्पाचे जनक सुरेश खानापूरकर, प्राचार्य डॉ. एस. के. वडगबाळकर, प्राचार्य डॉ. जे. बी. पिष्टे, नांदेड विद्यापीठाचे डॉ. डी. बी. पानस्कर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. बजेकल, वेणुताई चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एन. कालेकर, डॉ. बी. एन. गोफणे, प्रा. यू. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पवार म्हणाले, ‘आपल्याकडे पाण्याचा गैरवापर आणि वाया जाणे, हे जास्त प्रमाणात आहे. अशुद्ध पाण्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून बाटलीबंद पाण्याकडे आपण वळतो; परंतु त्याच बाटल्या आणि इतर कचरा मात्र आपण नदीत, विहिरीत टाकतो, हे थांबवलेच पाहिजे. आपण आर्थिक नियोजनात खूपच बारकाईने लक्ष देतो. मुला-मुलींची शिक्षणे, लग्न, यासाठी नियोजनपूर्वक पैसे ठेवतो. तशी वेळ आता पाण्याच्या नियोजनाची आली आहे. अन्यथा आपल्या नातवंडांना कदाचित पाणीच मिळणार नाही. म्हणूनच पाण्याची अभयस्थाने निर्माण करणे, ही काळाची गरज आहे.’ परिषदेचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी बीज भाषण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. एन. मुल्ला यांनी पाण्यासाठी काटेकोर नियोजनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. एस. एस. बजेकल यांनी स्वागत केले. प्रा. यू. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा प्रा. डॉ. आर. ए. सूर्यवंशी परिचय यांनी करून दिला. प्रा. आर. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. पी. रेळेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)